Headlines

पाचोडजवळ जांभूळ भरलेले पिकअप पलटी:रस्त्यावर पडलेल्या जांभुळांसाठी नागरिकांची झुंबड

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर जांभूळ वाहतूक करणारे एक पिकअप वाहन पलटी झाले. या अपघातानंतर रस्त्यावर विखुरलेली जांभळे गोळा करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. हा अपघात पाचोडजवळील मुरमा शिवारात पहाटेच्या सुमारास घडला. आंध्र प्रदेशातून खान्देशातील जळगावकडे सुमारे तीन लाख रुपयांहून अधिक किमतीची जांभळे घेऊन जाणारे हे पिकअप वाहन होते. चालकाचे नियंत्रण सुटल्याने…

Read More

सावरकरांना भारतरत्न देण्याचा ठराव रखडवला कुणी?:सुधीर मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहेर; थेट हक्कभंगाची मागणी

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना ‘भारतरत्न’ देण्याचा मुद्दा पुन्हा एकदा राज्याच्या विधानसभेत चांगलाच तापला आहे. सत्ताधारी भाजपचे ज्येष्ठ आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी या मुद्द्यावरून स्वतःच्याच सरकारला घरचा आहेर देत प्रशासकीय दिरंगाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली. ५ मार्च २०२६ रोजी सभागृहात दिलेल्या आश्वासनानंतरही सावरकरांना मरणोत्तर भारतरत्न देण्याचा ठराव केंद्र सरकारकडे का पाठवला गेला नाही, असा संतप्त…

Read More

लोहगड बिल्डर मृत्यू प्रकरण, भावी पत्नीने केली हत्या:प्रियकरासोबत मिळून दरीत ढकलले, दोघांनाही अटक; नोव्हेंबरमध्ये होते लग्न

पुण्यातील ट्रेकर आणि व्यावसायिक केतन विशाल अग्रवाल मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. पोलिसांनी मंगळवारी त्याची होणारी पत्नी सिया गोयल (२०) आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी (२२) यांना अटक केली. दोघांवर नियोजित कट रचून केतनची हत्या केल्याचा आरोप आहे. केतन अग्रवाल १८ जून रोजी आपल्या होणाऱ्या पत्नीसोबत ट्रेकिंगला गेले होते. नंतर त्यांचा मृतदेह दरीतून सापडला…

Read More

Omraje Nimbalkar Clarifies MP Funds; Dharashiv

विकासकामांसाठी निधी मिळत नसल्याचे कारण देत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या 6 खासदारांनी नुकताच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. मात्र, या बंडखोर खासदारांच्या खात्यात ‘खासदार निधी’चे (MPLADS) कोट्यवधी रुपये पडून असल्याचे आकडेवारीसह . 2019 ते 2024 चा 100% निधी खर्च! विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना ओमराजे म्हणाले की, खासदार निधीचे मूल्यमापन हे मुदत संपण्यापूर्वी करणे…

Read More

नैसर्गिक तलाव अन् जलाशयांचे पुनरुज्जीवन करा:पावसावरील अवलंबित्व कमी करा; आमदार अमीत साटमांची BMCकडे मागणी

मुंबई शहरातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर मुंबई भाजप अध्यक्ष तथा आमदार अमित साटम यांनी बृहन्मुंबई महापालिकेने केवळ पावसावर असलेले अवलंबित्व कमी करण्यासाठी शहरातील सर्व नैसर्गिक तलाव आणि जलाशयांचे पुनरुज्जीवन करावे, तसेच त्या ठिकाणी रिव्हर्स ऑस्मोसिस (आरओ) प्रकल्प उभारून उपलब्ध पाण्याचा वापर करावा, अशी मागणी केली आहे. यासंदर्भात साटम यांनी आज महापौर रितू तावडे आणि महापालिका आयुक्त अश्विनी…

Read More

Sana Malik Polygamy Statement Sparks BJP Uproar in Maharashtra Assembly

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी ‘तिहेरी तलाक’ , बहुपत्नीत्व आणि ‘समान नागरी कायदा’ (UCC) या अत्यंत संवेदनशील विषयांवरून सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरील आमदारांमध्ये मोठी खडाजंगी पाहायला मिळाली. भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी मांडलेल्य . देवयानी फरांदेंची लक्षवेधी आणि UCCची मागणी भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी नाशिकमधील तिहेरी तलाकच्या एका प्रकरणाचा उल्लेख करत लक्षवेधी सूचना मांडली….

Read More

ममता ज्या जागेवर हरल्या, तेथे EVM-VVPAT सुरक्षित ठेवण्याचे आदेश:उच्च न्यायालय म्हणाले- गरज पडल्यास चौकशी होईल; भवानीपूरमध्ये शुभेंदू 15,000 मतांनी जिंकले होते

कोलकाता उच्च न्यायालयाने मंगळवारी पश्चिम बंगालमधील भवानीपूर विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीशी संबंधित सर्व महत्त्वाचे पुरावे सुरक्षित ठेवण्याचे निर्देश दिले. न्यायालयाने निकालातील गैरव्यवहाराच्या आरोपांवर सुनावणी करताना सांगितले की, EVM, VVPAT, CCTV फुटेज आणि इतर संबंधित नोंदी जतन केल्या जाव्यात. न्यायालयाने म्हटले – गरज पडल्यास या सर्व पुराव्यांची तपासणी केली जाईल. यासोबतच न्यायमूर्ती गौरांग कांत यांनी शेखावाटी मेमोरियल…

Read More

'लॉक अप-2' सुरू होण्यापूर्वी रितेश अनकम्फर्टेबल:प्रश्न विचारण्यात आला- सलमानला 'लॉक अप'चा अनुभव आहे, त्यांना शोमध्ये आणणार का?

एकता कपूरच्या रिॲलिटी शो ‘लॉक अप सीझन 2’ च्या कार्यक्रमादरम्यान रितेश देशमुखला सलमान खान आणि संजय दत्त यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर रितेशने उत्तर देण्यास नकार दिला. पत्रकार परिषदेत त्याला विचारण्यात आले, “कारण तुमचे सर्वात जवळचे मित्र सलमान खान आणि संजय दत्त आहेत. त्यांना ‘लॉक अप’चा खूप अनुभव आहे, तर तुम्ही त्यांना शोमध्ये आणाल का…

Read More

एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी:महागाई भत्ता 58%, घरभाडे भत्ता 30 टक्क्यांपर्यंत वाढला; प्रताप सरनाईक यांची विधानसभेत घोषणा

राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय घेतला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांची दखल घेत परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी महागाई भत्ता आणि घरभाडे भत्त्यात घसघशीत वाढ करण्याची घोषणा आज विधानसभेत केली. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील सुमारे ८६ हजार एसटी कर्मचाऱ्यांना थेट आर्थिक…

Read More

मराठीची चिरफाड केली:राहुल नार्वेकरांवर राज ठाकरे संतापले, म्हणाले- वाचण्याआधी त्या कागदातून भेळ खाल्ली होती का?

पद्मविभूषण आशाताई भोसले यांच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ज्या पद्धतीने मराठी भाषेचा उच्चार केला आणि नावांची गल्लत केली, त्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अत्यंत तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे. “काल नार्वेकरांनी आशाताईंच्या निधनाचा नाही, तर मराठी भाषेच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडला आणि सभागृहातील एकाही सदस्याने ब्र देखील न…

Read More