Headlines

अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी रोहित पवारांची CID ला भेट:महत्त्वाचे मुद्दे तपास अधिकाऱ्यांसमोर केले उपस्थित

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात दुर्घटनेच्या तपासाला आता नवे वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आमदार रोहित पवार यांनी शुक्रवारी पुणे येथील महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) कार्यालयाला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी या विमान अपघाताच्या अनुषंगाने काही अत्यंत महत्त्वाचे मुद्दे तपास अधिकाऱ्यांसमोर उपस्थित केले आहेत. सीआयडीने या नव्या मुद्द्यांची दखल घेतली असून,…

Read More

पुण्यात भरधाव मोटारीच्या धडकेत दोघांचा मृत्यू:एनडीए रस्ता, संगमवाडी परिसरात दोन अपघात

पुणे शहरात दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. एनडीए रस्ता आणि संगमवाडी परिसरात या घटना घडल्या. भरधाव मोटारींच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणांचा बळी गेला असून, दोन्ही प्रकरणांमध्ये मोटारचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एनडीए रस्त्यावर घडलेल्या पहिल्या घटनेत, राजू नारायण चव्हाण (वय 31, रा. कोंढवे-धावडे, एनडीए रस्ता) या दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. कामावरून घरी परतत…

Read More

Santosh Bangars Demand to Shrikant Shinde: 2029 Election Math

सत्ताधारी महायुतीचा घटकपक्ष असणाऱ्या शिवसेनेत आता सत्तेवरून अंतर्गत धुसपूस सुरू झाली आहे. हिंगोली येथे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर थेट पक्षनेतृत्त्वालाच आव्हान देत म्हणाले की, म्हाताऱ्या मंत्र्य . सत्ताधारी शिवसेनेचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांची काल हिंगोलीत सभा झाली. या सभेत बोलताना आमदार संतोष…

Read More

पिंपळदरी परिसरात विहिरींनी गाठला तळ:हंगामी मिरचीचे पीक संकटात, उन्हाळ्यामुळे भीषण पाणीटंचाई, पिके जगवण्यासाठी धडपड‎

सिल्लोड तालुक्यात भाजीपाला उत्पादन घेतले जाते. मात्र, उन्हाळी हंगामात टोमॅटो, मिरची, कोबी, कोथिंबीर व फळभाज्यांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. सिल्लोड तालुक्यातील विहिरींनी तळ गाठला आहे. उन्हाळ्यामुळे भीषण पाणीटंचाई तीव्र झाली आहे. शेकडो फूट खोल गेलेल्या बोअरवेल आणि विहिरींनी तळ गाठल्याने भाजीपाला पिकांवर मोठे संकट ओढवले आहे. ऐन हंगामात लाखो रुपये खर्च करून लागवड केलेल्या…

Read More

गोंदियात पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा गळा दाबून केला खून:दोघांना अटक, गळ्यावरील ओरखड्यांनी उघड केला कट

गोंदियामध्ये कौटुंबिक वाद आणि अनैतिक संबंधाच्या वादातून एका 44 वर्षीय व्यक्तीचा गळा दाबून खून करण्यात असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गोदिंयामधील कुडवा परिसरात हा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी रामनगर पोलिसांनी मृताच्या पत्नीसह तिच्या प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत. राजेंद्र कटरे असे मृत व्यक्तीचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे. 27 तारखेला कुडवा येथील…

Read More

इतिहासात आजपर्यंत झालं नाही असं, उपोषण करणार:मनोज जरांगे पाटील आंदोलनावर ठाम; आज सरकारचे शिष्टमंडळ भेटायला येणार

इतिहासात आजपर्यंत झालं नाही असं, उपोषण 30 तारखेपासून सुरू करणार असल्याचा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. त्यांनी उपोषणाचा इशारा दिल्यानंतर आज राज्य सरकारचे शिष्टमंडळ जरांगे यांना भेटायला येणार आहे. मात्र, ते काय घेऊन येतात? त्यांच्या हातात कोणता प्रस्तव आहे? ते पाहिल्यानंतरच आपण निर्णय घेणार असल्याचे जरांगे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले….

Read More

पाश्चात्त्य संस्कृतीच्या किडीपासून आपली कुटुंब व्यवस्था वाचवा:भैय्याजी जोशी यांचे आवाहन, जातीयवादाच्या वृक्षाची बीजे नष्ट करा‎

भारताची कुटुंब व्यवस्था ही संपूर्ण जगात अद्वितीय आहे. येणाऱ्या पिढीत संस्कारांचे बीजारोपण याच व्यवस्थेतून होते. मात्र, आज आपल्या या आदर्श कुटुंब व्यवस्थेला पाश्चात्त्य संस्कृतीची कीड लागली आहे. ही विकृती जर आपण वेळीच दूर केली नाही, तर आपली कुटुंब व्यवस्था ढासळेल. त्यामुळे हे सांस्कृतिक षड्यंत्र ओळखून समाजाने वेळीच जागे व्हावे,असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह…

Read More

मोहोळ तालुक्यातील जि. प. शाळांच्या आधुनिकीकरणासाठी विशेष निधी मंजूर:आमदार राजू खरे यांच्या पाठपुराव्याला यश

मोहोळ विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळांची झालेली दुरावस्था दूर करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व आधुनिक शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी आमदार राजू खरे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश आले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मतदारसंघातील शाळांसाठी भरघोस निधी मंजूर करण्यात आला आहे. आमदार राजू खरे यांनी मागील…

Read More

खानापुरात केला जातोय आठ दिवसांनी अशुद्ध पाणीपुरवठा:जलवाहिनीतून निघालेल्या पक्ष्याची पंखे थेट बीडीओंना दाखवली‎

मोर्शी लगतच असलेल्या खानापूर गावात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून नागरिकांना दर आठ ते दहा दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. मात्र तोही अशुद्ध असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. माजी उपसरपंच संदीप भदाडे यांच्या नेतृत्वात शेकडो गावकरी गटविकास अधिकारी स्वप्निल मगदूम यांच्या हजेरीत ग्रामपंचायत कार्यालयात येऊन धडकले. यावेळी त्यांना पाण्याच्या पाईपलाइनमधून निघालेला पक्षी व…

Read More

जांबमध्ये लोकसहभागातून 10 हजार वृक्षलागवडीचा संकल्प:शाश्वत पाण्यासाठी आळाचीवाडी पुरंदर, सातारा, चंद्रपूर, गावांच्या अभ्यासातून करणार जलसंधारणाची कामे‎

जिल्ह्यातील जांब गावाला हरित करण्यासह पाण्याबाबत स्वयंपूर्ण करण्यासाठी अमोल घायवट यांच्या पुढाकारातून पावसाळ्यात १० हजार झाडे लावण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केला आहे. गत तीन वर्षात अकोट तालुक्यातील विविध गावांमध्ये वृक्षारोपण करणाऱ्या अमोल घायवट यांनी . गतवर्षी त्यांच्या माध्यमातून अकोट तालुक्यात ४९ गावे आणि ६७ शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले होते. परंतु, अनेक ठिकाणी योग्य संगोपन…

Read More