मॉन्सून महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर:वादळी पाऊस, विजांचा कडकडाट आणि सतर्कतेचा इशारा; अमरावती, वर्धा आणि चंद्रपूरसाठी ऑरेंज अलर्ट
महाराष्ट्रात मॉन्सूनच्या आगमनासाठी पोषक वातावरण तयार होऊ लागले असून राज्यातील हवामानात मोठे बदल दिसून येत आहेत. हवामान विभागाने आज विदर्भातील अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी जोरदार वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. याशिवाय सिंधुदुर्गसह पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथा भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. राज्यातील अनेक भागांत मेघगर्जना,…