अनियमित वीजपुरवठ्यामुळे काँग्रेसचा महावितरणवर मोर्चा:तीन दिवसांत समस्या सोडवण्याचे अधिकाऱ्यांचे लेखी आश्वासन
चांदूर रेल्वे येथे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अनियमित वीजपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी माजी आमदार वीरेंद्र जगताप आणि नगरसेविका कल्पना लांजेवार यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. आंदोलकांच्या आक्रमक भूमिकेनंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन देत समस्या सोडवण्याचे मान्य केले. चांदूर रेल्वे शहर, विशेषतः छत्रपती शिवाजी नगर भागात, कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय…