Headlines

राष्ट्रउभारणीसाठी संवाद, समन्वय आवश्यक – नरेंद्र ठाकूर:पुणे येथे 'धर्माचार्य परिषद' संपन्न; पंचपरिवर्तनावरही झाले प्रबोधन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सह प्रचार प्रमुख नरेंद्र ठाकूर यांनी राष्ट्रउभारणीसाठी संवाद आणि समन्वयाची गरज अधोरेखित केली. पुणे येथे आयोजित ‘धर्माचार्य परिषदे’त ते बोलत होते. यावेळी ह.भ.प. कैलास महाराज ढगे यांनी ‘पंचपरिवर्तन’ या विषयावर प्रभावी प्रबोधन केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त ‘विद्यापीठ भाग’ आणि ‘धार्मिक श्रेणी संपर्क विभाग’ यांच्या वतीने पाषाण येथील पुणे…

Read More

महात्मा फुलेंच्या विचारातून समताधिष्ठित समाज निर्मिती शक्य:डॉ. महेबूब सय्यद

प्रतिनिधी | अहिल्यानगर शेतकरी, कष्टकरी आणि कामगार वर्गाला न्याय देण्यासाठी महात्मा जोतीराव फुले यांनी आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत केले. आजच्या काळात त्यांच्या विचारांचे तंतोतंत अनुकरण केल्यास खऱ्या अर्थाने समताधिष्ठित समाजाची निर्मिती होईल, असे प्रतिपादन सामाजिक विचारवंत व समीक्षक प्रा. डॉ. महेबूब सय्यद यांनी केले. आत्मनिर्धार फाऊंडेशनच्यावतीने महात्मा जोतीराव फुले यांच्या १९९ व्या जयंतीनिमित्त माळीवाडा येथील…

Read More

बिबट्यांपासून बचावासाठी नागपूर विद्यापीठाने बनवला 'स्मार्ट पिंजरा':हल्ला होताच स्पीकर वाजतात, लोकांना मदतीचा मिळतो इशारा

विदर्भ आणि मराठवाड्यात बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील संशोधकांनी एक अभिनव उपाय शोधला आहे. त्यांनी ॲल्युमिनियमपासून ‘स्मार्ट पिंजरा’ तयार केला आहे, जो बिबट्याच्या हल्ल्यापासून संरक्षण देण्यासोबतच आजूबाजूच्या लोकांना सतर्क करतो. विद्यापीठाच्या पदव्युत्तर भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. संजय जानराव ढोबळे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागाचे डॉ. अमित…

Read More

कोराडी वीज केंद्रात पुन्हा अपघात:बॉयलरमधून वाफ बाहेर पडल्याने 8 जण जखमी, तिघांना उपचारानंतर घरी सोडले

नागपूर येथील कोराडी औष्णिक वीज केंद्रातील संच क्रमांक ४ मध्ये सोमवारी सकाळी एक अपघात घडला. बॉयलरमधून अचानक वाफ बाहेर पडल्याने एकूण आठ जण जखमी झाले. यामध्ये महानिर्मितीचे चार अधिकारी-कर्मचारी आणि चार कंत्राटी कामगारांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संच बंद असताना सुमारे १३ मीटर उंचीवरील मजल्यावर ‘क्लिंकर’ काढण्याचे काम सुरू होते. याचवेळी बॉयलरमधील पिप होलमधून अचानक…

Read More

ज्येष्ठ पत्रकार प्रकाश भोईटे यांचे निधन:वयाच्या 60 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; पुणे श्रमिक पत्रकार संघाचे होते माजी अध्यक्ष

ज्येष्ठ पत्रकार प्रकाश ज्ञानेश्वर भोईटे यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. ते पुणे श्रमिक पत्रकार संघाचे आणि पत्रकार प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष होते. वयाच्या 60 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, वडील, तीन भाऊ आणि पुतणे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी रात्री पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील कोथळे येथे अंत्यसंस्कार करण्यात…

