Headlines

पाळोदी येथे अल्पभूधारक शेतकऱ्याची शेतात गळफास घेऊन आत्महत्या:नापिकी अन कर्जाचे कारण, कळमनुरी पोलिस ठाण्यात नोंद

कळमनुरी तालु्क्यातील पाळोदी येथे अल्पभूधारक तरूण शेतकऱ्याने नापिकी व कर्जाला कंटाळून शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कळमनुरी पोलिस ठाण्यात रविवारी ता. ३१ अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील पाळोदी येथील शेतकरी गजानन शिंदे (३५) यांना पाळोदी शिवारात चार एकर शेत आहे. या शेतीच्या उत्पन्नावरच त्यांच्या…

Read More

पाणीटंचाईला वैतागलेल्या शेतकऱ्याने‎मोसंबीच्या बागेवर फिरवला जेसीबी‎:कधी कोरडा दुष्काळ तर कधी अतिवृष्टीने हवालदिल झाले बागधारक‎

रब्बीच्या पेरणीला हातात पैसे नव्हते. पाऊस वेळेवर येईल म्हणून वाट पाहिली, पण त्याने दगा दिला. आणि जेव्हा आला, तेव्हा होत्याचे नव्हते करून गेला. निसर्गाच्या या लहरीपणाने एकाला हसवले तर दुसऱ्याला रडवले. गेल्या वर्षीच्या कापसाच्या भावाची कोंडी अजून फुटलेली नाही; उत्पादन खर्च वाढला आणि उत्पन्न घटले. भूसार पिके हातची गेल्यावर मोसंबी तरी सुखाचे दिवस दाखवेल, या…

Read More

पैठणमध्ये शेतकऱ्यांसाठी वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन:शहरातील बसस्थानक चौकात तीव्र निदर्शने

पैठण | प्रतिनिधी राज्यात वाढती महागाई, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळत असलेला कमी दर तसेच पेट्रोल-डिझेल टंचाईमुळे सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी वर्ग अडचणीत सापडला असल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रविवारी पैठण शहरातील बसस्थानक चौकात तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी शासनाविरोधात घोषणाबाजी करत विविध मागण्यांचे निवेदन पोलीस उपनिरीक्षक सारंग यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे…

Read More

धनंजय देशमुखांविरोधातील तक्रार निघाली खोटी!:आमदार मुंडेंनी गोळीबार केल्याचाही दावा खोटा; बीडमध्ये रंगले खोट्या तक्रारींचे नाट्य

कधीही न घडलेल्या गुन्ह्यांचे दाखल झालेले गुन्हे अन् नंतर थेट आमदार धनंजय मुंडेंनी गोळीबार केल्याची तक्रार यामुळे रविवारचा दिवस चर्चेचा आणि बीड पोलिसांना तापदायक ठरला. दिवसभराच्या गोंधळानंतर हा सर्व प्रकार खोटा असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले गेले. मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी शिवीगाळ केली, तसेच त्यांच्या पोलिस अंगरक्षकाची पिस्तूल काढून ती…

Read More

इगतपुरीत प्रतिबंधित गुटखा, पानमसाल्याचा साठा जप्त:एका दुकानदाराविरुद्ध इगतपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

प्रतिनिधी | इगतपुरी शहरातील राम मंदिर परिसरात अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला. याप्रकरणी एका दुकानदाराविरुद्ध इगतपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल के ला आहे. अन्न सुरक्षा अधिकारी सुहास जिभाऊ मंडलिक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुल महादू कडू (३६, रा. नेहरू चौक, इगतपुरी) याच्याविरोधात…

