Headlines

Admin

पालखी सोहळ्याच्या तोंडावर अकलूजमध्ये पाणी टंचाई:15 जुलैपर्यंत टँकरद्वारे पुरवठा, अल निनोच्या इशाऱ्यामुळे कालव्याचे पाणी बंद, साठवण तलाव कोरडा‎

हवामान खात्याने अल निनो बाबत आगाऊ सूचना देऊन कमी पर्जन्यमानाचा अंदाज दिला, मात्र तोपर्यंत पावसाळा सुरू होण्यापूर्वीच धरणे रिकामी झाल्याने पालखी सोहळ्याच्या तोंडावर पिण्याच्या पाण्याचा यक्ष प्रश्न निर्माण झाला असून अकलूज शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी आता चक्क टँकरने पाणी पुरवठा करण्यास नगर परिषदेने सुरुवात केली आहे. शहरातील जुने बोअर सुरू करण्याच्या हालचाली युद्ध पातळीवर सुरू झाल्या…

Read More

विठ्ठल मंदिर परिसर वाहन प्रतिबंध क्षेत्र म्हणून घोषित:जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचे आदेश; आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई होणार‎

आषाढी शुद्ध एकादशीनिमित्त पंढरपूर शहरातील यात्रेच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील कलम ३४ (ब) नुसार मंदिर परिसर ‘वाहन प्रतिबंध क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष ए . ​आषाढी यात्रा कालावधीत श्रीकृष्ण मंदिर, चौफाळा, विठ्ठल मंदिर पश्चिम द्वार आणि महाद्वार चौक परिसरात भाविकांची अलोट गर्दी असते. भाविक येथूनच…

Read More

म्हेत्रे यांच्या पुतळ्याचा चबुतरा पाडला:बाजार समितीला टाळे ठोकण्याचा इशारा, 7 दिवसांत गणेश मूर्ती हटवण्याच्या प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे‎

. स्वर्गीय सातलिंगप्पा म्हेत्रे यांचा चबुतरा बेकायदेशीरपणे पाडून त्या ठिकाणी गणेश मूर्तीची स्थापना केल्याच्या निषेधार्थ म्हेत्रे समर्थकांनी दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर तीव्र आंदोलन केले. बुधवारी दुपारी १२:२० वाजता सुरू झालेले हे आंदोलन तब्बल ६ तास चालले. प्रशासनाने येत्या ७ दिवसांत संबंधित गणेश मूर्ती तिथून हटवण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले. दिलेल्या…

Read More

राज्यात मान्सूनची दमदार बॅटिंग:पुणे-रायगडला 'रेड' तर मुंबईला 'ऑरेंज' अलर्ट; सांताक्रूझमध्ये झाड कोसळून 8 मजूर जखमी

अरबी समुद्रात तब्बल १५ दिवस रेंगाळल्यानंतर मान्सूनने आता संपूर्ण राज्यात दमदार हजेरी लावली आहे. रखडलेल्या पेरण्यांना वेग आल्याने बळीराजा सुखावला आहे. तरी मुंबई आणि उपनगरांमध्ये सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाने रायगड आणि पुण्याला ‘रेड अलर्ट’ तर मुंबई, ठाणे आणि पालघरला ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला असून, नागरिकांना अत्यंत…

Read More

आतापर्यंत 1 लाख 20 हजार हेक्टरवर पेरणी:कापूस पिकाचेही क्षेत्र वाढणार, तेल्हारा तसेच पातूर तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे कामे खोळंबली‎

जुलैच्या सुरुवातीला झालेल्या चांगल्या पावसामुळे यंदा खरीप पेरणीच्या कामांनी वेग घेतला आहे. कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील चार लाख ३२ हजार १० हेक्टर पेरणीयोग्य क्षेत्रापैकी आतापर्यंत एक लाख २० हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झा . यंदा शेतकरी मोठ्या प्रमाणावर कापूस पिकाकडे वळत असल्याचे चित्र आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे मूग आणि उडीद या पिकांच्या…

