तापमान वाढीमुळे संत्रा, लिंबू उत्पादक शेतकरी संकटात:तातडीने पंचनामा करून आर्थिक मदतीची मागणी, कृषी अधिकाऱ्यांना निवेदन
अंजनगाव सुर्जी तालुक्यात गेल्या एक-दोन आठवड्यांपासून पारा ४५ ते ४६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने संत्रा व लिंबू उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. प्रचंड उष्णतेमुळे फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून, अनेक ठिकाणी झाडांवरील फळे गळून पडत आहेत आणि झाडेही वाळत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रहार युवक तालुकाध्यक्ष निलेश विनोद चोपडे यांनी तहसीलदार व तालुका कृषी अधिकाऱ्यांना…