Headlines

भावाच्या निधनानंतर 17 तासांतच चुलत बहिणीलाही ट्रकने चिरडले:16 वर्षीय भावाचा अपघात; अंत्ययात्रेसाठी जाताना बहिणही ठार

प्रतिनिधी | अमरावती ट्रॅक्टरने धडक दिल्यामुळे सोळा वर्षीय मुलाचा गुरुवारी (दि. ९) रात्री मृत्यू झाला. त्याच्या अंत्ययात्रेसाठी भातकुलीवरून कानफोडीला जाणाऱ्या चुलत बहिणीचाही शुक्रवारी (दि. १०) दुपारी ट्रकने चिरडून झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला. समाजमन सुन्न करणारी ही घटना भातकुली येथे घडली. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण भातकुली तालुका आणि कानफोडी गावावर शोककळा पसरली आहे. नैतिक प्रदीपराव…

Read More

मनपा शाळांत आता वाचन संस्कृती रुजणार:शिक्षण विभागात सर्वसमावेशक आढावा, मनपा शाळांचा शैक्षणिक दर्जा वाढवण्यासाठी प्रयत्न‎

. महानगर पालिका शाळांमध्ये केवळ शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर भर न देता विद्यार्थ्यांमध्ये मूल्याधिष्ठित शिक्षण, जीवनकौशल्ये आणि सर्जनशीलता विकसित करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शाळांनी नवोपक्रमशील उपक्रम राबवावेत. भौतिक सुविधांच्या विकासाबरोबरच विद्यार्थ्यांना सुजाण, जबाबदार आणि सक्षम नागरिक म्हणून घडवण्याची जबाबदारी शिक्षण व्यवस्थेवर असल्याचे शिक्षण सभापती अॅड. प्रीती रेवणे यांनी…

Read More

सुनेत्रा पवार यांच्या जीवाला रूपाली चाकणकरांकडून धोका:अशोक खरातप्रकरणी बीडच्या व्यक्तीची SIT कडे तक्रार; राजकारणात खळबळ

राज्यभरात चर्चेत असलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणाने आता आणखी एक धक्कादायक वळण घेतले आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) बीड जिल्ह्यातील एका व्यक्तीने गंभीर तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवाला धोका असल्याचा दावा करण्यात आला असून, हा धोका राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याकडून…

Read More

शरद पवारांचे वारकरी संप्रदायाबाबतचे विधान योग्य:काही जण संतांविरोधात बोलतात, पण प्रतिगामी विचारांचे लोक शांत बसतात – रोहित पवार

“वारकरी संप्रदायाने महाराष्ट्राला समता, बंधुभाव आणि एकतेची शिकवण दिली आहे. मात्र, अलीकडच्या काळात या संप्रदायात प्रतिगामी विचारसरणीच्या लोकांची घुसखोरी होत असून, यामुळे चळवळीचा मूळ प्रबोधनात्मक हेतू धोक्यात येत आहे,” अशी स्पष्ट भूमिका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मांडली. त्यांच्या या भूमिकेला आमदार रोहित पवार यांनी खंबीर पाठिंबा दिला असून, यावरून सत्ताधारी भाजप आणि संबंधित संघटनांवर…

Read More

अमोल मिटकरींकडून 'जस्टिस फॉर दादा' आंदोलनाची हाक:अजित पवारांसाठी आमदारांच्या प्रतिसादाअभावी व्यक्त केली खंत

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला अडीच महिने उलटूनही तपासाचे सत्य अद्याप समोर आले नसल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. “अजितदादांना न्याय मिळवून देण्यासाठी मी एकटाच पायऱ्यांवर बसलो, पण दुर्दैवाने इतर आमदारांची हवी तशी साथ मिळाली नाही,” अशी खंत व्यक्त करत अमोल मिटकरींनी आता ‘जस्टिस फॉर दादा’ (Justice…

Read More

'सर्वे भवन्तु सुखिनः' हा भारतीय विचार श्रेष्ठ:पुण्यात संघ शताब्दीनिमित्त आयोजित कार्यक्रमात अखिल भारतीय सहसंपर्क प्रमुखांचे प्रतिपादन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सहसंपर्क प्रमुख भारत भूषण यांनी ‘सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट’ या पाश्चात्य नियमापेक्षा ‘सर्वे भवन्तु सुखिनः’ हा भारतीय विचार श्रेष्ठ असल्याचे प्रतिपादन केले. सध्या जगात ‘सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट’मुळे अनागोंदी निर्माण झाली असून, या संघर्षाच्या काळात ‘सर्वे भवन्तु सुखिनः’ हा सर्वसमावेशक विचार जगभर नेण्याची नितांत गरज आहे, असे ते म्हणाले. या…

Read More

हत्याराचा धाक दाखवून जबरी चोरी:डेक्कन पोलिसांनी दोघांना केली अटक; बनावट मेसेज दाखवून मोबाईल खरेदी

पुणे शहरात डेक्कन पोलिसांनी हत्याराचा धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे. एका तरुणाला मारहाण करून त्याच्या फोनपे खात्यातून पैसे काढून घेण्यात आले होते. निखील संदीप जाधव (वय २०, रा. जनता वसाहत) आणि ओंकार रमेश गरुड (वय २१, रा. गंजपेठ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी नागेश हनुमंत पाटील (वय…

Read More

शाश्वत शेती संदर्भामध्ये भाऊसाहेबांना अपेक्षित कार्य पूर्तीस कृषी विद्यापीठ बाध्य:कुलगुरू डॉ. गडाख यांचे प्रतिपादन, डॉ. पंजाबराव देशमुख स्मृतिदिन साेहळा‎

देशांतर्गत आधुनिक व मुख्यत: व्यावसायिक शेतीच्या पायाभरणीचे शिल्पकार दिवंगत डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख भाऊसाहेबांचे संकल्पनेतील आत्मानिर्भर ग्रामव्यवस्था पुनरुज्जीवित करण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने “मॉडेल व्हिलेज” संकल्पना स . डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या ६१ व्या स्मृतिदिनानिमित्त येथील कृषी महाविद्यालयाच्या समिती सभागृहात कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. ग्रामीण भागाच्या शैक्षणिक व कृषी विषयक विकासासाठी कृषी…

Read More

महिला व बालविकास विभागात 23 वर्षांनंतर मोठा निर्णय:विभागात 11,512 पदांना हिरवा कंदील; प्रलंबित प्रक्रिया मार्गी लागणार

राज्यातील महिला व बालविकास विभागात 23 वर्षांनंतर मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. विभागाच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ वाढवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली असून, या निर्णयामुळे विभागाच्या सक्षमीकरणाला मोठी चालना मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शासनाने घेतलेल्या या निर्णयानुसार, विभागातील एकूण पदांचा…

Read More

मिरा-भाईंदर हादरलं! गॅस सिलिंडरच्या स्फोटांनी भीषण आग:3 ठार, 50 झोपड्या खाक; बेकायदेशीर सिलिंडरचा साठा उघड

मिरा-भाईंदर परिसरातील भाईंदरच्या इंद्रलोक फेज 4 मधील झोपडपट्टीत शुक्रवारी रात्री भीषण आग लागून मोठी दुर्घटना घडली. सुमारे रात्री 8 वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. काही क्षणांतच आग पसरत गेली आणि परिसरात एकच गोंधळ उडाला. या आगीदरम्यान एकामागोमाग तीन गॅस सिलिंडरचे जोरदार स्फोट झाले. या स्फोटांमुळे आगीची तीव्रता वाढत गेली आणि अवघ्या…

Read More