Headlines

Admin

आज हिंगोलीत रिंगण:नर्सीतून संत नामदेव महाराज पालखीचे‎प्रस्थान; 19 दिवसांनी पंढरीत पोहोचणार‎

संत नामदेव महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या‎नर्सी नामदेव येथून संत नामदेव महाराजांच्या‎पायी पालखी सोहळयाचे रविवारी पंढरपूरकडे‎प्रस्थान झाले आहे. यावेळी शेकडो भाविक‎पालखी सोहळ्यात सहभागी झाले. आज‎हिंगोलीत रिंगण सोहळा रंगणार आहे,‎पालखीचे हे ३१ वे वर्ष आहे. ३५० किमी अंतर‎पायी कापून २४ जुलैला पालखी पंढरपूरला‎पोहोचणार आहे.‎ नर्सी नामदेव येथून दुपारी ‘जय जय रामकृष्ण‎हरी’च्या गजरात पालखी निघाली. यावेळी‎संस्थानच्या परिसरात पालखीचे पूजन…

Read More

अमरनाथ गुहेत 3 दिवसांत 56000 हून अधिक भाविक:हा आकडा गत वर्षीपेक्षा 18% जास्त; बेस कॅम्पमध्ये UP च्या प्रवाशाला सर्पदंश

अमरनाथ यात्रेच्या पहिल्या 3 दिवसांत 56 हजारांहून अधिक भाविकांनी बाबा बर्फानीचे दर्शन घेतले आहे. हा आकडा गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे 18.6% जास्त होता. 2025 मध्ये पहिल्या तीन दिवसांत 47,972 भाविक पोहोचले होते. 57 दिवस चालणारी यात्रा 3 जुलैपासून सुरू झाली आहे. 48 किमी लांब नुनवान-पहलगाम मार्ग आणि 14 किमी लांब पण कठीण बालटाल मार्गावरून भाविकांची…

Read More

राज्यात पावसाचा धुमाकूळ; धरणसाठे 26 टक्क्यांवर:नदी-नाले अन् ओढ्यांना पूर, जनजीवन विस्कळीत, मुंबईत ढगफुटीसारखी स्थिती

राज्यभर पावसाचा धुमाकूळ सुरूच असून रविवारी सर्वदूर झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागातील नदी, नाले, ओढे, तलाव ओसंडून वाहत आहेत. काही धरणांतून विसर्ग सुरू असल्याने नदीकाठच्या गावांना इशारा देण्यात आला आहे. यामुळे सखल भागात पाणी साठल्याने शहरी तसेच ग्रामीण जनजीवन विस्कळीत झाले आहे, तर अनेक घाट भागात अतिवृष्टी झाल्याने धबधबे ओसंडून वाहत आहेत. यामुळे राज्याच्या पाणीसाठ्यात…

Read More

रणवीर सिंह @41, निर्मात्याने अंगावर कुत्रा सोडला:अमेरिकेत वेटरचे काम केले, आज आहे भारतातील सर्वात महागडा अभिनेता

एक मुलगा, जो लहानपणापासूनच चित्रपटांचा वेडा होता आणि जेव्हा त्याने अभिनयाच्या जगात पाऊल ठेवले, तेव्हा त्याला सुरुवातीला अनेक नकार सहन करावे लागले. कास्टिंग काउचसारख्या कटू अनुभवांनाही सामोरे जावे लागले. इतकेच काय, एक दिवस जेव्हा तो कामाच्या शोधात आपले पोर्टफोलिओ घेऊन एका निर्मात्याच्या घरी पोहोचला, तेव्हा निर्मात्याने त्याच्या मागे कुत्रा सोडला. तोच मुलगा आज बॉलिवूडमधील सर्वात…

Read More

ऑनलाइन गेमिंगचा नाद भोवला:ठाण्यात तरुणास दीड कोटीचा गंडा; 3 संकेतस्थळे, विविध बँक खातेदारांसह 7 जणांविरुद्ध गुन्हा

ऑनलाइन गेमिंग आणि गुंतवणुकीवर भरघोस परतावा मिळवण्याच्या नादात ठाण्यातील एका २६ वर्षीय तरुणाने तब्बल १.३६ कोटी रुपये गमावले आहेत. सायबर भामट्यांनी अत्यंत शिताफीने जाळे विणून या तरुणाची फसवणूक केली असून याप्रकरणी रविवारी ठाणे सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ऑक्टोबर २०२४ ते ३० जून २०२६ या कालावधीत हा संपूर्ण प्रकार घडला. पोलिसांनी ३ वेबसाइट्स…

