Headlines

रामायण हा केवळ धार्मिक ग्रंथ नव्हे, तर जगण्याचा संस्कार!:संतोष महाराज कौठाळे यांचे निरुपण, निमगावात 9 दिवस चालला श्रीराम नामाचा गजर‎

रामायण हा केवळ एक धार्मिक ग्रंथ नसून, मानवी जीवनाला योग्य दिशा देणारा संस्कारमूल्यांचा दीपस्तंभ आहे, असे निरुपण प्रभू श्रीरामांचे आदर्श जीवन, सत्य, कर्तव्य, त्याग आणि भक्तीचे महत्त्व विशद करताना रामायणाचार्य संतोष महाराज कौठाळे (देवदैठण) यांनी केले . नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे आयोजित श्रीराम कथेचा भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात समारोप झाला. नऊ दिवस संपूर्ण गावात…

Read More

निफाडला जिल्हा कबड्डी स्पर्धेत 24 संघांचा सहभाग:धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजन‎

क्रीडा प्रबोधिनी निफाड यांच्या वतीने स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. स्पर्धेत जिल्ह्यातील २४ संघांनी सहभाग नोंदवला होता. निफाडकर क्रीडाप्रेमींच्या उत् . स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी शिवसेना निफाड तालुकाप्रमुख तथा उपनगराध्यक्ष अनिल कुंदे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास डोळ्यांसमोर ठेवून शौर्य,…

Read More

Sanjay Khade, work to instill values, addiction-free living, and social awareness among students

Marathi News Local Maharashtra Aurangabad Saints Worked To Provide Good Values To The Society Through Spirituality: Sanjay Khade, Work To Instill Values, Addiction free Living, And Social Awareness Among Students पाचोड12 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पैठण तालुक्यातील पारुंडी येथील पारसनाथ गोशाळेत पारसनाथ गोशाळा व ज्ञानदा वारकरी शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने उन्हाळी सुट्टीत दहादिवसीय बालसंस्कार शिबिराचे…

Read More

कंपन्यांची एनर्जी, डिफेन्स, इन्फ्रावर 10.5 लाख कोटींची मोठी गुंतवणूक:युद्धस्थितीने एअरटेल, टाटासह सर्वांनी बदलली रणनीती

जगभरात सुरू असलेला भू-राजकीय तणाव आणि आर्थिक अनिश्चिततेच्या काळात भारतीय कॉर्पोरेट जगताने देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी कंबर कसली आहे. टाटा, अदानी, जेएसडब्ल्यू आणि कोल इंडियासारख्या दिग्गज कंपन्या आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये आक्रमक कॅपिटल एक्सपेंडिचर करणार आहेत. आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या ताज्या स्ट्रॅटेजी रिपोर्टनुसार, भारतीय कंपन्यांनी सावधगिरीऐवजी क्षमता विस्ताराला प्राधान्य दिले आहे. कंपन्यांची ही गुंतवणूक आता ऊर्जा सुरक्षा,…

Read More

नीट पेपरफुटी:6 दिवसांपूर्वीचा साक्षीदार डाॅ. शिरुरेसह पुण्यातील क्लासचा शिक्षकही अटकेत, बालरोगतज्ज्ञ शिरुरे, तेजस शाहला 5 दिवसांची सीबीआय कोठडी

नीट पेपरफुटीप्रकरणी २१ मे रोजी लातूर येथून बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरेला ताब्यात घेऊन त्याला सीबीआयचा साक्षीदार बनवण्यात आले होते. त्यानंतर झालेल्या तपासात शिरुरेने मुख्य आरोपी, केमिस्ट्री पेपरसेटर लातूर येथील प्रा. पी. व्ही. कुलकर्णीकडून लीक झालेले . नीट प्रकरणात यापूर्वी अटक झालेल्या प्रा. मनीषा हवालदारकडून त्याने भौतिकशास्त्राचे प्रश्न मिळवले होते, असे सीबीआयच्या निदर्शनास आले. या कारवाईमुळे…

