Headlines

दिल्लीत गेलेल्या महाराष्ट्राच्या मंत्र्यांच्या हाती वाटाण्याच्या अक्षता:कांद्याला दीड नाही 3 हजार रुपयेच भाव द्या, हर्षवर्धन सपकाळांची मागणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भरतेचे गाजर दाखवून अर्थव्यवस्थेकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्यानेच इंधन संकट ओढवले आहे. कोणतेही ठोस धोरण नसल्याने पेट्रोल, डिझेल, सीएनजी, एलपीजी गॅसची मोठ्या प्रमाणात भाववाढ करावी लागत आहे. इंधन कमतरता होणार हे दिसत असतानाही नरेंद्र मोदी पाच राज्याच्या निवडणूक प्रचारात व्यस्त होते, त्याची मोठी किंमत देशातील जनतेला मोजावी लागत आहे. इंधन दरवाढ व…

Read More

खासदार श्रीकांत शिंदे यांच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात:चार गाड्या एकमेकांवर आदळल्या, नांदेडमध्ये घडली घटना

शिवसेना शिंदे गटाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे सध्या नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, ‘शिवसंवाद यात्रे’दरम्यान त्यांच्या ताफ्यातील चार गाड्यांचा विचित्र अपघात झाल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असले, तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ताफ्यातील सर्व कार्यकर्ते आणि कर्मचारी सुरक्षित असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खासदार श्रीकांत…

Read More

जनगणना कामात गैरहजर कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल:सिंहगड रोड परिसरात राष्ट्रीय कर्तव्यात कसूर केल्याने प्रशासनाची कठोर कारवाई

पुणे महानगरपालिकेच्या सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत सुरू असलेल्या जनगणना कामात कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर प्रशासनाने कठोर कारवाई केली आहे. विनाकारण गैरहजर राहणाऱ्या आणि आदेशांकडे दुर्लक्ष करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर सिंहगड रोड पोलीस ठाण्यात थेट गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सिंहगड रोड परिसरात जनगणनेसाठी एकूण १,१७४ ब्लॉक निश्चित करण्यात आले आहेत. या कामासाठी १,१७४…

Read More

येरवडा कारागृहात तंबाखू मागण्यावरून कैद्याला मारहाण:दोन कैद्यांविरुद्ध गुन्हा दाखल

येरवडा कारागृहात तंबाखू मागण्यावरून झालेल्या वादातून एका कैद्याला मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी दोन कैद्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाण करणाऱ्या कैद्यांची नावे अजय शंकर राठोड आणि संतोष सुरेश भालेराव अशी आहेत. वरिष्ठ कारागृह अधिकारी रेवणनाथ कानडे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ मे रोजी सकाळी सात…

Read More

नेहरूंचा जगात नैतिक दबदबा होता:सध्याचे परराष्ट्र धोरण फसले, मालदीवही भारताचे ऐकत नाही; डॉ. मुणगेकर यांची टीका

ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी पं. जवाहरलाल नेहरूंच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित व्याख्यानात नेहरूंचा जगात नैतिक दबदबा होता असे प्रतिपादन केले. सध्याचे परराष्ट्र धोरण फसले असून, मालदीवसारखा छोटा देशही भारताचे ऐकत नाही, अशी टीका त्यांनी यावेळी केली. महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दल यांच्या वतीने पुणे येथील…

Read More

राज्याच्या विकासकामासाठी दिल्लीत आलो होतो:जल जीवन मिशन, कांदो, साखर प्रश्नांवर बैठका झाल्या – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गेल्या दोन दिवसांपासून दिल्ली दौऱ्यावर आहेत. राज्यातील तिन्ही मुख्य नेते दिल्लीत एकाचवेळी असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीत असलेल्या शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधला. ते…

Read More

पेट्रोल-डिझेलवरील 'व्हॅट' आणि 'सरचार्ज' रद्द करा:दरात सवलत देऊन सर्वसामान्यांना दिलासा द्या, जयंत पाटलांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

देशभरात सातत्याने वाढत असलेल्या इंधनाच्या दरांनी सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असून, आता या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जयंत पाटील यांनी इंधन दरवाढीवरून सत्ताधारी महायुती सरकारवर हल्लाबोल केला आहे. राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर आकारला जाणारा व्हॅट (VAT) आणि सरचार्ज रद्द केल्यास इंधनाचे दर लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतात,…

Read More

सावरकरांचा उदोउदो करणाऱ्यांनी तरी त्यांना वाचलंय का?:सावरकरांची प्रतिमा वापरुन तेढ पसरवण्याचा प्रयत्न, राज ठाकरेंनी टोचले कान

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १४३ व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुकवर एक सविस्तर पोस्ट शेअर करत राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर बोचरी टीका केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी सावरकरांच्या विचारांचा केवळ राजकीय वापर करणाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला. सावरकरांचे हिंदुत्त्व, त्यांची विज्ञाननिष्ठा आणि तर्कशुद्ध विचारांचा दाखला देत, “आज जे सावरकरांचा उदोउदो…

Read More

अजित पवारांच्या अपघाताच्या तपासावर युगेंद्र पवारांचे प्रश्नचिन्ह:म्हणाले – चौकशी धिम्या गतीने होत असेल तर, लोकांनी कुणाकडे बघावे?

“अजितदादा असताना आणि नसताना आजच्या बारामतीत जमीन-अस्मानाचा फरक जाणवत आहे. दादांनी बारामतीसाठी पुढील २० वर्षांचे नियोजन करून पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या, मात्र आज त्यांची कमतरता पावलोपावली भासत असून बारामतीकर पोरके झाले आहेत,” अशा शब्दांत अजित पवार यांचे सुपुत्र युगेंद्र पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. याचवेळी त्यांनी अजित पवारांच्या अपघाताच्या चौकशीच्या धिम्या गतीवर प्रश्नचिन्ह…

Read More

राज्यात ईदचा उत्साह; मुस्लिम बांधवांकडून शांतता, समृद्धीसाठी प्रार्थना:एकादशीचा आदर राखत पंढरपुरात कुर्बानी टाळली

राज्यभरात आज बकरी ईद अर्थात ईद-उल-अधा मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरी करण्यात आली. मुंबई, सोलापूर, नाशिक, भुसावळसह अनेक शहरांमध्ये मुस्लिम बांधवांनी सकाळी सामूहिक नमाज पठण करत शांतता, बंधुभाव आणि देशाच्या प्रगतीसाठी प्रार्थना केली. यंदा विशेष म्हणजे बकरी ईद आणि एकादशी एकाच दिवशी आल्यामुळे अनेक ठिकाणी सामाजिक सलोखा आणि परस्पर आदराचे चित्र पाहायला मिळाले. हिंदू…

Read More