सतर्क पोलिसांमुळे बालविवाह हाणून पाडला:रहिमतपूरमध्ये 15 वर्षीय मुलीला कायद्याचे संरक्षण, शिक्षण अन् पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू
सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर पोलिसांच्या तत्परतेमुळे अल्पवयीन मुलीचा बालविवाह वेळेत रोखण्यात आला. महिला व बालविकास विभागाच्या समन्वयातून करण्यात आलेल्या या कारवाईमुळे १५ वर्षे ३ महिने वयाच्या मुलीला कायदेशीर संरक्षण मिळाले असून तिचे शिक्षण आणि पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. रहिमतपूर पोलिस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक विनोद नेवसे यांना २६ जून रोजी त्यांच्या कार्यक्षेत्रातील एका…