Headlines

सीतेशिवाय रामराज्याची कल्पना अपूर्ण: भैय्याजी जोशी:एमआयटी डब्ल्यूपीयूत ‘सीतेची न सांगितलेली कथा’ पुस्तकाचे प्रकाशन

विश्व हिंदू परिषदेचे मार्गदर्शक भैय्याजी जोशी यांनी नुकतेच पुण्यात ‘सीतेची न सांगितलेली कथा’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी सांगितले की, सीतेशिवाय रामराज्याची कल्पना पूर्ण होऊ शकत नाही. एमआयटी डब्ल्यूपीयू येथे हा कार्यक्रम पार पडला. मोतीलाल बनारसीदास पब्लिशर्स, भारतीय विचार साधना पुणे प्रकाशन आणि माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने अमेरिकन ज्युईश लेखिका डेना मरियम यांच्या…

Read More

विधान परिषदेसाठी भाजपचा पहिला उमेदवार ठरला:अमरावतीतून प्रवीण पोटे पाटलांना उमेदवारी जाहीर, उद्या भरणार अर्ज

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १७ विधान परिषद जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, महायुतीमध्ये जागावाटपाचा पेच अद्याप कायम असतानाच भाजपने आपला पहिला उमेदवार जाहीर केला आहे. अमरावती मतदारसंघातून भाजपने प्रवीण पोटे पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले असून, ते उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. राज्याचे महसूलमंत्री तथा अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या…

Read More

मनोज जरांगेंच्या लाडाखातर दोन बेकायदेशीर आरक्षणे सुरू:उपोषणाच्या इशाऱ्यानंतर गुणरत्न सदावर्तेंची टीका

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे हे येत्या 30 तारखेपासून पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत. त्यांच्या उर्वरित मागण्या सरकारकडून अद्याप मान्य झालेल्या नसल्याने त्यांनी पुन्हा एकदा उपोषणाचे अस्त्र काढले आहे. यावर आता वकील गुणरत्न सदावर्ते यांनी जोरदार टीका केली आहे. तसेच अनाथांना आरक्षण देणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद करत मनोज जरांगे यांच्या लाडाखातर बेकायदेशीर दोन आरक्षण…

Read More

सोलापुरात थरार!:रुग्णाला रुग्णालयात सोडताच रुग्णवाहिकेला भीषण आग, श्री मार्कंडेय रुग्णालय परिसरातील घटना

सोलापूरमधील श्री मार्कंडेय रुग्णालय परिसरात बुधवारी दुपारी सव्वादोनच्या सुमारास एका रुग्णवाहिकेला अचानक भीषण आग लागल्याची थरारक घटना घडली. एका गंभीर रुग्णाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच हा प्रकार घडला. सुदैवाने, रुग्णाला आधीच सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला आणि संभाव्य जीवितहानी टळली. MH-13 AC-0659 या क्रमांकाची रुग्णवाहिका एका गंभीर रुग्णाला घेऊन सोलापूरच्या…

Read More

कळमनुरी येथील खून प्रकरण:5 तासांच्या नाकाबंदी नंतर फरार आरोपी ताब्यात, तोंडगाव मार्गावर पहाटे 5 वाजता खाजगी वाहनातून पकडले

कळमनुरी येथील नवनाथ बेद्रे खून प्रकरणातील फरार असलेल्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तब्बल पाच तासाच्या नाकाबंदी नंतर गुरुवारी ता. २८ पहाटे पाच वाजता हिंगोली ते वाशीम मार्गावर तोंडगाव शिवारातून एका खाजगी वाहनातून पकडले. त्यांच्याकडून आता खूनाचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. कळमनुरी येथील नवनाथ बेद्रे या तरुणाचा शुक्रवारी ता. २२ रात्रीच्या…

Read More

'देऊळ बंद 2' चित्रपटाच्या कमाईतून शेतकरी कन्यांना दत्तक घेणार:'माणुसकीची चळवळ' संस्थेचा पुढाकार, शिक्षण आणि विवाहासाठी आर्थिक मदत

‘देऊळ बंद २’ हा चित्रपट केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता, सामाजिक बांधिलकीचे एक आदर्श उदाहरण प्रस्थापित करत आहे. हा चित्रपट आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांतील मुलींना मदतीचा हात देणार आहे. ‘माणुसकीची चळवळ’ या संस्थेने या मोहिमेअंतर्गत ३०० शेतकरी कन्यांना दत्तक घेण्याचा संकल्प केला आहे. या चित्रपटातून मिळणाऱ्या नफ्याचा संपूर्ण वापर या मुलींच्या शिक्षण आणि विवाहासाठी केला जाईल….

Read More

विकसित भारतासाठी प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे- अविनाश धर्माधिकारी:पुणे मॅनेजमेंट असोसिएशनचा ४९वा स्थापना दिन ‘विकसित भारत’ संकल्पनेवर साजरा

निवृत्त सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी ‘विकसित भारता’साठी प्रत्येकाच्या योगदानावर भर दिला. पुणे मॅनेजमेंट असोसिएशनच्या (पीएमए) ४९व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. शाश्वत विकास आणि भारतीय तत्त्वज्ञान हे विकसित भारताच्या निर्मितीचे आधारस्तंभ असल्याचे त्यांनी नमूद केले. हा स्थापना दिन ‘विकसित भारत’ या संकल्पनेवर आधारित होता. सीपीआर ऑडिटोरियम, पाषाण रोड गणेशखिंड येथे बुधवारी हा…

Read More

शिवसेनेच्या बूथ स्तरावर हालचालींना वेग:डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यात आढावा बैठक

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाने बूथ स्तरावर संघटना मजबूत करण्यासाठी हालचालींना वेग दिला आहे. याच अनुषंगाने शिवसेना नेत्या तथा आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यात बूथ पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत संघटनात्मक अडचणी, स्थानिक प्रश्न आणि बूथ स्तरावरील समन्वयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीला जिल्हाध्यक्ष रमेश कोंडे, किरण साळी, आनंद गोयल,…

Read More

सारसबाग बंद निर्णयावरून काँग्रेसचा महापौरांवर हल्लाबोल:'भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न' म्हणत प्रश्नचिन्ह

पुणे शहरातील सारसबाग दोन दिवस बंद ठेवण्याच्या निर्णयावरून काँग्रेसने पुणे महानगरपालिका प्रशासन आणि महापौर मंजूषा नागपुरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सुरक्षेच्या नावाखाली जनतेची दिशाभूल करून शहरात भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप काँग्रेसचे महापालिकेतील गटनेते चंदूशेठ कदम यांनी केला. ऐतिहासिक सारसबाग २८ आणि २९ मे रोजी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता….

Read More

नसरापूर प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय; 28 दिवसांत आरोप निश्चित:आता रोज सुनावणी; निर्घृण कृत्यानंतर न्यायालय कठोर

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात घडलेल्या नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणात न्यायालयाने मोठा निर्णय घेत आरोपीविरोधात अवघ्या 28 दिवसांत आरोप निश्चित केले आहेत. या गंभीर प्रकरणाची आता फास्टट्रॅक पद्धतीने सुनावणी होणार असून रोज ‘इन कॅमेरा’ पद्धतीने खटला चालवला जाणार आहे. न्यायालयाने आरोपीविरोधात प्रथमदर्शनी पुरावे असल्याचे निरीक्षण नोंदवल्याने या प्रकरणाला आता निर्णायक वळण मिळालं आहे. या घटनेमुळे…

Read More