Headlines

नाशिक IT प्रकरणात तरुणींनी दाखल केला खोटा गुन्हा?:आरोपींच्या वकिलांचा कोर्टात दावा; प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता

नाशिक आयटी कंपनीतील कथित लैंगिक शोषणाच्या प्रकरणातील आरोपींच्या वकिलांनी कोर्टात एकत्र काम करताना झालेल्या वादातून आपल्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे अवघ्या राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या या प्रकरणाला एक वेगळे वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नाशिक स्थित टीसीएस कंपनीत कार्यरत असणाऱ्या तरुणींवर लैंगिक अत्याचार झाल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. या…

Read More

महाराष्ट्रातील स्मार्ट शेतीसाठी 90 कोटींची परदेशी गुंतवणूक:दावोस करारांतर्गत न्यूट्रीफ्रेश फार्म्सला अमेरिकेकडून निधी, प्रकल्प लवकरच कार्यान्वित

महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राच्या विकासाला चालना देण्यासाठी अमेरिकेतील इंटरनॅशनल डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन (यूएसआयडीएफसी) या संस्थेकडून 90 कोटी रुपयांची गुंतवणूक न्यूट्रीफ्रेश फार्म्सला प्राप्त झाली आहे. दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत झालेल्या सामंजस्य कराराचा हा एक भाग आहे. दावोस येथे महाराष्ट्र शासन, रूरल एन्हान्सर्स आणि न्यूट्रीफ्रेश फार्म्स यांच्यात नियंत्रित वातावरणातील शेतीसाठी 2500 कोटी रुपयांचा सामंजस्य करार झाला होता….

Read More

संघर्ष करा म्हणणाऱ्यांनाच सवाल; नवनीत राणांची पोस्ट चर्चेत:सोबत आहात तर संघर्ष कशासाठी? भाजपमधील नाराजी उफाळली?

अमरावतीत माजी खासदार नवनीत राणा पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत पराभवाचा सामना केल्यानंतरही त्यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांसाठी सक्रिय प्रचार केला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. पक्षातील अंतर्गत मतभेद, राज्यसभेची संधी न मिळाल्याची खंत या मुद्द्यांवर त्यांनी थेट भाष्य केले नसले तरी त्यांच्या समाज माध्यमांवरील…

Read More

महिला नको त्या भाषेत बोलत होत्या:मोर्चावर पाण्याची बॉटलही फेकून मारली, संतप्त महिलेवर मंत्री गिरीश महाजनांची प्रतिक्रिया

मुंबईच्या वरळी येथे महायुतीच्या आक्रोश मोर्चामुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीत एका सामान्य महिलेने भाजपचे नेते आणि राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांना चांगलेच सुनावल्याचे पाहायला मिळाले. यावरून विरोधकांनी सरकारवर विशेषतः भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आता काल घडलेल्या प्रकरणावर मंत्री गिरीश महाजन यांनी माध्यमांसमोर येऊन प्रतिक्रिया दिली आहे. तसेच त्या महिलेची भाषा योग्य नव्हती, त्या वाट्टेल…

Read More

‘हजारोंसे भारी, एक नारी’:शेकडो 'नारी शक्ती' पुढं येऊन भाजपचा मुखवटा टराटरा फाडतील; महिलेच्या व्हिडिओवरून रोहित पवारांची टीका

मुंबईच्या वरळी येथे महायुतीच्या आक्रोश मोर्चामुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीत एका सामान्य महिलेने भाजपचे नेते आणि राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांना चांगलेच सुनावल्याचे पाहायला मिळाले. या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या महिलेने थेट ‘गेट आऊट’ म्हणत गिरीश महाजन यांना सुनावले होते. आता या प्रकरणावरून विरोधकांकडून भाजपवर निशाणा साधण्यात येत आहे….

Read More

भगवान परशुरामांच्या विचारांचा वारसा जपावा:आमदार सुलभा खोडके यांच्या उपस्थितीत केले अभिवादन

‘भगवान परशुराम हे अन्यायाविरुद्ध लढणारे ऋषी म्हणून इतिहासात अजरामर झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या विचाराचा वारसा चालविण्याची जबाबदारी तरुण पिढीवर आहे,’ असे प्रतिपादन आमदार सुलभा खोडके यांनी केले आहे. भगवान परशुराम यांची जयंती दरवर्षी वैशाख शुक्ल तृतीयेला म्हणजेच अक्षय्य तृतीयेला साजरी केली जाते. त्यानिमित्त येथे शोभायात्रा काढण्यात आली होती. या शोभायात्रेत त्यांच्यासह विधान परिषद सदस्य संजय…

Read More

विधानपरिषदेसाठी भाजपच्या कोअर कमिटीची आज महत्त्वाची बैठक:एका जागेसाठी शिक्कामोर्तब; निवडक नावांचा प्रस्ताव

महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये मोठी हालचाल सुरू झाली आहे. पक्षाच्या कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक आज रात्री वर्षा निवासस्थानी पार पडणार असून, या बैठकीत उमेदवारांच्या नावांवर सविस्तर चर्चा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीनंतर काही निवडक नावांचा प्रस्ताव केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे इच्छुकांमध्ये प्रचंड उत्सुकता आणि हालचाल…

Read More

‘सायन्सस्‍कोर’वर आता स्वच्छता, स्नानगृह:महापौरांसह नगरसेवकांचा पुढाकार, नागरिकांनी केली होती मागणी‎

अमरावती बाहेरगावाहून शहरात येणारे, शहरवासीयांच्या सोयीसाठी सायन्सकोर मैदानावर अत्याधुनिक स्वच्छता व स्नानगृह उभारणार आहेत. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांच्यासोबत महापौर श्रीचंद तेजवानी यांची सोमवारी २० एप्रिलला यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली. या चर्चेदरम्यान सीईओंनी संबंधित कर्मचाऱ्यांना या प्रकरणी कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. ही जागा जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येत असल्याने, तेथे शौचालय बांधकामासाठी…

Read More

संपामुळे विवाहासाठी आलेले उपवर-वधू बसले ताटकळत:नातेवाइक, परिचितांनी जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत मुद्दा पाेहाेचल्यानंतर नोंदणीचा आदेश पारित

संपामुळे नोंदणी विवाहासाठी आलेल्या उपवर-वधूला मनस्ताप सहन करावा लागला. काही वेळ त्यांना ताटकळत बसावे लागले. दोघांसह अन्य नातेवाईक व परीचित जिल्हाधिकाऱ्यांपर्यं त पोहोचले. त्यानंतर सूत्र वेगाने फिरली आणि नंतर दोघांचा शुभ विवाहही पार पडला. . सोलापूर जिल्ह्यातील बार्शीमधील गोविंद लांडे (बार्शी) यांचा विवाह अकोल्यातील बंडूसा घाटोळे यांची कन्या हर्षदा यांच्याशी ठरला. या विवाहासाठी अकोल्यातील सह…

Read More

संपात ‘महसूल’चे 100 तर आरोग्य सेवेतील 70 टक्के कर्मचारी सहभागी:सरकारी, निमसरकारी कर्मचारी व शिक्षकांचा संप‎

. जुनी पेन्शन योजना आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारी, २१ एप्रिलपासून सरकारी, निमसरकारी कर्मचारी व शिक्षकांनी संप पुकारला आहे. या संपात महसूल विभागाचे शंभर टक्के तर आरोग्य विभागाचे ७० टक्के कर्मचारी सहभागी झाले आहेत. परिणामी तहसील कार्यालयातून रोज दिले जाणारे दाखले आज मिळाले नाहीत. दुसरीकडे आरोग्य विभागातील परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेतल्यामुळे तेथील…

Read More