Headlines

मेघालयात दगडफेकीनंतर 12 हजार पर्यटक अडकले:भीतीने बुकिंगही रद्द, केएसयूच्या रॅलीमुळे शिलाँगमध्ये तणाव; अनेक रस्ते पडले ओस

Marathi News National 12 Thousand Tourists Stranded After Stone Pelting In Meghalaya, Bookings Cancelled Due To Fear, Tension In Shillong Due To KSU Rally; Many Roads Deserted मनोज कुमार लस्कर | गुवाहाटी/शिलाँग8 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक डोंगराळ आणि धबधब्यांचे सौंदर्य पाहण्यासाठी मेघालयला पोहोचलेले हजारो पर्यटक बुधवारी संध्याकाळी अचानक दगडफेक सुरू झाल्यावर हादरले. यामुळे क्षणात संपूर्ण शहरात…

Read More

विधानसभाध्यक्षांवरील विश्वास उडाल्याने सुप्रीम कोर्टात धाव; उद्धवसेनेचा युक्तिवाद:बहुमतावर पक्ष, चिन्ह बहालीने देशात अराजकता- ॲड. कामत

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी पक्षांतराचे प्रकरण योग्य रीतीने हाताळले नाही. त्यामुळे आमचा त्यांच्यावरील विश्वास पूर्ण उडाला आहे. म्हणून आम्ही सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. आता तुम्हीच आमदारांच्या अपात्रतेचा फैसला करावा, असा मुद्दा उद्धवसेनेतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ देवदत्त कामत यांनी गुरुवारी युक्तिवादात मांडला. “पाचपैकी तीन आमदार फुटले म्हणून मूळ राजकीय पक्षच त्यांच्या हवाली करणार का? केवळ विधिमंडळातील तात्पुरत्या…

Read More

पाटील भगिनी शिष्यवृत्ती परीक्षेत चमकल्या, एकाचा राज्यात 12 वा क्रमांक:दिया राज्यात 12 वी, माही जिल्ह्यात 11 वी; शिक्षणमंत्र्यांकडून सत्कार

अमरावती येथील प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अतुल पाटील आणि बधीरीकरण तज्ज्ञ डॉ. मोनिका पाटील यांच्या कन्या दिया आणि माही पाटील यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या दोघींचा राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या परीक्षेत दिया पाटील हिने राज्यात १२ वा तर जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. त्याचवेळी, तिची बहीण माही…

Read More

चंपत राय म्हणाले-राम मंदिर निर्माण समिती अध्यक्षांनी मनमानी केली:माजी IAS नृपेंद्र मिश्र यांनी सल्ला कधीच ऐकला नाही, आपल्या पसंतीचे लोक निवडले

अयोध्या राम मंदिर ट्रस्टमधून राजीनामा दिल्यानंतर चंपत राय यांनी गुरुवारी ९ पानांचे दुसरे पत्र जारी केले. यात त्यांनी मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष आणि माजी आयएएस अधिकारी नृपेंद्र मिश्र यांच्या भूमिकेबद्दल अनेक दावे केले आहेत. चंपत राय म्हणाले, ‘राम मंदिराच्या बांधकामासाठी स्थापन झालेल्या ट्रस्टमध्ये १५ विश्वस्त होते आणि नृपेंद्र मिश्र यांना बांधकाम समितीचे अध्यक्ष बनवण्यात आले…

Read More

साखरेच्या दरवाढीमागे नेमकं कारण काय?:कारखान्यांतील शिल्लक साठ्याची तपासणी करा, राजू शेट्टींची केंद्र सरकारकडे मागणी

देशात सध्या साखरेचे दर गगनाला भिडले असून, या दरवाढीमागे मोठे गौडबंगाल असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला आहे. देशात ऑक्टोबर अखेरपर्यंत पुरेल इतका साखरेचा साठा उपलब्ध असताना, साखरेचे दर ऐतिहासिक पातळीवर का वाढले? असा सवाल करत त्यांनी सर्व साखर कारखान्यांमधील शिल्लक साठ्याची केंद्र सरकारने तातडीने तपासणी करावी, अशी आक्रमक मागणी केली…

