पीएम किसान योजनेसाठी ई-केवायसी अनिवार्य:३० जूनपर्यंत न केल्यास लाभापासून वंचित राहण्याची शक्यता
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी वार्षिक ई-केवायसी प्रमाणीकरण अनिवार्य करण्यात आले आहे. आगामी ३० जून २०२४ पर्यंत हे प्रमाणीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. विहित मुदतीत ई-केवायसी न केल्यास लाभार्थी पुढील हप्त्यांच्या लाभापासून वंचित राहू शकतात, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. केंद्र व राज्य शासनाने योजनेतील पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि गैरप्रकार…