Headlines

पुण्यात विविध अपघातांत तीन जणांचा मृत्यू:पाषाण, पुणे-सोलापूर रस्ता आणि येरवडा परिसरात घटना

पुणे शहरात विविध अपघातांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. पाषाणमधील सूस रस्ता, पुणे-सोलापूर रस्ता आणि येरवड्यातील गोल्फ क्लब परिसरात या घटना घडल्या. या अपघातांमध्ये एका सहप्रवाशाचा, एका रिक्षाचालकाचा आणि एका पादचाऱ्याचा समावेश आहे. पाषाण-सूस रस्त्यावर गतिरोधकावरून दुचाकी घसरल्याने झालेल्या अपघातात प्रसाद सुनील शेकडे (वय २०, रा. बोईसर, पालघर) या सहप्रवाशाचा मृत्यू झाला. या अपघातात दुचाकीस्वार…

Read More

भोंदू अशोक खरातच्या 'लीला' आता पडद्यावर:दीपाली सय्यद यांची महत्त्वाची भूमिका, रुपाली चाकणकर साकारणार असल्याची चर्चा

अवघ्या महाराष्ट्रात खळबळ माजवणाऱ्या भोंदू अशोक खरात व त्याच्या कारनाम्यांवर आता चित्रपट येणार असल्याची माहिती आहे. या चित्रपटात सत्ताधारी शिवसेनेच्या पदाधिकारी दीपाली सय्यद प्रमुख भूमिकेत दिसून येणार आहेत. त्यामुळे त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा या प्रकरणातील एक कथित प्रमुख संशयित असणाऱ्या रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेत दिसणार काय? अशी चर्चा सिनेरसिकांत रंगली आहे. भोंदू अशोक खरातवर…

Read More

CID ही कुचकामी यंत्रणा, बिनकामाचे ओझे:रोहित पवार यांचा आरोप; मुख्यमंत्र्यांना दादांच्या अपघाती मृत्यू प्रकरणात लक्ष घालण्याचे आवाहन

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सीआयडी सारखी यंत्रणा कुचकामी व बिनकामाचे ओझे असल्याचा आरोप करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अजित पवारांच्या अपघाती मृत्यू प्रकरणात लक्ष घालण्याचे आवाहन केले आहे. अजितदादांच्या अपघात प्रकरणात सीआयडी करत असलेला तपास बघता, ही तपास यंत्रणा काय करते नेमके हेच कळत नाही. CID सारख्या कुचकामी यंत्रणा म्हणजे…

Read More

2029 मध्येही तिन्ही पक्ष महायुती म्हणून एकत्र निवडणूक लढवणार:सुनेत्रा पवारांना अर्थखाते मिळणारच, दिल्ली दौऱ्यात भाजप सन्मान राखेल- हसन मुश्रीफ

प्रत्येक पक्ष हा निवडणुकीची स्वतंत्र तयारी करत असतो. पण मला वाटते की 2029 मध्येही महायुती म्हणून तिन्ही पक्ष निवडणुकीला सामोरे जातील. प्रफुल्ल पटेल हे काही कामानिमित्त बैठकीला उपस्थित नव्हते. प्राजक्त तनपुरे यांनी विधान सभेची पोटनिवडणूक लढवली नाही त्यावेळेसच ते महायुतीकडे आहेत हे सिद्ध झाले होते, असे मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे. हसन मुश्रीफ म्हणाले…

Read More

Nagpur Duo Booked For Rs 6.21 Lakh Fraud

हिंगोली पंचायत समितीमध्ये आऊटसोर्सिंगमधून नोकरी लावण्याचे आमिष दाखवून 6.21 लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या नागपूर येथील दोघांवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात मंगळवारी ता. 26 रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे. . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगोली शहरातील संगणक प्रशिक्षण केंद्र चालक शरद मोहारे यांची दोन वर्षापूर्वी नागपूर येथील ॲडराईट मॅनेजमेंट सर्व्हिसेसचे विरेंद्र वाटकर व जगदिश राऊत यांच्याशी…

