Headlines

बेमुदत संपामुळे नागरिकांपुढील अडचणी वाढल्या:महसूलचे 100%, आरोग्य विभागाचे 70% कर्मचारी संपावर; दाखले, रुग्णसेवा प्रभावित

अमरावती: जुनी पेन्शन योजना आणि इतर मागण्यांसाठी सरकारी, निमसरकारी कर्मचारी व शिक्षकांनी मंगळवार, २१ एप्रिलपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपामुळे महसूल विभागाचे १०० टक्के तर आरोग्य विभागाचे ७० टक्के कर्मचारी कामावर नाहीत. यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. संपाच्या पहिल्याच दिवशी तहसील कार्यालयातून दिले जाणारे दाखले मिळू शकले नाहीत. दुसरीकडे, आरोग्य विभागातील…

Read More

सामान्य महिलेने भाजपला आरसा दाखवला:वरळीतील गोंधळावरून विजय वडेट्टीवारांचा बोचरा वार, रोहित पवारांचीही टीका

वरळी येथे महायुतीच्या ‘आक्रोश मोर्चा’मुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीत एका सामान्य महिलेने भाजपचे नेते आणि राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांना खरीखोटी सुनावली. या प्रकरणावरून आता विरोधकांकडून भाजपवर निशाणा साधण्यात येत आहे. “भाजपच्या फोकनाड घोषणांपेक्षा सामान्य महिलेचा ‘इथून चालते व्हा’ हा एकच आवाज जास्त पॉवरफुल ठरला,” अशा बोचऱ्या शब्दांत काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर टीकास्त्र…

Read More

बालविवाह मुक्त भारत अभियानांतर्गत मोठी कारवाई:अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर 32 बालविवाह रोखले, मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

राज्यात अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर महिला व बाल विकास विभागाने ‘स्पेशल फोर्स’च्या माध्यमातून मोठी कारवाई करत एकाच दिवशी तब्बल ३२ बालविवाह रोखण्यात यश मिळवले असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. बाल विवाह प्रतिबंध अधिनियम, २००६ नुसार १८ वर्षांखालील मुलगी व २१ वर्षांखालील मुलाचा विवाह लावणे हा दंडनीय गुन्हा असून, बाल विवाह…

Read More

महायुतीच्या मोर्चामुळे वरळीत वाहतूक कोंडी:संतप्त महिलेने गिरीश महाजनांनाच झापले, मैदानात जाऊन आंदोलन करा म्हणत संताप व्यक्त

महिला आरक्षण विधेयक संमत न झाल्याच्या निषेधार्थ आज वरळीत महायुतीकडून जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. मात्र, या मोर्चात एक वेगळाच पेच पाहायला मिळाला. मोर्चामुळे झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीत तासाभरापासून अडकलेल्या एका सामान्य महिलेचा संयम सुटला आणि तिने थेट मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर आपला संताप व्यक्त केला. “लोकांना वेठीस धरून रस्त्यावर आंदोलन करण्यापेक्षा बाजूच्या मैदानात जा,” अशा…

Read More

विश्रामबाग वाडा प्रभाग समिती अध्यक्षपदी बाप्पू मानकर बिनविरोध:अध्यक्षपदाची गाडी नाकारून वाचलेला निधी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी देण्याचा निर्णय

भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक राघवेंद्र (बाप्पू) मानकर यांची विश्रामबाग वाडा प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. निवडीनंतर त्यांनी अध्यक्षपदासाठी मिळणारी शासकीय गाडी नाकारत, त्यातून वाचणारा निधी गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वापरण्याची विनंती प्रशासनाला केली आहे. त्यांच्या या निर्णयाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. मंगळवारी पुणे महानगरपालिकेच्या १५ प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. या…

Read More

संसाराची स्वप्ने राहिली अधुरीच:पाटणमध्ये पिकअप-दुचाकीच्या अपघातात नवदाम्पत्य ठार, 10 दिवसांपूर्वीच झाले होते लग्न

संसाराची स्वप्ने डोळ्यांत घेऊन नातेवाईकाच्या लग्नाला निघालेल्या नवदाम्पत्यावर काळाने भीषण झडप घातली आहे. विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्गावर पाटण तालुक्यातील येरफळे गावच्या हद्दीत सोमवारी दुपारी पिकअप आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात राजू झोरे (वय २५) आणि राणी झोरे (वय २३) हे पती-पत्नी जागीच ठार झाले. अवघ्या दहा दिवसांपूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. हातावरची मेहंदी आणि…

Read More

मराठीच्या सक्तीवरून रिक्षाचालक युनियन आक्रमक:4 मे पासून 15 लाख चालकांचा राज्यव्यापी संपाचा इशारा, 28 एप्रिलला अल्टिमेटम

राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावरून आता मोठा पेच निर्माण झाला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी १ मे पासून या नियमाची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले असतानाच, रिक्षाचालकांच्या सर्वात मोठ्या संघटनेने याविरोधात एल्गार पुकारला आहे. या नियमाच्या निषेधार्थ ४ मे पासून राज्यातील तब्बल १५ लाख रिक्षाचालक बेमुदत…

Read More

पंढरपूर विकास आराखड्याच्या कामास गती द्या:वारकऱ्यांना अडचणी येणार नाही याची काळजी घ्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

आषाढी वारी काळात निघणाऱ्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना चांगल्या सुविधा मिळण्यासाठी दोन्ही पालखी मार्गावरील पालखीतळे अधिक चांगली व सुविधायुक्त करण्यात यावीत, वारकरी भाविकांना अडचणी येऊ नयेत याची दक्षता घ्यावी तसेच पंढरपुरात येणाऱ्या भाविकांना व स्थानिक नागरिकांना पायाभूत सुविधा मिळाव्यात यासाठी पंढरपूर विकास आराखड्याच्या कामास गती…

Read More

'दगडूशेठ'च्या मोफत आरोग्य सेवा केंद्राचे लोकार्पण:तपासणी, औषधे, श्रवणयंत्र व कृत्रिम अवयव मोफत मिळणार

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने सारसबागेजवळील हिराबाग कोठी परिसरात मोफत आरोग्य सेवा केंद्राचे लोकार्पण केले आहे. ‘रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’ या ब्रीदानुसार उभारलेल्या या केंद्रात रुग्णांना विविध प्रकारच्या तपासण्या, औषधे, श्रवणयंत्रे आणि कृत्रिम अवयव मोफत मिळणार आहेत. राज्याच्या आरोग्य सेवा विभागाचे संचालक डॉ. विजय कंदेवाढ यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन झाले. यावेळी पुणे मनपा आरोग्य…

Read More

पालघर हादरले:अनधिकृत फटाका कारखान्यात भीषण स्फोट; एका कामगाराचा मृत्यू, 4 महिला गंभीर; वाडा येथील घटना

पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कोणसई येथे एका अनधिकृत फटाका कारखान्यात आज दुपारी भीषण स्फोट झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या दुर्घटनेत भावेश दिलीप वावरे (२५) या तरुण कामगाराचा जागीच मृत्यू झाला असून, चार महिला कामगार गंभीर जखमी झाल्या आहेत. सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या या मृत्यूच्या कारखान्यामुळे प्रशासकीय यंत्रणेच्या दुर्लक्षाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे….

Read More