डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सोहळा:संत रविदास फाउंडेशन सामाजिक कार्याच्या नव्या अध्यायाची नांदी- आमदार सई डहाके
कारंजा नगरीत नव्याने स्थापन झालेली ‘श्री संत रविदास फाउंडेशन’ ही संस्था केवळ एका संघटनेची निर्मिती नसून, सामाजिक कार्याच्या नव्या अध्यायाची नांदी आहे. या संस्थेची प्रेरणा संत रविदासांच्या विचारांतून आलेली आहे, ही तिची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणावी लागेल. संत रविदासांनी मांडलेली समतेची, बंधुत्वाची आणि श्रमप्रतिष्ठेची भूमिका ही भारतीय समाजव्यवस्थेला दिशादर्शक ठरलेली आहे. जात, पंथ, आर्थिक…