Headlines

सावधान! वीज चमकताना त्वरित उकिडवे बसा:वीज चमकताना डोक्याचे केस उभे राहिल्यास खबरदारी घ्या, हवामान विभागाचा 'अलर्ट'

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) आकाशीय विजेपासून बचाव करण्यासाठी नागरिकांना महत्त्वाचा ‘अलर्ट’ जारी केला आहे. पावसाळ्यात वीज पडण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असून, भारतात दरवर्षी विजेच्या धक्क्याने २,५०० हून अधिक नागरिकांचा बळी जातो. या पार्श्वभूमीवर, नागपूर हवामान विभागाने विशेष मार्गदर्शिका प्रसिद्ध केली आहे. हवामान विभागाने विजेच्या तीव्रतेबद्दल माहिती दिली आहे. आकाशातून पडणाऱ्या विजेमध्ये १० लाख ते १…

Read More

Prakash Ambedkar Slams Air Force Use for NEET Exam; Calls it BJPs Failure

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या नीट परीक्षेसाठी हवाई दलाचा वापर करण्यास कडाडून विरोध केला आहे. भारतीय हवाई दल हे देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी अस्तित्वात आहे, ते भाजपचा नाकर . केंद्र सरकारने नीट पेपरफुटी रोखण्यासाठी आता थेट हवाई दलाची मदत घेण्याच्या मुद्यावर गांभिर्याने विचार सुरू केला आहे. यासंबंधीच्या प्रस्तावानुसार, हवाई…

Read More

मोठी बातमी:शरद पवारांचा एक फोन अन् पुण्यात उमेदवारी फायनल; विधान परिषदेसाठी श्रीकांत पाटील मैदानात, पवारांचा मास्टरस्ट्रोक

पुणे विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत महत्त्वाच्या राजकीय हालचालींना वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने अखेर आपला उमेदवार निश्चित केला आहे. पुणे शहराध्यक्ष श्रीकांत पाटील यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी स्वतः फोन करून श्रीकांत पाटील यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सूचना दिल्याचं…

Read More

MVA चे विधान परिषदेच्या 17 पैकी 15 जागांवर मतैक्य:काँग्रेस 8, ठाकरे 4, शरद पवार गट 3 जागा लढवणार; नांदेड, नाशिकवर तिढा

महाविकास आघाडीच्या नेत्यांना आज झालेल्या बैठकीत विधान परिषद निवडणुकीच्या जागावाटपाचा तिढा बव्हंशी सोडवण्यात यश मिळाले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या माहितीनुसार, 17 पैकी तब्बल 15 जागांवर आघाडीतील तिन्ही घटकपक्षांमध्ये एकमत झाले. त्यात काँग्रेसने 8, उद्धव ठाकरे गटाने 4, तर शरद पवार गटाने 3 जागांवर दावा केला आहे. उर्वरित 2 जागांवर अद्याप चर्चा सुरू असली तरी,…

Read More

साताऱ्यात शरद पवार गटाचा एल्गार:महागाई, इंधन दरवाढ, पेपरफुटीविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला मोर्चा

वाढती महागाई, इंधन दरवाढ, शेतकऱ्यांचे प्रश्न, पेपरफुटीच्या घटना तसेच महिलांवरील अत्याचारांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने शुक्रवारी साताऱ्यात तीव्र आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. मोर्चाचे मुख्य आकर्षण म्हणजे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी बैलगाडीतून केलेली प्रतीकात्मक एंट्री. इंधनाच्या वाढत्या किंमतींविरोधात संताप व्यक्त करण्यासाठी हा…

Read More

देशात 106% पाऊस अपेक्षित:यंदा मान्सून सरासरीपेक्षा अधिक, जूनमध्येही चांगला पाऊस, हवामान विभागाचा अंदाज

भारतीय हवामान विभागाने (IMD) 2026 साठीचा आपला सुधारित मान्सून अंदाज जाहीर केला आहे. या अंदाजानुसार, यंदा देशात सरासरीपेक्षा अधिक म्हणजेच 106 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत देशभरात मान्सूनचा जोर चांगला राहील, असे संकेत कृषी क्षेत्रासाठी अत्यंत सकारात्मक मानले जात आहेत. हवामान खात्याच्या शास्त्रज्ञांच्या विश्लेषणानुसार, सध्या पॅसिफिक महासागरात निर्माण…

Read More

सरकार नावाच्या भिंतीवर डोकं फोडावं, सदाभाऊ खोतांचा संताप:शेणा-मुतात हात घालू नका; गोवंश कायद्यावरून घणाघात

गोवंश हत्या बंदी कायद्याच्या अंमलबजावणीवरून आमदार सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका करत नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे. पंढरपूरमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारच्या धोरणांवर हल्लाबोल केला. आता सरकार नावाच्या भिंतीवर डोकं फोडावं असं वाटतंय. कदाचित त्यानंतर तरी सरकारला अक्कल येईल, अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या जनावरांवर होत असलेल्या कारवाईमुळे ग्रामीण भागात भीतीचं…

Read More

सर्व पिकांना एमएसपीची हमी द्या:साखरेचे दर वाढले तरी हरकत नाही, विजय जावंधियांचे अमित शहा यांना पत्र

शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते विजय जावंधिया यांनी केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांना पत्र लिहून सर्व पिकांना किमान आधारभूत किंमतीचे (MSP) कायदेशीर संरक्षण देण्याची मागणी केली आहे. ऊस आणि साखर उद्योगाला मिळणारे सरकारी संरक्षण इतर पिकांनाही मिळावे, अशी त्यांची भूमिका आहे. या पत्रात जावंधिया यांनी म्हटले आहे की, केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी…

Read More

ओबीसी आरक्षणाला हात लावला तर रस्त्यावर उतरू:मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष पेटणार? तायवाडेंच्या इशाऱ्याने सरकार अलर्ट मोडवर

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी 30 मेपासून पुन्हा उपोषण करण्याचा निर्धार जाहीर केल्यानंतर राज्य सरकारच्या हालचालींना वेग आला आहे. मात्र, जरांगेंच्या आंदोलनाआधीच आता ओबीसी समाजही आक्रमक झाला असून राष्ट्रीय ओबीसी महासंघाने सरकारला थेट इशारा दिला आहे. मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करताना…

Read More

पुण्यात प्रेमप्रकरणातून तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या:आत्महत्येस प्रवृत्त केल्याने महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे शहरातील घोरपडे पेठेत प्रेमप्रकरणातून एका 24 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणी तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश अशोक हलवाई (वय 24, रा. घोरपडे पेठ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. स्वप्नाली संतोष तावरे (वय 32, रा. महाड, जि. रायगड) या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल…

Read More