एआयसीटीईचा निर्णय; यंदा पहिल्या वर्षाचे प्रवेश बंद:गैरप्रकार, शिक्षकांचा अभाव; राज्यातील 12 अभियांत्रिकी महाविद्यालयांना टाळे
वारंवार सांगूनही भौतिक सुविधांचा अभाव, मान्यताप्राप्त आणि तज्ज्ञ शिक्षक नाहीत. गैरप्रकार या सर्व त्रुटींमुळे ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनने (एआयसीटीई) २०२५-२६ शैक्षणिक वर्षात देशातील ५८ अभियांत्रिकी महाविद्यालय टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात ९५० अभ्यासक्रमांचा समावेश आहे. त्यात महाराष्ट्रातील १२ अभियांत्रिकी महाविद्यालयांचा समावेश आहे. ही महाविद्यालये पुणे, नागपूर, नाशिक, जळगाव जिल्ह्यांतील आहेत. एआयसीटीईच्या…