Read More

आनंदोत्सव, घरांवर विद्युत रोषणाई, निळे झेंडे, लेक-जावयांचे आगमन:पुरणपोळीचा बेत, नवीन कपडे, लाडू, चकली, करंजी फराळाची तयारी, घराची रंगरंगोटी, आकाश कंदीलचा झगमगाट‎

प्रतिनिधी | सोलापूर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मंगळवारी (ता. १४ ) साजरी होत आहे. बाबासाहेबांच्या पुतळ्यास सुशोभीकरण, रोषणाई करण्यात आली आहे. सोमवारी मध्यरात्री बारानंतर असंख्य अनुयायी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ नतमस्तक होण्यासाठी येतात. न्यू बुधवार पेठ, मिलिंद नगर, माता रमाबाई आंबेडकर नगर, मुकुंद नगर, फॉरेस्ट, कुमठा नाका, हब्बूवस्ती आदी परिसरातील घरात सफाई, रंगरंगोटीचे…

Read More

सुनेत्रा पवारांची तक्रार, देवेंद्र फडणवीसांनी घेतली तातडीने दखल:महापालिका रचनेत फेरबदल की राजकीय डाव? राजकारण तापलं

पुणे महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांच्या नव्या रचनेवरून राज्यातील राजकारणात नव्याने खळबळ उडाली आहे. बारामतीतील पोटनिवडणुकीची पार्श्वभूमी असतानाच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्र पाठवून गंभीर आक्षेप नोंदवले आहेत. महापालिकेने केलेल्या बदलांमुळे काही प्रभागांतील प्रतिनिधित्वावर परिणाम होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या तक्रारीमुळे प्रशासन आणि राजकारण या दोन्ही स्तरांवर चर्चा सुरू झाली…

Read More

बिल्डरांच्या गैरव्यवहाराची चौकशी सुरू; महसूल मंत्र्यांचा कडक इशारा:एसआयटीच्या चौकशीने बिल्डर लॉबी हादरली; फौजदारी कारवाईचे आदेश

नाशिकमधील गृहनिर्माण क्षेत्रात उघड झालेल्या कथित म्हाडा घोटाळ्याने राज्यभरात खळबळ उडवली असून आता या प्रकरणात मोठी कारवाई सुरू झाली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटासाठी राखीव असलेल्या घरांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचे समोर आल्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय विशेष…

Read More

ईको कार – सिमेंट मिक्सर ट्रकची समोरासमोर धडक:कारमधील 8 जण जागीच ठार, 1 गंभीर; कल्याण – नगर महामार्गावरील भयंकर घटना

कल्याण – अहिल्यानगर महामार्गावर सोमवारी सकाळी ईको कार व सिमेंट मिक्सर ट्रकचा एक भयंकर अपघात झाला आहे. अंगाचा थरकाप उडवणाऱ्या या घटनेत तब्बल 8 प्रवाशी ठार झाले असून, 1 जण गंभीर जखमी झाला आहे. सध्या पोलिस मृतांची ओळख पटवण्याचे काम करत आहेत. तर जखमीला लगतच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तिथे त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती…

Read More

अशोक खरातला 7 दिवसांची न्यायालयीन कोठडी:SIT आता चौथ्या गुन्ह्यात घेणार ताबा; भोंदू खरात आज कोर्टापुढे हात जोडून उभा राहिला

महिला लैंगिक शोषण व आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी तुरुंगाची हवा खाणाऱ्या भोंदू अशोक खरातला आज कोर्टाने 7 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कोर्टाने त्याच्यावर दाखल तिसऱ्या गुन्ह्यात त्याला ही कोठडी दिली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करणारे विशेष तपास पथक आता त्याला चौथ्या गुन्ह्याप्रकरणी ताब्यात घेणार आहेत. सरकारी वकिलांनी या प्रकरणी त्याच्या पोलिस कोठडीची मागणी केली…

Read More