राजकीय आघाड्या मजबूत होतील, पण पक्ष विलीन होणार नाहीत:वेरुळमधील शिक्षकाचा मृत्यू म्हणजे पोलिसी गुंडशाहीचा कळस- अंबादास दानवे
सध्या राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या विविध पक्षांच्या विलीनीकरणाच्या चर्चांना उबाठाचे नेते अंबादास दानवे यांनी पूर्णविराम दिला आहे. कोणताही पक्ष दुसऱ्या पक्षात विलीन होणार नाही, असे स्पष्ट करत राष्ट्रवादी काँग्रेस किंवा तृणमूल काँग्रेसची काँग्रेससोबत केवळ आघाडी असून ती आगामी काळात अधिक मजबूत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, राष्ट्रवादीच्या तीन आमदारांनी भाजप प्रदेशाध्यक्षांची घेतलेली भेट…