Read More

आप्तजनांपेक्षा मोबाईल प्रिय झाल्यानेच समाजात दु:ख वाढले- रेवतीनंदन दास:अहिल्यानगरात इस्कॉनच्या श्रीमद् भागवत कथेचा थाटात शुभारंभ‎

परिवारातील आप्तजनांपेक्षा आजच्या पिढीला मोबाईल अधिक प्रिय झाल्यानेच मानवी जीवनातील वैयक्तिक आणि कौटुंबिक दुःख वाढत चालले आहे, असे परखड प्रतिपादन पुणे येथील “इस्कॉन’ मंदिराचे ज्येष्ठ ब्रम्हचारी रेवतीनंदन दास यांनी केले. येथील नवीन टिळक रस्त्यावरील माऊली सांस्कृतिक भवनमध्ये आयोजित श्रीमद् भागवत कथा निरूपण सोहळ्याच्या शुभारंभप्रसंगी ते मुख्य निरूपणकार म्हणून बोलत होते. सोहळ्याचे उद्‌घाटन महापौर ज्योतीताई गाडे…

Read More

फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, विदर्भ- मराठवाड्यात उद्योगक्रांती:राज्यात उभारले जाणार ऊर्जा आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील विशाल प्रकल्प; हजारो तरुणांना रोजगार

राज्यात औद्योगिक गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीला मोठी चालना देणारा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत ₹89,731 कोटींच्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्यास मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पांमुळे राज्यात सुमारे 20 हजार प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार असल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला…

Read More

वरुडमधील 32 टक्के लाभार्थी एप्रिलच्या रेशनपासून वंचित:मुदतवाढीसाठी आ. यावलकर यांनी घेतली अन्न व नागरी पुरवठा मंत्री भुजबळ यांची भेट‎

महाराष्ट्र शासनाने एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांचे रेशन एकत्र देण्याचा निर्णय घेतला खरा. परंतु प्रशासकीय ढिसाळपणामुळे वरुड तालुक्यातील हजारो लाभार्थी एप्रिल महिन्याच्या अन्नधान्यापासून वंचित राहिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या गंभीर समस्येची दखल घेत मोर्शी विधानसभेचे आमदार चंदू यावलकर यांनी थेट मंत्रालयात अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली….

Read More

श्री रूपनाथ महाराज संस्थानला ‘ब’ वर्ग दर्जाची मागणी:2.50 कोटी मंजूर, तीर्थक्षेत्र पर्यटन योजनेंतर्गत 2.50 कोटीतून 90% कामे पूर्ण‎

तालुक्यातील दहीहंडा येथील श्री संत रूपनाथ महाराज संस्थानला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी आ. रणधीर सावरकर यांनी ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे केली आहे. यासंबंधीचा प्रस्ताव आवश्यक दस्तऐवजांसह ग्रामविकास विभागाच्या सह . श्री रूपनाथ महाराज संस्थान हे केवळ जिल्ह्यातीलच नव्हे, तर राज्यातील लाखो भाविक भक्तांचे मोठे श्रद्धास्थान आहे. महाराजांच्या दर्शनासाठी आणि आशीर्वादासाठी येथे…

Read More

13 to 20 Rupees from June 1, 2026

मुंबईकरांच्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग असलेला वडापाव आता अधिक महाग होणार आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने स्थानकांवरील खाद्यपदार्थांच्या दरात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला असून 1 जून 2026 पासून हे नवे दर लागू होणार आहेत. यामुळे रोज रेल्वेने प्रवास . मुंबई ही स्वप्नांची नगरी म्हणून ओळखली जाते. रोज हजारो लोक काम, शिक्षण आणि व्यवसायासाठी लोकल रेल्वेचा…

Read More