Read More

मुंबई, पुणे, ठाण्यात सोसायट्यांतील ‘कुर्बानी’ला नागरिकांचा विराेध:निषेधानंतर पोलिस-प्रशासनाकडून उघड्यावर कत्तलीस मनाई

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह ठाण्यातील मीरा रोड आणि पुण्यातील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये कुर्बानीवरून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरी वस्त्यांमध्ये आणि सोसायटीच्या आवारात कुर्बानी देण्यास रहिवाशांनी विरोध दर्शवल्याने प्रशासकीय पेच वाढला आहे. या वादानंतर मुंबईत १३ हजारांहून अधिक पोलिसांचा फौजफाटा तैनात केला आहे. उघड्यावर कुर्बानी देण्यास प्रशासनाने सक्त मनाई केली. मुंबईतील घाटकोपर आणि गोरेगाव येथील काही…

Read More

पेरणी हंगाम पूर्वीच आर्वीत बनावट बोगस बियाणे रॅकेटवर धाड:आर्वीत २९ लाखांचे बोगस बियाणे जप्त

खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना, शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या बोगस बियाणे विक्रेत्यांवर कृषी विभाग आणि पोलिसांनी मोठी संयुक्त कारवाई केली आहे. आर्वी तालुक्यातील शिरपूर (बोके) येथे एका गोदामावर छापा टाकून तब्बल २९ लाख ४६ हजार ८४६ रुपये किमतीचा एचटीबीटी (HTBT) बोगस बियाण्यांचा साठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी एका ५२ वर्षीय आरोपीला…

Read More

अचलपूर येथील पाटस्करांचा देहदानाचा संकल्प:पुनर्जीवन फाउंडेशनच्या माध्यमातून पुढाकार

अचलपूर शहरातील सरमसपूरा निवासी सुरेशराव ताराचंद पाटस्कर यांनी मरणोत्तर देहदान व अवयवदानाचे संकल्पपत्र भरले आहे. पुनर्जीवन फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी हा संकल्प केला असून, यामुळे समाजात एक प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला आहे. समाजकार्याची आवड जपणारे सुरेशराव पाटस्कर यांनी ‘मृत्यूनंतरही समाजासाठी काहीतरी देणं लागतं’ या भावनेतून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. याप्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांसह सुनबाई उपस्थित होत्या. पुण्यात…

Read More

अमरावती जीएमसी हस्तांतरणाचा तिढा कायम:तिसरे वर्ष अडचणीत, डीनला तिन्ही रुग्णालये हवीत; यंत्रणा म्हणते गरजेनुसार घ्या

अमरावती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (जीएमसी) शैक्षणिक वाटचालीत पुन्हा एकदा मोठा अडथळा निर्माण झाला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन रुग्णालय) अद्यापही पूर्णपणे जीएमसी प्रशासनाकडे हस्तांतरित न झाल्यामुळे तिसरे शैक्षणिक वर्ष अडचणीत आले आहे. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग (एनएमसी), वैद्यकीय शिक्षण परिषद आणि आरोग्य विज्ञान विद्यापीठाने या दिरंगाईची गंभीर दखल घेतली आहे. इर्विनचा ताबा न घेतल्यामुळे जीएमसीतील…

Read More

राष्ट्र विकासासाठी त्याग करणारा शेतकरी आजही वंचित:बळीराजा प्रकल्पग्रस्त संघटनेच्या वर्धापन दिनी सुरेखाताई ठाकरे यांचे मत

राष्ट्र विकासासाठी सर्वस्वाचा त्याग करणारा शेतकरी हा समाजातील एकमेव घटक आहे, परंतु दुर्दैवाने तोच शेतकरी आजही आपल्या हक्क व अधिकारांपासून वंचित आहे, असे मत जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा श्रीमती सुरेखाताई ठाकरे यांनी व्यक्त केले. त्या अमरावती येथील पंचवटी चौक स्थित वऱ्हाडे मंगल कार्यालयात आयोजित बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेच्या वर्धापनदिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. या कार्यक्रमाला…

Read More