Headlines

नेत्रदानाची जबाबदारी समाजातील प्रत्येकाने स्वीकारावी- सुरेश साबू:जागतिक नेत्रदान दिनानिमित्त पदाधिकाऱ्यांची नियोजन सभा‎




नेत्रदान हे अत्यंत मोठे आणि महान सामाजिक कार्य असून गेल्या १६ वर्षांपासून हरिना फाऊंडेशन या कार्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. आता या जनजागृती अभियानाची जबाबदारी समाजातील प्रत्येक घटकाने स्वीकारण्याची गरज आहे, असे प्रतिपादन माहेश्वरी पंचायतचे अध्यक्ष सुरेश साबू यांनी केले. आगामी १० जून रोजी साजऱ्या होणाऱ्या जागतिक नेत्रदान दिनानिमित्त हरिना फाऊंडेशनतर्फे विविध उपक्रमांची जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. दरवर्षी नाविन्यपूर्ण संकल्पनांच्या माध्यमातून नेत्रदानाचा प्रचार-प्रसार करून सर्वसामान्यांमध्ये जनजागृती केली जाते. यावर्षी “माझ्या जीवनातील अंतिम भेट-राष्ट्राच्या नावाने’ या अभिनव संकल्पनेद्वारे नेत्रदानाचा संदेश समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत तसेच जगभर पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या उपक्रमात शहरातील सामाजिक, व्यापारी, शैक्षणिक व विविध संस्थांचा सहभाग निश्चित करण्यासाठी हॉटेल राय जिरा येथे हरिना फाऊंडेशनतर्फे संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची विशेष सभा आयोजित करण्यात आली. सभेमध्ये जागतिक नेत्रदान दिनाच्या आयोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपल्या सूचना व मते मांडली. सभास्थळी उभारण्यात आलेल्या सेल्फी पॉईंट तसेच क्यूआर कोडच्या माध्यमातून उपस्थित मान्यवरांनी नेत्रदानाचा संकल्प नोंदवून उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शहरात मागील अनेक वर्षांपासून हरिना नेत्रदान समितीद्वारे नेत्रदान जनजागृतीसाठी सातत्याने विविध उपक्रम राबवले जात आहे. यामुळे अनेकांनी आपले नेत्र मरणोपरांत दान केले असून त्यामुळे अनेक दृष्टीहिनांना नवी दृष्टी मिळाली आहे. त्यांनाही हे जग तसेच त्यातील विविध रंग बघता आले आहे. ज्यांच्या जीवनात आजवर केवळ अंधार आहे, अशांनाही सुंदर जग बघण्याचा अधिकार असून मृत्यूनंतर आपले नेत्र इतरांच्या कामी आले तर त्यासारखे पुण्य नाही, ही भावना समाजातील प्रत्येक नागरिकाने ठेऊन नेत्रदानाचा संकल्प करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. शहरात आज नेत्रदान दिनानिमित्त रॅली शहरात १० जून रोजी सकाळी ८ वाजता नेहरू मैदानातून जागतिक नेत्रदान दिनानिमित्त रॅली काढली जाणार असून या रॅलीत शहरवासीयांनी सहभागी व्हावे, असे आवाहन, हरिना नेत्रदान समितीद्वारे करण्यात आले आहे. या रॅलीद्वारे शहरवासीयांना नेत्रदान करण्याचा संदेश दिला जाणार असून मरणोपरांत नेत्रदान केल्यामुळे अनेकांना दृष्टी मिळून त्यांना ही सृष्टी बघता येईल.नेत्रदान करणे हे राष्ट्रीय दायीत्व समजून त्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. त्यातूनच समाजातील इतर नागरिकांना नेत्रदान करण्याची प्रेरणा मिळेल, असे आयोजकांनी मत व्यक्त केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *