Headlines

Admin

एनडीएचे मिशन 360, आता डीएमके-राष्ट्रवादी-सपामध्ये फूट पाडण्याची तयारी:लोकसभेत दोन-तृतीयांश आकडा मिळवण्यासाठी आता 41 खासदारांची गरज

भाजपचे शीर्ष रणनीतिकार राजकीय चित्र बदलण्यासाठी ‘मिशन 360’ मध्ये गुंतले आहेत. 17 एप्रिल रोजी महिला आरक्षण आणि परिसीमन संबंधित विधेयकावर लोकसभेत धक्का बसल्यानंतरच भाजपने संसदेत दोन-तृतीयांश बहुमत मिळवण्याची रणनीती वेगवान केली होती. पक्षाचे लक्ष केवळ याच विधेयकापुरते मर्यादित नाही, तर ‘एक देश-एक निवडणूक’ आणि न्यायिक सुधारणांसारख्या मोठ्या संवैधानिक बदलांसाठी आवश्यक असलेली ‘सुपर मेजॉरिटी’ मिळवण्यावर आहे….

Read More

Maharashtra Women Farmers Empowerment Bill 2026 Presented in Assembly | Dattatray Bharne | Sunetra Pawar | Women Farmer

शेतात पुरुषांच्या बरोबरीने राबणाऱ्या पण जमिनीवर नाव नसल्याने ‘शेतमजूर’ ठरवल्या जाणाऱ्या महिलांना आता हक्काची आणि कायदेशीर ओळख मिळणार आहे. राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात ‘महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकर . या विधेयकाचा मसुदा देवेंद्र फडणवीस यांच्या थेट देखरेखीखाली तयार करण्यात आला असून, महिलांना आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर करून शेती क्षेत्राचा चेहरामोहरा बदलण्याचा या कायद्याचा…

Read More

एकाच दिवसात 6 लोक खड्ड्यात पडले:गुजरातच्या जुनागढमधील घटना, सीसीटीव्हीमध्ये कैद झाली दृश्ये

गुजरातमध्ये मान्सूनने जोरदार हजेरी लावली आहे आणि जोरदार पावसामुळे आता अपघातही समोर येऊ लागले आहेत. तर, जुनागढ शहरात बुधवारी एकाच दिवसात पाच लोक रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये पडून जखमी झाले. शहरातील आझाद चौक परिसरात दुचाकीस्वार दाम्पत्य खड्ड्यात पडले. तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. ओघडनगर परिसरात तर तीन ते चार लोक एकाच खड्ड्यात पडले. माजेवाडी दरवाजाजवळ एक स्कूटीस्वारही…

Read More

वाशिम न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल!:कोठडीतील मृत्यू प्रकरणी 9 पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा; 15 वर्षांनंतर पारधी कुटुंबाला न्याय

वाशिम जिल्हा सत्र न्यायालयाने एका अत्यंत गंभीर आणि संवेदनशील प्रकरणात ऐतिहासिक निकाल दिला आहे. सन २०११ मध्ये पोलिस कोठडीत असताना झालेल्या अमानुष मारहाणीत एका संशयित तरुणाचा मृत्यू झाला होता. या ‘कस्टोडियल डेथ’ प्रकरणाची गंभीर दखल घेत न्यायालयाने तत्कालीन ठाणेदारासह तब्बल नऊ पोलिस कर्मचाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा सत्र न्यायाधीश जयसिंग झपाटे यांनी हा निकाल…

Read More

बालभारतीच्या अभ्यासक्रमावरून पुन्हा नवा वाद:सहावीच्या मराठी पुस्तकातून महाराष्ट्राचीच लोकनृत्ये गायब; केवळ परराज्यांतील नृत्यांना स्थान

राज्यात एका बाजूला शालेय शिक्षणात ‘सीबीएसई’ पॅटर्न राबवण्यावर आणि मराठी भाषा सक्तीची करण्यावर भर दिला जात आहे. मात्र, दुसरीकडे शिक्षण विभागाच्या गलथान कारभारामुळे महाराष्ट्र आणि मराठी भाषेच्या संदर्भात सातत्याने त्रुटी समोर येत आहेत. आता बालभारतीच्या इयत्ता सहावीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील एका धड्यावरून नवा वाद उफाळून आला आहे. या पुस्तकातील ‘लोकनृत्य’ या पाठात महाराष्ट्रातील समृद्ध लोककलांना डावलून…

Read More

माहिती अधिकार कायद्यातील वादग्रस्त बदलांना स्थगिती:मुख्यमंत्री फडणवीसांच्या पुढाकारानंतर राज्य माहिती आयोगाची माघार; अण्णा हजारेंच्या आंदोलनाला मोठे यश

राज्य सरकारने माहिती अधिकार (RTI) कायद्यात केलेल्या वादग्रस्त बदलांना अखेर तूर्तास स्थगिती दिली आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या बदलांविरोधात आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पुढाकार घेत राज्य माहिती आयोगाशी पत्रव्यवहार केला. त्यानंतर राज्याचे मुख्य माहिती आयुक्तांनी 12 जून रोजी जारी करण्यात आलेल्या सुधारित नियमांना स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे…

Read More

बीड भूसंपादन घोटाळा:बदलीनंतरही काढले बॅकडेटचे आदेश; 241 कोटींच्या गैरव्यवहारातील अतिरिक्त रक्कम वसूल होणार

बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52च्या भूसंपादन प्रकरणातील तब्बल 241 कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्यावर राज्य सरकारने मोठी कारवाई सुरू केली आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी (लवाद) यांनी बदली झाल्यानंतरही मागील तारखांनी आदेश काढून भूसंपादनाची रक्कम वाढवल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून, या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच वितरित झालेली अतिरिक्त…

Read More

माऊलींच्या पालखी रथाला हिंगोलीचा साज:बैलजोडी आळंदीत सजणार, वारकरी सोहळ्याची जय्यत तयारी

संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या आळंदी येथील पालखी रथाची बैलजोडी हिंगोलीच्या साजाने सजणार असून या बैलजोडीसाठी आवश्‍यक असलेला साज आळंदी येथे संस्थानकडे सूपुर्द करण्यात आला आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने राज्यभरातून पालखी सोहळे विट्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूर येथे जातात. लाखो वारकरी आषाढी एकादशीला विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेऊन तृप्त होता. हरिनामाचा गजर करीत निघालेल्या पालखी सोहळा, दिंडी यामुळे संपूर्ण वातावरण…

Read More

ओप्पो रेनो 16 स्मार्टफोन सिरीज भारतात लॉन्च:50 मेगापिक्सेल टेलीफोटो कॅमेऱ्यासह 7000mAh बॅटरी, सुरुवातीची किंमत ₹46,999

ओप्पो ने आज भारतात नवीन स्मार्टफोन सिरीज रेनो 16 लॉन्च केली आहे. यात कंपनीने रेनो 16 आणि रेनो 16C सादर केले आहेत. दोन्ही मोबाईल स्टायलिश लुक, 50 मेगापिक्सल टेलीफोटो आणि 50MP अल्ट्रा वाइड सेल्फी कॅमेरा आणि स्नॅपड्रॅगन 7 जेन 4 प्रोसेसरसह प्रीमियम मिड रेंजमध्ये लॉन्च करण्यात आले आहेत. ओप्पो रेनो 16C तीन व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात…

Read More

निर्भीड लेखणी हरपली:ज्येष्ठ पत्रकार टी. बी. गोल्हर यांचे निधन; नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्षपद म्हणून मोठे योगदान

ज्येष्ठ पत्रकार तुळशीदास भगवंत गोल्हर यांचे गुरुवारी, २ जुलै रोजी पहाटे निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष आणि टिळक पत्रकार भवन ट्रस्टचे माजी अध्यक्ष म्हणून त्यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. मूळचे यवतमाळ जिल्ह्यातील माणिकवाडा (धनज) येथील रहिवासी असलेल्या तुळशीदास गोल्हर यांनी अनेक दशके पत्रकारितेत सक्रिय होते. त्यांनी…

Read More