Headlines

Navnath Ban Slams Sanjay Raut Over Amit Shah Cooperative Ministry Policy


संजय राऊत यांनी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांना एक पत्र लिहले. राऊतांचा आणि सहकाराचा काहीही संबंध नाही, त्यांना केवळ घरं भरायचे जमते, तुम्ही सहकाराबद्दल बोलू नये. तुम्ही केवळ मातोश्री आणि भांडूपच्या घरात घेत असतात. त्यांनी हे पत्र अमित शहा यांना

.

नवनाथ बन म्हणाले की, अडीच वर्षे सरकार असताना उद्धव ठाकरे यांनी काय केले हे संजय राऊत यांनी पत्र लिहून विचारायला हवे होते. सहकार क्षेत्र देशभरात पसरवण्याचे काम अमित शहा यांच्या नेतृत्वामध्ये होत आहे. 70 वर्षे काँग्रेसला जे सूचले नाही ते सहकार मंत्रालय अमित शहा यांच्या कार्यकाळात सुरू झाले. मविआच्या काळात केवळ घोळाळ्याचे काम केले. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचा हेच काम आहे. रोज 100 कोटी जमा करण्याचे काम यांनी केले. उद्धव ठाकरे आणि राऊत यांनी एक पतपेढी सुद्धा सुरू केली नाही. तर अमित शहा यांनी देशभरात सहकार उभारण्याचे काम सुरू केले आहे. राऊतांना खासदार निधीमधून एकही काम करता आले नाही त्यांनी इतरांना काही शिकवू नये.

शहांकडून सहकार वाढवण्याचे काम

नवनाथ बन म्हणाले की, देवाभाऊ यांना काय कळते आणि काय नाही हे सर्व महाराष्ट्र बघत आहे. पण उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात त्यांना काय कळत होते वाझे काय लादेन आहे, काय म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना राज्याने पाहिले आहे.आता महाराष्ट्र देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये पुढे जात आहे. सहकार चळवळ वाढवण्याचे काम शहा करत आहे. राऊत सर्व काही सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या चरणी अर्पन करत आहेत.

दरोडा टाकण्याची परंपरा उद्धव ठाकरेंनी सुरू केली

नवनाथ बन म्हणाले की, 2019 मध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर दरोडा टाकणारे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत होते. जनतेने देवाभाऊंच्या नेतृत्वातील युतीला मतदान केले होते, पण उद्धव ठाकरेंनी दरोडा टाकत मुख्यमंत्रीपद मिळवले. दरोडा टाकण्याची परंपरा उद्धव ठाकरेंनी सुरू केली. राऊत आणि ठाकरेंनीच पहिला दरोडा टाकला. राऊत यांनी पक्षात काय सुरू आहे याकडे लक्ष दिले पाहिजे. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेत असल्यानेच जनता एकनाथ शिंदेंना साथ देत आहे. राऊतांनी नेत्यांवर टीका करण्यापूर्वी नगरसेवक निवडून कसे आणता येतील याकडे लक्ष द्यावे.

हे ही वृत्त वाचा राज्यातील नागरी सहकारी बँका संपवण्याचा अमित शहांचा प्रयत्न:महाराष्ट्राने शहा अन् गुजरातच्या दारात भीक मागायची का?- खासदार संजय राऊत

महाराष्ट्र लुटण्याचा विचार करणाऱ्यांना पाठिंबा देणारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार पुढे नेत आहोत, असे कशाच्या आधारे म्हणत आहेत? असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. सर्व काही गुजरातला मिळावे यासाठीच नवी विधेयके संसदेत मंजूर केली जात असून, राज्यातील नागरी सहकारी बँकांचे अस्तित्व संपवण्याचा घाट केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी घातला आहे, असा आरोपही त्यांनी केला. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.