संत्रा, मोसंबी मृग बहार; अधिक ताणाने फुलगळीचा धोका:तीव्र उन्हाळ्यामुळे झाडांना अधिक ताण
अकोला सध्याच्या बदलत्या हवामानात संत्रा व मोसंबी बागांच्या मृग बहाराचे व्यवस्थापन करणे फळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी आवश्यक आहे. मृग बहार पावसाळ्यातील योग्य हवामान व तापमानावर अवलंबून असतो. या बहारात रोग व किडींचा प्रादुर्भाव तुलनेने कमी असल्याने फळगळ कमी होते. मात्र, यावर्षी विदर्भात किमान साडेतीन महिने कडक उन्हाळ्यामुळे बागांना अधिक ताण बसला. यामुळे बागांमध्ये फुलगळ किंवा फळगळ…