Headlines

नाशिक, परभणी, बीडसह उर्वरित राज्याला ‘यलो अलर्ट’:विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांत पावसाचा जोर राहणार, संभाजीनगरसह 14 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट




हवामान विभागाने गुरुवारी (३० जुलै) राज्यातील १४ जिल्ह्यांमध्ये ‘ऑरेंज अलर्ट’ तर उर्वरित जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. यामुळे बहुतांश भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे. ऑरेंज अलर्ट: रायगड, जळगाव, पुणे, कोल्हापूर, सातारा घाटक्षेत्र, छत्रपती संभाजीनगर, जालना, अमरावती, भंडारदरा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर व वर्धा. यलो अलर्ट : पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, अकोला, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ. जायकवाडी ६७.३१ टक्के, मराठवाड्याला दिलासा नाशिक | मराठवाड्यातील जायकवाडी धरणात नाशिकच्या नांदूर-मधमेश्वर बंधाऱ्यातून १ जूनपासून ते आतापर्यंत तब्बल ३२.३१३ टीएमसी (९१४.९९ अब्ज लिटर) इतके पाणी सोडण्यात आले आहे. परिणामी जुलैअखेरीलाच तब्बल ६७.३१ टक्के इतका पाणीसाठा जायकवाडीत उपलब्ध झाला आहे. त्यामुळे आता समन्यायी पाणीवाटपाच्या मेंढेगिरी समितीच्या शिफारशीनुसार नाशिक-अहिल्यानगर या दोन्ही जिल्ह्यांतील धरणांतून जायकवाडीला पाणी सोडण्याची आवश्यकता नाही. नाशिकमधील प्रमुख २६ प्रकल्पांत एकूण ५९०४० दलघफू पाणी आहे. जायकवाडीच्या उजव्या कालव्यातून माजलगावसाठी पाणी सोडणार‎ जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये सातत्याने‎वाढ होत आहे. मात्र, माजलगाव धरणात केवळ‎१६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे‎जायकवाडीच्या उजव्या कालव्यातून शुक्रवारी‎पाणी सोडण्यात येणार आहे. माजलगाव धरणात‎२५ टक्क्यांपर्यंत साठा होईपर्यंत पाणी सोडण्यात‎येणार आहे. जालना, परभणी जिल्ह्यात पाऊस‎कमी असल्यामुळे दोन्ही जिल्ह्यांतून पाणी‎सोडण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे‎येत्या २ ते ३ दिवसांत डाव्या कालव्यातून पाणी‎सोडण्यात येणार आहे.‎ मराठवाड्यात या वर्षी पाऊस कमी झाला‎आहे.त्यामुळे जायकवाडी हाच मोठा आधार‎छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड, जालना या‎जिल्ह्यांसाठी आहे. सध्या खरिपासाठी पाऊस कमी‎असल्यामुळे सिंचनासाठी पाण्याचा मार्ग‎जायकवाडीमुळे मोकळा झाला आहे.‎ शुक्रवारी पाणी सोडणार बीडमधील अधीक्षक‎अभियंता पल्लवी काळे यांनी ‘दिव्य मराठी’शी‎बोलताना सांगितले की, माजलगाव धरणात‎पाणीसाठा अत्यल्प आहे. सध्या पाण्याची गरज‎आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाकडून तयारी केली‎जात आहे. उजव्या कालव्यातून साधारण ११००‎क्युसेक पाणी सोडण्याची तयारी केली जात आहे.‎डाव्या कालव्यातून १ लाख ४१ हजार हेक्टर सिंचन‎होते. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड‎जिल्ह्यांना त्याचा फायदा होणार आहे. जालना,‎परभणी जिल्ह्यांतून पाणी सोडण्याची मागणी‎करण्यात आली आहे. त्यामुळे हे पाणी सोडल्यास‎कापूस, सोयाबीन, तूर पिकांना खरिपात संरक्षक‎पाणी पाळी देणे शक्य होणार आहे. त्यामुळे‎शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. संभाजीनगर,‎जालना, बीड या जिल्ह्यांत आतापर्यंत खरिपाच्या‎१७ लाख हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत.‎ सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *