प्रत्येक केंद्रावर रोज 150 रुग्णांची ओपीडी हवीच:हलगर्जीपणा खपवून घेणार नाही, "आपला दवाखाना'' प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवा; डॉ. कपिल आहेर यांचे आदेश
अहिल्यानगर आपला दवाखाना हा राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी आणि जनतेच्या हक्काचा उपक्रम आहे. त्यामुळे शहरातील प्रत्येक नागरिकाच्या आरोग्याची जबाबदारी आरोग्य विभागाने गांभीर्याने पार पाडलीच पाहिजे. प्रत्येक आरोग्य केंद्रामध्ये दररोज किमान १०० ते १५० रुग्णांची तपासणी (ओपीडी) झालीच पाहिजे. नागरिकांना सर्व औषधोपचार मोफत उपलब्ध असल्याने, कर्मचाऱ्यांनी स्वतः वस्त्यांमध्ये जाऊन या सुविधांबाबत जनजागृती करावी, असे प्रतिपादन नाशिक आरोग्य…