Headlines

Admin

टीईटी पेपरफुटी प्रकरणाची निःपक्ष चौकशी कर:अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची मागणी, उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर‎

राज्यभर गाजत असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. या प्रकरणाची सखोल, निःपक्ष, वेळेत चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. होतकरू, हुशार विद्यार्थ्यांच्या जीवनाची राखरांगोळी करू पाहणाऱ्या पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे कुठपर्यंत गेले आहेत, अशा राक्षसी वृत्तीच्या लोकांवर कोणाचा वरदहस्त आहे,…

Read More

ग्रामीण अर्थव्यवस्थेला झळाळी देण्याचा गोसेवा आयोगाचा संकल्प:अकोल्यात 36 गोशाळांची नोंदणी; 24 संस्थांना शासन अनुदान‎

महाराष्ट्र सरकारने देशी गोवंशाचे महत्त्व ओळखून गायीला ‘राज्यमाता’ हा सर्वोच्च दर्जा बहाल केला आहे. या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आणि राज्यभरातील देशी गोवंशाचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी ‘महाराष्ट्र गोसेवा आयोग’ कार्यरत आहे. सद्यःस्थितीत आयोगाकडे राज्यभरातील ९८६ गोशाळांची नोंदणी झाली असून, देशी गोवंशाच्या माध्यमातून एक नवी आर्थिक व वैज्ञानिक क्रांती घडवण्याचा संकल्प आयोगाने केला आहे. अकोल्यात…

Read More

स्मार्ट मीटर मोहीम थांबवून जुने मीटर लावा:‘प्रहार’ची विद्युत भवनवर धडक, अभियंता देवहाते यांना विविध मागण्यांसाठी घातले साकडे‎

महावितरण कंपनीकडून घराघरांत बसविण्यात येत असलेल्या स्मार्ट मीटरमुळे कामगार, शेतकरी व सर्वसामान्य वीज ग्राहकांना प्रचंड आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे नवे मीटर काढून जुनेच मीटर लावून द्या, अशी मागणी प्रहार संघटनेने केली आहे. या मागणीसाठी आज, गुरुवारी महावितरणचे मुख्यालय असलेल्या कॅम्प स्थित विद्युत भवनसमोर प्रचंड निदर्शने करण्यात आली. आंदोलनाच्या शेवटी अधीक्षक अभियंता दीपक…

Read More

आता एमपीएससी ऑनलाइन नको:ऑफलाइनच घेण्याची केली मागणी, विद्यार्थ्यांचा जिल्हाकचेरीवर मोर्चा, शासनाला घातले साकडे‎

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) आगामी पूर्व परीक्षा संगणकाधारित (सीबीटी) पद्धतीने घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. मात्र, या निर्णयामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून, हा निर्णय बदलून परीक्षा पूर्वीप्रमाणेच पारंपरिक ऑफलाईन (ओएमआर) पद्धतीने घेण्यात यावी, या मागणीसाठी सदर परीक्षेची तयारी करणाऱ्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी गुरुवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेत तेथे निदर्शने…

Read More

‘कोणार्क’च्या दोन कामगारांना मारहाण:पोलिस ठाण्यासमोरच घंटागाड्यांची रांग, झोन क्र. 1 रामपुरी कॅम्पमधील द्वारकानगर परिसरातील प्रकार‎

झोन क्र. १ रामपुरी कॅम्पच्या गाडगेनगर परिसरातील द्वारकानगर भागात गुरुवारी २ रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास नाली स्वच्छ करणाऱ्या कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर या शहरातील स्वच्छतेचे कंत्राट घेणाऱ्या कंपनीच्या दोन सफाई कर्मचाऱ्यांना नागरिकांद्वारे शिवीगाळ व मारहाण करण्यात आली. यामुळे झोन क्र. १ मधील सर्व सफाई कर्मचारी संतप्त झाले. त्यांनी कामबंद केले. सफाई कर्मचाऱ्यांनी गाडगेनगर पोलिस स्टेशनमध्ये एकत्र…

Read More

नवीनकुमार पेठे यांना उद्यान पंडित पुरस्कार:राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते सपत्निक सन्मान‎

महाराष्ट्र शासनाच्या वतीने फलोत्पादन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी दिला जाणारा मानाचा ‘उद्यान पंडित पुरस्कार २०२४’ मोर्शी येथील प्रगतिशील संत्रा बागायतदार नवीनकुमार अरुणकुमार पेठे यांना प्रदान करण्यात आला. मुंबई येथे बुधवार १ जुलै रोजी आयोजित कार्यक्रमात राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते सपत्निक त्यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषीमंत्री दत्ता भरणे, राज्यमंत्री आशिष…

Read More

पुणे मर्डर- सिया – चेतनचा वेगवेगळा जबाब:क्राइम पेट्रोलमधून पोलिसांना चकवा देण्यास शिकले; आता पॉलीग्राफ चाचणी होणार

पुणे येथील केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी वेगवेगळे जबाब देत आहेत. त्यामुळे पोलिसांनी आता सत्य वदवून घेण्यासाठी पॉलीग्राफ (लाय डिटेक्टर) चाचणी घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यानंतर दोघांचे जबाब जुळवले जातील. सियाने चाचणीसाठी परवानगी दिली आहे. तपासात असे समोर आले आहे की, मुख्य आरोपी चेतन चौधरीने गुन्हेगारी…

Read More

देशी बियाण्यांचे जतन, फूड फॉरेस्टची उभारणी, जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवला‎:कुऱ्हा परिसरातील युवा शेतकरी निखिल तेटू यांना कृषी भूषण पुरस्काराने केले सन्मानित

हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनी व कृषी दिनानिमित्त आयोजित कृषी पुरस्कार सोहळ्यात तिवसा तालुक्यातील कुऱ्हा येथील युवा शेतकरी निखिल मधुकर तेटू यांना राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित कर . पुरस्कार वितरण समारंभाला राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री…

Read More

बोअरवेलला नवसंजीवनी:मेळघाटात रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या प्रयोगामुळे भूजल पातळी वाढली, घराच्या छतावरून पाणी थेट भूजलाच्या गर्भापर्यंत‎

डोंगरदऱ्यांमध्ये वसलेल्या मेळघाटातील अनेक गावांत उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य असते. यावर मात करण्याच्यादृष्टीने एक शास्वत प्रयोग करण्यात आला आहे. घराच्या छतावरुन वाहून जाणारे पाणी थेट भूजलाच्या गर्भापर्यंत पोहोचविण्यात आल्याने एका बोअरवेललाही नवसंजीवनी मिळाली आहे. धारणी शहरातील एका शासकीय कर्मचाऱ्याने प्रत्यक्ष कृतीतून जलसंधारणाचा हाआदर्श उभा केला आहे दरवर्षी उन्हाळा आला की पाण्यासाठी हाहाकार, कोरड्या पडणाऱ्या बोअरवेल्स, घटणारी…

Read More

उपजिल्हा रुग्णालयाच्या गलथान कारभाराविरोधात रुग्णाचे उपोषण:चुकीचे इंजेक्शन आणि ऑपरेशन केल्याचा आरोप‎

येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे एका निष्पाप रुग्णाला गंभीर शारीरिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रुग्णालयाच्या या गलथान कारभाराविरोधात आणि संबंधित दोषी डॉक्टरांवर कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी सागर दत्तात्रय गंगथडे या रुग्णाने गुरुवार, दि. ०२ जुलै पासून उपजिल्हा रुग्णालय येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणकर्ते…

Read More