Headlines

पिंपरी-चिंचवड महापालिकेत एसीबीची कारवाई:70 हजारांची लाच स्वीकारताना अभियंत्याच्या लाचलुचपत विभागाने आवळल्या मुसक्या

पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ड’ प्रभाग क्षेत्रीय कार्यालयातील बीट निरीक्षकाला 70 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली आहे. अनधिकृत बांधकामावर कारवाई न करण्यासाठी त्याने ही लाच मागितली होती. उमेश अरुण लोंढे (वय 28, रा. रहाटणी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (वर्ग-3) अधिकाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणात 58 वर्षीय तक्रारदाराने…

Read More

गतवर्षीपेक्षा "महान'मध्ये 8% जास्त जलसाठा:पाणीपातळी 23.09 टक्क्यांवर, पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आवाहन‎

शहरासह मूर्तिजापूर, बोरगाव मंजू, अकोला एमआयडीसी, महान मत्स्यबीज केंद्र तसेच खांभोरा – उन्नई ग्रामीण पाणीपुरवठा योजनेंतर्गत येणाऱ्या ६४ गावांचा पिण्याच्या पाण्याचा मुख्य आधार असलेल्या महान धरणात सध्या २३.०९ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. विशेष म्हणजे, गतवर्षीच्या तुलनेत यंदा धरणात सुमारे ८ टक्के अधिक पाणीसाठा असूनही पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पावसाने पाठ फिरवल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. शहराच्या…

Read More

जळगाव विधान परिषदेचा पेच:गिरीश महाजन म्हणाले तिढा सुटला; पण रेश्मा काळे अचानक झाल्या 'नॉट रिचेबल', महायुतीची धाकधूक वाढली

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीसमोरील बंडखोरीचे संकट संपल्याचे चित्र निर्माण झाले होते. नाशिकमधील बंडखोरीचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर जळगावचाही तिढा सुटल्याचा दावा मंत्री गिरीश महाजन यांनी केला होता. मात्र, त्यानंतर घडलेल्या एका अनपेक्षित घडामोडीमुळे महायुतीच्या नेत्यांची चिंता पुन्हा वाढल्याचे दिसत आहे. शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे या अचानक ‘नॉट रिचेबल’ झाल्याने जळगावच्या राजकारणात नवा सस्पेन्स निर्माण…

Read More

शेतीसह घरगुती, व्यावसायिक पाणीपट्टीत 10%वाढ प्रस्तावित:1 जुलैपासून दहा टक्क्यांपर्यंत दर वाढवण्याचा प्रस्ताव, शासनाला 2 हजार 300 काेटींचा महसूल अपेक्षित

एकीकडे महाराष्ट्रातील जनता पावसाकडे डोळे लावून बसलेली असताना दुसरीकडे महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने विविध धरणातून किंवा जलस्त्रोतातून शेतीला आणि शहरांना पिण्यासाठी होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या दरात 2026 ते 2029 या कालावधीसाठी दहा टक्क्यांपर्यंत वाढ प्रस्तावित केली आहे. दरम्यान, प्रस्तावाच्या सविस्तर मसुद्यात कृषीसाठी वापराच्या पाण्यात 2022 पासून घट झाली असून औद्योगिक आणि घरगुती पाण्याचा वापर मात्र वाढल्याचे समोर…

Read More

राम मंदिराच्या दानपेटीतून 5 कोटींचा अपहार:पैसे चोरणारा कोण? संजय राऊतांचा मोदी सरकारवर थेट हल्ला; अयोध्या दौऱ्याची घोषणा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजप आणि केंद्र सरकारवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या दानपेटीतून तब्बल 5 कोटी रुपयांचा अपहार झाला आहे. हे रामललाच्या चरणी आलेले पैसे वारंवार कोण चोरत आहे?” असा खळबळजनक सवाल उपस्थित करत राऊतांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी…

Read More

अल्पवयीन मुलीची दाेन लाखांत विक्री:मुली विकणारी टाेळी नाशकात अटकेत, नाशिक जिल्ह्यातील हरसूल येथील घटना

