Headlines

तापमान वाढीमुळे संत्रा, लिंबू उत्पादक शेतकरी संकटात:तातडीने पंचनामा करून आर्थिक मदतीची मागणी, कृषी अधिकाऱ्यांना निवेदन

अंजनगाव सुर्जी तालुक्यात गेल्या एक-दोन आठवड्यांपासून पारा ४५ ते ४६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने संत्रा व लिंबू उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. प्रचंड उष्णतेमुळे फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून, अनेक ठिकाणी झाडांवरील फळे गळून पडत आहेत आणि झाडेही वाळत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रहार युवक तालुकाध्यक्ष निलेश विनोद चोपडे यांनी तहसीलदार व तालुका कृषी अधिकाऱ्यांना…

Read More

ग्रामीण पोलिसांचे गावठी दारू अड्ड्यांवर धाडसत्र:मोर्शीत 4 लाख 30 हजार, तर माहुलीत 19 हजारांचे साहित्य नष्ट

मोर्शी आणि माहुली जहागीर पोलिसांनी बुधवार, ३ जून रोजी गावठी दारू अड्ड्यांवर धडक कारवाई केली. या कारवाईत मोठ्या प्रमाणात गावठी दारू, मोहा सडवा आणि संबंधित साहित्य जप्त करून जागेवरच नष्ट करण्यात आले. मोर्शी येथे ४ लाख ३० हजार रुपयांचा, तर माहुली जहागीर येथे १९ हजार ६१० रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. मोर्शी पोलिसांनी मध्यप्रदेशातील मुलताई…

Read More

प्रत्येक ग्रामपंचायतीत 'आपले सरकार सेवा केंद्र' सुरू करा:सेवा हक्क आयुक्त सुधाकर तेलंग यांचे निर्देश, तीन महिन्यांची दिली मुदत

सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये ‘आपले सरकार सेवा केंद्रांची’ संख्या वाढवण्याची मोठी गरज असून, जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये येत्या तीन महिन्यांत ही सेवा केंद्र सुरू करावीत, असे स्पष्ट निर्देश राज्य सेवा हक्क आयुक्त सुधाकर तेलंग यांनी दिले. तसेच जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात ‘आदर्श सेतू’ व ‘आदर्श सेवा केंद्र’ उभारावे, अशी सूचनाही त्यांनी केली. जिल्हाधिकारी कार्यालयात आज…

Read More

पुण्यात घरांच्या विक्रीत 30 ते 35 टक्के घट:युद्धजन्य परिस्थिती, इंधन तुटवड्यामुळे बांधकाम साहित्य महागले; किमती वाढणार

पुण्यातील घरांच्या विक्रीत ३० ते ३५ टक्क्यांनी घट झाली आहे. अमेरिका-इस्त्राइल आणि इराणमधील युद्धजन्य परिस्थिती, इंधनाचा तुटवडा आणि बांधकाम साहित्याच्या वाढलेल्या किमती यामुळे हा परिणाम दिसून येत आहे. यामुळे घरांच्या किमती १० ते १२ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. बांधकाम व्यावसायिकांना घरे विक्रीसाठी सल्ला देणाऱ्या ‘जस्टो’ कंपनीचे संचालक पुष्पमित्र दास यांनी ही माहिती दिली आहे. पुणे…

Read More

नाशिक टीसीएस प्रकरण:निदा खानला आश्रय दिल्याच्या प्रकरणात इम्तियाज जलील यांची चौकशी करा; संजय शिरसाट यांची मागणी

नाशिकमधील नामांकित आयटी कंपनी टीसीएसमध्ये (TCS) समोर आलेल्या धर्मांतरण प्रकरणाने आता राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित निदा खान हिला छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरक्षित आश्रय देण्यात आला होता, असा आरोप केला जात आहे. या संपूर्ण कटामागे एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांचा हात असल्याचा थेट आरोप राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी…

Read More

विधान परिषद निवडणूक:राज्यात 17 पैकी 5 जागी महायुतीचे पारडे जड; कुठे उमेदवार बाद, तर कुठे माघार, वाचा इलेक्शनची स्टोरी

राज्यातील विधान परिषदेच्या 17 जागांसाठी राजकीय रणधुमाळी सुरू झाली असून ‘महायुती’ विरुद्ध ‘महाविकास आघाडी’ (मविआ) असा थेट सामना रंगला आहे. बंडखोरी मोडून काढण्यासाठी पक्षांतर्गत पातळीवर प्रयत्न सुरू असतानाच, अर्ज छाननी आणि नाट्यमय घडामोडींमुळे 4 महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये महायुतीचे पारडे प्रचंड जड झाले असून, त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत उद्या…

Read More

पुणे विषारी दारू प्रकरण: तपासासाठी 10 पथके नियुक्त:डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या सूचनांनंतर सीआयडीकडून कारवाईला वेग

पुण्यातील दापोडी आणि हडपसर परिसरातील विषारी दारू प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभाग (CID) कडे वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणाच्या तपासाला आता वेग आला असून, सीआयडीने १० विशेष पथके नियुक्त केली आहेत. शिवसेना नेत्या व आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या सूचनांनंतर ही कारवाई अधिक व्यापक करण्यात आली आहे. डॉ. गोऱ्हे यांनी या प्रकरणाची सुरुवातीपासून गंभीर…

Read More

डॉ. भावार्थ देखणे: अधिक मासात भगवंताचे अधिष्ठान अंतरंगात स्थित करा:श्री महालक्ष्मी मंदिरात महिनाभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

भारतीय संस्कृतीत अधिक मासाचे महत्त्व मोठे आहे. हा मास आनंद आणि हर्षाने साजरा केला जातो. या माध्यमातून आध्यात्मिक, सांस्कृतिक प्रयोजन साधले जाते आणि भगवंताचे अधिष्ठान अंतरंगात स्थित करण्याचे काम होते, असे मत संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान समिती, आळंदीचे विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे यांनी व्यक्त केले. श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग येथे अधिक मासानिमित्त आयोजित महिनाभर चालणाऱ्या…

Read More

चित्रपट महामंडळाला स्थिर कार्यकारिणी देणार: राजेभोसले:मेघराज राजेभोसले यांच्या नेतृत्वाखालील समर्थ पॅनलची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्वाही

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समर्थ पॅनलने महामंडळाला स्थिर, पारदर्शक आणि विकासाभिमुख कार्यकारिणी देण्याची ग्वाही दिली आहे. पॅनलचे प्रमुख तथा चित्रपट निर्माते मेघराज राजेभोसले यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी अभिनेता सुशांत शेलार, दिग्दर्शक दीपक कदम, लेखक राज काझी, नृत्यदिग्दर्शक सुभाष नकाशे, निर्माते सुनील महाजन, दिग्दर्शक अजित शिरोळे, कार्यकारी निर्माता…

Read More

सागरी मत्स्यव्यवसाय प्रशिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू:मच्छीमार युवकांना 6 महिन्यांचे विशेष प्रशिक्षण, आधुनिक मासेमारी तंत्रज्ञानाचे मिळणार मार्गदर्शन

राज्यातील मत्स्यव्यवसाय क्षेत्राचा विकास आणि विस्तार करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागामार्फत ‘सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी डिझेल इंजिन देखभाल आणि परिचालन’ या सहा महिन्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या 136 व्या सत्रासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. हे प्रशिक्षण मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, वर्सोवा, मुंबई येथे आयोजित करण्यात येणार असून इच्छुक मच्छीमार युवकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत….

Read More