Read More

विठ्ठलनामाचा गजर:7 जुलै रोजी पंढरपूरकडे पालखीचे होणार प्रस्थान‎, पैठण येथील पालखी ओट्याची स्वच्छता

संतश्रेष्ठ श्री एकनाथ महाराज यांच्या ४७१ व्या आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर, येथील पालखी ओटा परिसराची रविवारी नगर परिषदेच्या वतीने स्वच्छता करण्यात आली. नगराध्यक्ष विद्या भूषण कावसानकर यांच्या पुढाकाराने संपूर्ण पालखी स्वच्छ करण्यात आला. ही मानाची पालखी मंगळवारी (७ जुलै) रोजी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. संत एकनाथ महाराजांची पालखी हा पैठणच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा…

Read More

सियाने केतनचा खून करण्यासाठी केली राजा रघुवंशी प्रकरणाची स्टडी:सर्च हिस्ट्रीतून रहस्य उघड; हे ही विचारले- पोलिस कोठडीत महिलेला मारहाण होते का?

पुण्यातील लोहगडावर झालेल्या केतन अग्रवाल हत्याकांडाच्या तपासात असे समोर आले आहे की, मुख्य आरोपी सिया गोयलने घटनेपूर्वी इंटरनेटवर इंदूरमधील राजा रघुवंशी हत्याकांडाची माहिती गोळा केली होती. पोलिसांनुसार, सियाने इंटरनेटवर ‘पोलिस कोठडीत महिलांना मारहाण होते का’ हे देखील शोधले होते. ही संपूर्ण माहिती सियाच्या दोन्ही मोबाईलच्या सर्च हिस्ट्रीतून मिळाली. पोलिस 2 दिवसांपूर्वी सियाला तिच्या घरी घेऊन…

Read More

कन्नड येथील सागर सोनवणे यांना युवा शेतकरी पुरस्कार:कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित

तालुक्यातील ताडपिंपळगाव येथील युवा शेतकरी सागर राजेंद्र सोनवणे यांना महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय युवा शेतकरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुंबईत आयोजित सोहळ्यात राज्यपाल जिष्णूदेव वर्मा आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सागर यांनी प्रयोगशाळेत ट्रायकोडर्मा, पीएसबी, मेटारायझियम यांसारख्या उच्च दर्जाच्या जैविक खते व कीटकनाशकांची निर्मिती करून सेंद्रिय शेतीला नवी…

Read More

जिल्ह्यात गतवर्षी 5.95 लाख हेक्टर‎पेरणी तर यंदा 2.22 लाख हेक्टरवर:समाधानकारक पावसाअभावी 67 टक्के जमीन अद्याप पेरणीविना‎

जिल्ह्यात पावसाच्या लहरीपणामुळे यंदाच्या खरीप हंगामात शेतीचे गणित बिघडले आहे. गतवर्षी मे महिन्यात झालेल्या मान्सूनपूर्व दमदार पावसामुळे जूनच्या पहिल्याच आठवड्यापासून पेरण्यांना वेग आला होता. गेल्या वर्षी जूनअखेर जिल्ह्यात ५ लाख ९५ हजार ६२० हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली होती. मात्र, यंदा जून महिना संपून जुलैचा पहिला आठवडा सुरू झाला तरी अनेक शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेतच आहेत….

Read More

प्रगतिशील शेतकरी:अवघ्या 20 गुंठ्यात वांग्यातून 9 महिन्यांत साडेचार लाख उत्पन्न‎

बदलत्या हवामानामुळे पारंपरिक शेतीचे गणित‎दिवसेंदिवस कठीण होत असताना लातूर‎‎जिल्ह्यातील जेवळी येथील‎‎प्रगतिशील शेतकरी अमृत‎‎गंपले यांनी अवघ्या २०‎‎गुंठ्यांत ९०० वांग्याच्या‎‎रोपांची लागवड करून‎‎केवळ नऊ महिन्यांत सुमारे‎‎६ लाख रुपयांचे उत्पादन‎‎मिळवले. यात दीड‎लाखांचा खर्च वगळला तर साडेचार लाखांचे‎निव्वळ उत्पन्न मिळवले आहे. गंपले‎यांच्याकडे एकूण दोन एकर शेती आहे. यापूर्वी‎ते ऊस, हरभरा आणि सोयाबीन ही पारंपरिक‎पिके घेत होते. मात्र वाढता उत्पादन खर्च,‎अनियमित…

Read More