![]()
गाई, म्हशी, पाळणाऱ्या शेतकऱ्यांची मते नको सरकारला आहेत का ? सरकारला फक्त जाती पातीचीच मते हवी आहेत का ? गोवंश हत्या बंदी कायद्याच्या आधार घेऊन, काही लोक हे बाजार बंद पाडायला लागले आहेत. नेमकं यातून काय साध्य करायचं आहे हे सरकारने स्पष्ट करावे, गोवंश हत्या कायदा आता गोपालक हत्या कायदा झालाय , हे तुम्हाला महागात पडेल, गोठ्यात हात घालू नका, गोरक्षकांना शेतकरी वैतागला आहे, शेणा मुतातले हात रस्त्यावर लढायला मागे पुढे बघणार नाहीत, असा इशारा आ. सदाभाऊ खोत यांनी दिला. शिरभावी ( ता. सांगोला ) येथील शेतकऱ्यांनी बीड जिल्ह्यातून खरेदी करून वाहनातून आणलेले बैल पंढरपूरच्या गो रक्षकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले. तसेच त्या शेतकऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामुळे पंढरपूर, सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांतून संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांच्या ताब्यात चारा, पाण्याशिवाय असलेल्या जनावरांची पाहणी केली. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आणि सरकारवर कडक ताशेरे ओढले. यावेळी पुढे बोलताना आ. खोत म्हणाले कि, शेतकरी पिढ्यान पिढ्या जनावरे पाळतो, आम्हाला जेवढी गरज आहे तेवढी जनावरे गोठ्यात ठेवतो, आणि गरज नसेल ती विकतो. सरकारला जनावरे सांभाळायची एवढी हौस आली आहे तर सरकारने गावात येऊन जनावरे खरेदी करावी, शेतकऱ्याने जनावरे विकायची नाहीत तर जनावरे खरेदी विक्रीसाठी दुकाने टाकावीत, सरकारच्या आश्रयाशिवाय हे चालते का, सरकार हे शेतकऱ्यांना लुटणाऱ्यांच्या बाजूने आहे. या सरकार समोर मी हात टेकले, हतबल झालोय, या सरकारला कळत नाही. सरकारला शेतकऱ्यांचे अर्थशास्त्र का कळत नाही, असा सवाल व्यक्त केले. मी आता विठ्ठलाच्या दर्शनाला जाणार आहे, पांडुरंगाला साकडे घालणार आहे, पांडुरंग, दह्या, दुधाने भरलेला आमचा गोठा संकटात आलेला आहे, आता तूच सरकारला सुबुद्धी दे असे पांडुरंगाला साकडे घालणार आहे. सरकारला सुबुद्धी दे, पांडुरंगाला साकडे
Source link
गोवंश हत्या बंदी कायदा आता गोपालक हत्या कायदा झालाय:आमदार सदाभाऊ खोत यांचा महायुती सरकारला थेट इशारा