Headlines

बिहारच्या 20 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा:50000 हून अधिक घरे पाण्यात; उत्तराखंडमध्ये भूस्खलन; हिमाचलमध्ये 70 रस्ते बंद




बिहारच्या खगडिया आणि चंपारणसह 20 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 1 सप्टेंबरपर्यंत पावसाचा जोर कायम राहू शकतो. दुसरीकडे, नेपाळमध्ये आलेल्या पुरामुळे बिहारमधील 8 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. गंगा आणि गंडक नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. कोसी आणि बागमती नद्याही दुथडी भरून वाहत आहेत. येथे 50 हजारांहून अधिक घरे पाण्याखाली गेली आहेत. उत्तराखंडमधील 11 जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. गुरुवारी चमोली येथे भूस्खलनामुळे बद्रीनाथ महामार्ग काही काळ बंद झाला होता. हिमाचल प्रदेशात पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. शिमला हवामान विभागाने 31 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधीत विविध ठिकाणी मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. भूस्खलन आणि मुसळधार पावसामुळे राज्यात 70 रस्ते बंद आहेत. उपग्रह नकाशात मान्सूनच्या ढगांची स्थिती पहा देशभरातील हवामानाची चित्रे देशभरातील हवामानाच्या अपडेट्ससाठी खालील ब्लॉग वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *