फुले यांनी जातिव्यवस्थेला विरोध करून मानवतेचा विचार मांडला:मोहाडी येथे महात्मा फुले जयंती कार्यक्रमात शहाजी सोमवंशी यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी|दिंडोरी महात्मा ज्योतिबा फुले यांनी आयुष्यभर जातिव्यवस्थेच्या अनिष्ट प्रथांविरुद्ध लढा दिला. त्यांनी केवळ एका समाजासाठी नव्हे, तर संपूर्ण मानवतेवर आधारित समाज रचनेचा विचार मांडून देशाला नवी दिशा दिली, असे प्रतिपादन रा. स. वाघ शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष शहाजी सोमवंशी यांनी केले. मोहाडी येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संत…