रामायण हा केवळ धार्मिक ग्रंथ नव्हे, तर जगण्याचा संस्कार!:संतोष महाराज कौठाळे यांचे निरुपण, निमगावात 9 दिवस चालला श्रीराम नामाचा गजर
रामायण हा केवळ एक धार्मिक ग्रंथ नसून, मानवी जीवनाला योग्य दिशा देणारा संस्कारमूल्यांचा दीपस्तंभ आहे, असे निरुपण प्रभू श्रीरामांचे आदर्श जीवन, सत्य, कर्तव्य, त्याग आणि भक्तीचे महत्त्व विशद करताना रामायणाचार्य संतोष महाराज कौठाळे (देवदैठण) यांनी केले . नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे आयोजित श्रीराम कथेचा भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात समारोप झाला. नऊ दिवस संपूर्ण गावात…