आईचे छत्र हरपलेल्या 16 वर्षीय मुलीला मोबाईल आणि नविन कपडे घेऊन देण्याचे अमिष दाखवून तिचे नाशिक जिल्ह्यातील हरसूलनजीकच्या गावातून अपहरण करण्यात आले. अहिल्यानगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यातील कौठे मलकापूर गावात तिचा बाल विवाह करून देण्यात आला. तेथील वरासाठी मुलगी शोधून देण्याकरिता 2 लाखांची दलाली घेतलेला संशयित आणि पतीसह 10 संशयितांना हरसूल पोलिसांनी अटक केली. तुषार पाचपिंड…

Read More

मेसमध्ये जास्तीचे जेवण घेतले म्हणून 17वर्षीय विद्यार्थ्याला पाइप, बेल्टने मारहाण:छत्रपती संभाजीनगरमधील ‘भारत करिअर अकॅडमी’तील प्रकार‎

पडेगाव येथील ‘भारत करिअर अकॅडमी” या‎ पोलिस भरती अकॅडमीमध्ये शिकणाऱ्या एका 17 ‎वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्याला मेसमध्ये जास्तीचे ‎जेवण घेतल्याच्या क्षुल्लक कारणावरून रबरी ‎पाइप, बेल्ट व काठीने बेदम मारहाण केल्याची ‎धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ‎एवढेच नव्हे, तर क्रूरतेची सीमा ओलांडत ‎विद्यार्थ्याला भिंतीला पाय लावून उलटे उभे‎ राहण्याची अमानुष शिक्षा देण्यात आली.‎ याप्रकरणी क्लासेसचा व्यवस्थापक तथा…

Read More

श्वान निर्बीजीकरणाचे टेंडर पडून, चारदा निविदा काढूनही कंत्राटदार मिळेना:अकोटमध्ये भटक्या श्वानांची संख्या वाढल्याने नागरिक त्रस्त‎

शहरातील भटक्या श्वानांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी अकोट नगरपरिषदेकडून काढण्यात आलेले श्वान निर्बीजीकरणाचे टेंडर प्रतिसादाअभावी पडून राहिले आहे. संबंधित कामासाठी एकाही कंत्राटदाराने किंवा संस्थेने निविदा दाखल न केल्याने निर्बीजीकरणाची मोहीम रखडली आहे. शहरात भटक्या श्वानांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, नागरिकांकडून श्वानांच्या उपद्रवाबाबत वारंवार तक्रारी केल्या जात आहेत. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि सकाळ-संध्याकाळ फिरण्यासाठी…

Read More

सोमय्या यांना येण्यास एमआयएमचा विरोध:घोषणाबाजीसह वाहन अडविल्याने उडाला गोंधळ‎

भाजपचे माजी खासदार किरीट ‎‎सोमय्या यांच्या अमरावती‎महापालिका भेटीदरम्यान ‎‎एमआयएमच्या नगरसेवकांनी तीव्र ‎‎आक्षेप घेत जोरदार विरोध केल्याने ‎‎एकच गोंधळ उडाला. सोमय्या यांनी ‎‎परत जावे, अशा घोषणा देत ‎‎एमआयएमचे नगरसेवक‎सोमय्यांचा ताफा अडवण्यासाठी‎पुढे सरसावले. पोलिसांनी‎नगरसेवकांना अक्षरशः ओढत व ‎‎फरफटत नेले. यामुळे काही वेळ‎मनपात तणावाचे वातावरण निर्माण‎झाले होते. दरम्यान, पोलिसांनी‎आंदोलक नगरसेवकांना ताब्यात‎घेत सोमय्यांचा मार्ग मोकळा केला.‎सुरक्षेसाठी लावण्यात आलेल्या‎तगड्या बंदोबस्तामुळे…

Read More

सावंगा विठोबा नगरी भक्तीत लीन:‘चंदन उटी’ उत्सवाची रेलचेल सुरु, सेवाधारी भजनकारांचा सत्कार, मांड वाढवा कार्यक्रमही होणार‎

जिल्ह्याच्या चांदूर रेल्वे तालुक्यातील श्री क्षेत्र सावंगा (विठोबा) येथे ज्येष्ठ मास अमावस्येचे औचित्य साधून विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्री विठोबा संस्थान उर्फ श्रीकृष्ण अवधूत बुवा संस्थानच्या वतीने हे कार्यक्रम पार पडणार आहेत. परिसरात सध्या भक्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. संस्थानच्या वतीने १५ जून, सोमवार रोजी सायंकाळी ५ वाजता संस्थान परिसरात…

Read More