Read More

शिवना येथे शिवमहापुराण कथेची सांगता:आज भव्य कीर्तन, महाप्रसाद

प्रतिनिधी | शिवना सिल्लोड तालुक्यातील शिवना येथे सुरु असलेल्या असलेल्या शिवमहापुराण कथेची सांगता सोमवारी भव्य कीर्तन व महप्रसादाने होणार आहे. छत्रपती संभाजीनगर येथील प्रख्यात प्रवचनकार जयवंत महाराज नांदेडकर यांच्या वाणीतून कथा श्रवण करताना भाविक मंत्र मुग्ध झाले होते. सांगता सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सोमवारी दुपारी महाराष्ट्रातील प्रसिद्ध…

Read More

आजपासून एसटीची स्वच्छतागृहे मोफत:बसस्थानके चकाचक आणि प्रवासही होणार सुखकर; 78 व्या वर्धापन दिनानिमित्त विशेष मोहीम

राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या 78व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून आज, 1 जूनपासून विशेष स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ करण्यात येत असून, त्याअंतर्गत यंदा 78 हजार रोपांची लागवड केली जाणार आहे. तसेच प्रवाशांना एसटीच्या सर्व स्वच्छतागृहांचा मोफत वापर करता येणार आहे. मात्र या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर महामंडळाने आधीच, म्हणजेच 15 एप्रिलपासून प्रवाशांच्या प्रत्येक तिकिटावर दोन रुपयांचा अधिभार लागू केलेला आहे….

Read More

परभणी – हिंगोली विधान परिषद निवडणूक:चक्रव्यूव्हात सापडलेल्या अभिमन्यू खोतकर यांची अखेर माघार, बजोरीया यांचा मार्ग मोकळा

परभणी हिंगोली विधान परिषद निवडणुकीमध्ये शिंदे सेनेकडून उमेदवारीसाठी प्रयत्न करणाऱ्या अभिमन्यू खोतकर यांनी अखेर उमेदवारीतून माघार घेतली आहे. यासंदर्भात त्यांनी फेसबुक वर पोस्टही टाकली आहे. उमेदवारीच्या चक्रव्युव्हा मध्ये सापडलेल्या अभिमन्यू यांनी माघार घेतल्याने विप्लव बाजोरिया यांचा मार्ग मोकळा झाला आहे. परभणी हिंगोली विधान परिषदेची जागा महायुतीकडून कोणी लढवायची याबाबत मोठा खल सुरू होता. राष्ट्रवादी, शिंदे…

Read More

यंत्रणा कोलमडली:तब्बल 25 हजार शाळाबाह्य मुले प्रवाहाबाहेर राहणार; ‘समग्र’तील कर्मचारी संपाचा परिणाम

नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात अवघ्या काही दिवसांवर आली असताना, राज्यातील पहिली ते आठवीतील ५० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अडचणीत आले आहे. समग्र शिक्षा योजनेतील कर्मचाऱ्यांना २ एप्रिलपासून पुनर्नियुक्ती देणे अपेक्षित असताना, केंद्र शासनाने यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही. परिणामी, संपूर्ण यंत्रणा कोलमडली आहे. राज्यात आधीच शिक्षणापासून वंचित असलेल्या २५ हजार शाळाबाह्य मुलांना पुन्हा मुख्य…

Read More

जनहित याचिकेमुळे गावाला मिळाले पक्के रस्ते, पूल व आरोग्य केंद्र:वेंगनूरचे नशीब बदलले; 38 कोटींतून गावाचा कायापालट

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांत जे काम होऊ शकले नाही, ते एका न्यायालयीन लढ्यामुळे अवघ्या तीन वर्षांत पूर्ण झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यातील अत्यंत दुर्गम असलेल्या वेंगनूर ग्रामपंचायतीने न्यायालयीन लढ्याच्या जोरावर तब्बल ३८ कोटी रुपयांचा विकास निधी मिळवून गावाचे नशीब बदलले आहे. वेंगनूर हे मुलचेरा तालुक्यातील अत्यंत दुर्गम व दुर्लक्षित असे गाव आहे. येथील ग्रामपंचायतीअंतर्गत अळंगेपल्ली,…

Read More