Read More

अमरावतीत 24 तासांत महसूल विभागाची मोठी कारवाई:एक तलाठी बडतर्फ, दुसरा निलंबित; तिसरा रडारवर

अमरावती जिल्ह्याचे महसूल प्रशासन सध्या कर्तव्यकठोर भूमिकेत आले आहे. गेल्या २४ तासांत एका महिला तलाठ्याला (ग्राम महसूल अधिकारी) बडतर्फ करण्यात आले असून, दुसऱ्या तलाठ्याला निलंबित करण्यात आले आहे. तिसरा तलाठीही रडारवर असून, याबाबत एक-दोन दिवसांत अंतिम निर्णय घेतला जाईल अशी माहिती आहे. बडतर्फी आणि निलंबनाचे हे दोन्ही आदेश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी बजावले आहेत. बडतर्फ…

Read More

'एसआयआर'ला पुन्हा मुदतवाढ:मुख्य निवडणूक अधिकारी अमरावतीत: विभागीय आयुक्तालयात शुक्रवारी बैठक

सध्या अस्तित्वात असलेल्या मतदार यादीच्या विशेष सूक्ष्म पुनरिक्षणाला (एसआयआर) पुन्हा एकदा आठवडाभराची मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे प्रारूप मतदार यादी आता २४ ऑगस्टऐवजी ३१ ऑगस्ट रोजी जाहीर केली जाईल. दरम्यान, या मुदतवाढीदरम्यानच्या कामकाजाची आणि पुढील नियोजनाची माहिती देण्यासाठी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम शुक्रवारी अमरावतीत येत आहेत. ते येथील विभागीय आयुक्त कार्यालयात अमरावती विभागातील…

Read More

अवैध सावकारी प्रकरणी शर्मा कुटुंबाच्या मालमत्तांवर धाड:सहकार विभागाची कारवाई; 2 ठिकाणी आक्षेपार्ह कागदपत्रे आढळली

बडनेरा परिसरात अवैध सावकारीच्या तक्रारींवरून सहकार विभागाने गुरुवारी शर्मा कुटुंबीयांच्या घर आणि फार्म हाऊससह चार ठिकाणी धाडी टाकल्या. सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत ही कारवाई करण्यात आली. यापैकी दोन ठिकाणी इसार चिठ्ठी, खरेदी खत, सात-बाराचे उतारे आणि कोरे स्टॅम्प आढळून आले, तर उर्वरित दोन ठिकाणी कोणतेही आक्षेपार्ह दस्तऐवज आढळले नाहीत, असे सहकार विभागाने…

Read More

अमृत-एसआरआयएफ योजनेमुळे विद्यापीठाला मिळणार नवी दिशा:विद्यार्थी, नवउद्योजकांना स्टार्टअप, उद्योजकतेसाठी मार्गदर्शन

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील रिसर्च अँड इन्क्युबेशन फाऊंडेशन (SRIF) आणि अमृत यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अमृत-एसआरआयएफ’ योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे. या योजनेमुळे विद्यापीठाला नवीन दिशा मिळेल, तसेच विद्यार्थी आणि नवउद्योजकांना स्टार्टअप आणि उद्योजकतेसाठी मार्गदर्शन मिळणार आहे. या योजनेचे उद्घाटन कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते आणि अमृतचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांच्या हस्ते झाले. विद्यापीठातील विद्यार्थी,…

Read More

ब्रिक्स दळणवळण मंत्र्यांची 12 वी बैठक उद्या:ज्योतिरादित्य शिंदे अध्यक्षस्थानी; डिजिटल तंत्रज्ञान, सायबर सुरक्षेवर चर्चा

भारताच्या ब्रिक्स अध्यक्षपदाच्या कार्यकाळात ब्रिक्स समूहातील देशांच्या दळणवळण मंत्र्यांची १२ वी बैठक उद्या (२१ ऑगस्ट) आयोजित करण्यात आली आहे. केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य एम. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार असून, यात ब्रिक्स सदस्य देशांचे दळणवळण मंत्री आणि वरिष्ठ प्रतिनिधी सहभागी होतील. माहिती व दळणवळण तंत्रज्ञान (आयसीटी), डिजिटल परिवर्तन, नवोन्मेष आणि सक्षम डिजिटल पायाभूत सुविधांच्या…

Read More