Read More

हरितक्रांती, रोहयोचे जनक वसंतराव नाईक यांचे राष्ट्रनिर्मितीत योगदान:कृषी महाविद्यालयातील कार्यक्रमात प्रा. विलास भवरे यांचे प्रतिपादन‎

राज्याच्या, आणि पर्यायाने देशाच्या विकासात, हरितक्रांती, पंचायत राज, श्वेतक्रांती, आणि रोजगार हमी यांसारख्या शाश्वत ग्रामविकासाच्या योजना प्रभावीपणे राबवणाऱ्या स्व. वसंतराव नाईक यांचे राष्ट्रनिर्मितीत अतुलनीय योगदान आहे. त्यांनी शेतकरी, आणि शेतकऱ्यां . व्यासपीठावर अधिष्ठाता कृषी डॉ. देवानंद पंचभाई, संचालक संशोधन डॉ. शामसुंदर माने, संचालक विस्तार शिक्षण डॉ. धनराज उंदीरवाडे, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी डॉ. सुरेंद्र काळबांडे, व…

Read More

आरोग्य सेवेत कट प्रॅक्टिस-निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही:शासकीय रुग्णालयांवर विश्वास वाढवून संस्थात्मक प्रसूतींना प्राधान्य द्या– मंत्री आबिटकर

राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार, पारदर्शक आणि तत्पर आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य यंत्रणेने अधिक जबाबदारीने काम करावे. रुग्णांना जाणीवपूर्वक खासगी रुग्णालयांकडे वळविणे, कट प्रॅक्टिसला प्रोत्साहन देणे किंवा शासकीय यंत्रणेतील उपलब्ध सुविधांकडे दुर्लक्ष करणे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही. अशा प्रकारांमध्ये दोषी आढळणाऱ्या संबंधित अधिकारी, ईएमएस समन्वयक आणि कर्मचाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल असे स्पष्ट निर्देश…

Read More

टीईटी पेपरफुटी प्रकरणाची निःपक्ष चौकशी कर:अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची मागणी, उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर‎

राज्यभर गाजत असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. या प्रकरणाची सखोल, निःपक्ष, वेळेत चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. होतकरू, हुशार विद्यार्थ्यांच्या जीवनाची राखरांगोळी करू पाहणाऱ्या पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे कुठपर्यंत गेले आहेत, अशा राक्षसी वृत्तीच्या लोकांवर कोणाचा वरदहस्त आहे,…

Read More

ग्रामीण अर्थव्यवस्थेला झळाळी देण्याचा गोसेवा आयोगाचा संकल्प:अकोल्यात 36 गोशाळांची नोंदणी; 24 संस्थांना शासन अनुदान‎

महाराष्ट्र सरकारने देशी गोवंशाचे महत्त्व ओळखून गायीला ‘राज्यमाता’ हा सर्वोच्च दर्जा बहाल केला आहे. या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आणि राज्यभरातील देशी गोवंशाचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी ‘महाराष्ट्र गोसेवा आयोग’ कार्यरत आहे. सद्यःस्थितीत आयोगाकडे राज्यभरातील ९८६ गोशाळांची नोंदणी झाली असून, देशी गोवंशाच्या माध्यमातून एक नवी आर्थिक व वैज्ञानिक क्रांती घडवण्याचा संकल्प आयोगाने केला आहे. अकोल्यात…

Read More

स्मार्ट मीटर मोहीम थांबवून जुने मीटर लावा:‘प्रहार’ची विद्युत भवनवर धडक, अभियंता देवहाते यांना विविध मागण्यांसाठी घातले साकडे‎

महावितरण कंपनीकडून घराघरांत बसविण्यात येत असलेल्या स्मार्ट मीटरमुळे कामगार, शेतकरी व सर्वसामान्य वीज ग्राहकांना प्रचंड आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे नवे मीटर काढून जुनेच मीटर लावून द्या, अशी मागणी प्रहार संघटनेने केली आहे. या मागणीसाठी आज, गुरुवारी महावितरणचे मुख्यालय असलेल्या कॅम्प स्थित विद्युत भवनसमोर प्रचंड निदर्शने करण्यात आली. आंदोलनाच्या शेवटी अधीक्षक अभियंता दीपक…

Read More