Headlines

अहिल्यानगरात NEET विद्यार्थिनीची आत्महत्या:सुसाइड नोटमध्ये लिहिले- 'तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकले नाही', परीक्षेत मिळाले होते 166 गुण

देशभरात सध्या ‘नीट’ परीक्षेवरून मोठा गदारोळ सुरू असतानाच, अहिल्यानगर जिल्ह्यातून एक अत्यंत दुःखद घटना समोर आली आहे. ‘नीट’ परीक्षेत कमी गुण मिळाल्याच्या नैराश्यातून जलालपूर येथील अंकिता सांगळे या विद्यार्थिनीने गळफास घेऊन स्वतःचे जीवन संपवले आहे. परीक्षेच्या निकालात तिला ७२० पैकी केवळ १६६ गुण मिळाले होते. घटनास्थळावरून पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली असून, यात तिने आपल्या…

Read More

जायखेडा विद्यालयामध्ये ईव्हीएमवर शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक:अधिकृत निकालातून विद्यार्थ्यांना लोकशाही प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव‎

लोकशाहीची मूल्ये विद्यार्थ्यांच्या मनात रुजविण्याच्या उद्देशाने येथील कृष्णाजी माऊली जनता इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक पार पडली. मतदान केंद्र, मतदार यादी, ईव्हीएमद्वारे मतदान, मोबाईल ॲपचा वापर, मतमोजणीच्या फेऱ्या आणि अधिकृत निकाल घोषणेमुळे विद्यार्थ्यांना लोकशाही प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. मुख्य निवडणूक अधिकारी व्ही. पी. शेवाळे आणि सहाय्यक निवडणूक…

Read More

गंज बाजार पोलिस चौकी बंद असल्याने बाजारपेठेतील व्यापाऱ्यांत असुरक्षिता:चौकी ठराविक कालावधीत तरी सुरु ठेवण्याची मागणी‎

शहरातील गंज बाजार आणि परिसर गेल्या काही वर्षांत वेगाने विकसित झाला आहे. येथील व्यावसायिक दुकाने, नागरी वसाहती आणि परिणामी वाहनांची वर्दळ प्रचंड वाढली आहे. मात्र, याच मुख्य बाजारपेठेच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली गंज बाजार पोलीस चौकी गेल्या अनेक महिन्यांपासून कुलूपबंद आहे. ही चौकी बंद असल्याने संपूर्ण परिसरात सध्या असुरक्षिततेचे वातावरण आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न…

Read More

अकोले तालुक्याला पावसाचा तडाखा:धरणे ओसंडली, 52 घरांचे मोठे नुकसान, सर्व धरणे तुडुंब भरून सांडव्यावरून ओसंडून वाहताहेत, पांजरे शिवारात भूस्खलन‎

अकोले तालुक्यात गेल्या सुमारे आठवड्यापासून संततधार पाऊस सुरू असून, सह्याद्रीच्या पर्वतरांगा हिरव्यागार झाल्या आहेत. यामुळे भातखाचरांमधील लागवडी अंतिम टप्प्यात आल्या असून खरीप पिकांना जोरदार बळ मिळाले आहे. मात्र, मुसळधारेमुळे तालुक्यातील ५२ घरांचे नुकसान झाले. पांजरे शिवारात भूस्खलनाची घटना घडली आहे. जुलैच्या अखेरच्या टप्प्यात तालुक्यातील प्रमुख धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे: भंडारदरा धरण: धरण ९१.५७ टक्के…

Read More

टँकरमुक्तीसाठी करंदीत प्रथमच बोअर ब्लास्टिंग:पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीची पाणी पातळी वाढणार, दहा बोअरमध्ये एकाच दिवशी स्फोट‎

नेहमीच टंचाईचा सामना करणाऱ्या पारनेर तालुक्यातील करंदी गावांत टँकरमुक्तीसाठी ग्रामपंचायतीने बोअर ब्लास्ट तंत्रज्ञानाचा आधार घेतला आहे. तलावाजवळ असूनही, जलस्त्रोत असलेल्या विहिरीची पाणी पातळी कमी असल्याचे दिसून आले. तलावाच्या पाणीपातळीप्रमाणे विहिरीची पाणीपातळी वाढवण्यासाठी, रविवारी १० बोअरमध्ये स्फोट घडवण्यात आले. करंदी हे टंचाईग्रस्त गाव असून, या ठिकाणी उन्हाळ्यात टँकरने पाण्याचा पुरवठा करावा लागतो. हा प्रश्न सोडवण्यासाठी ग्रामपंचायतीने…

Read More

इमामपूर, वांबोरी घाटात पावसाळ्यात दरडींचे अडथळे:दगड व सिमेंटचे अस्तरीकरण रस्त्यावर येत असल्याने अपघाताची मोठी शक्यता, उपाययोजना शून्य‎

अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील इमामपूर घाट आणि अहिल्यानगर-वांबोरी रस्त्यावरील डोंगरगण घाट सध्या धोकादायक बनले आहेत. पावसाळ्यात डोंगरावरील दगड व सिमेंटचे अस्तरीकरण उखडून थेट रस्त्यावर येत असल्याने अपघाताची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. सुद . यामुळे महामार्गाच्या एका पट्ट्यात मोठे दगड येऊन पडतात. सुदैवाने या दरडींखाली सापडून अद्याप कोणतीही जीवितहानी किंवा वाहनांचे मोठे नुकसान झाल्याची नोंद झालेली…

Read More

2500 दाखल्यांचे वितरण‎:अमरावतीच्या शाश्वत विकासावर अजित पवारांची छाप- आमदार संजय खोडके

प्रतिनिधी | अमरावती सरकारमध्ये राहून लोकनेते अजितदादा पवार यांनी समाज विकासाचे व लोकहिताचे जे काही निर्णय घेतले, जी धोरणे ठरवली, ज्या योजना राबविल्या, त्या सर्वांचा अमरावती शहराला पुरेपूर लाभ मिळाला. या मतदारसंघाच्या विकासासाठी दादांनी वेगवेगळ्या क्षेत्राकरिता भरभरून निधी दिल्याने अमरावती शहराच्या शाश्वत विकासाला बळकटी मिळाली आहे. त्यामुळेच अमरावतीच्या विकासावर अजितदादा पवार यांचे प्रतिबिंब उमटले असून…

Read More

भारतातील तत्त्वज्ञानाचा खरा संघर्ष समजून घेणे गरजेचे- डॉ. सकपाळ:कवी शिवा इंगोले यांच्या काव्यसंग्रहाचे मान्यवरांकडून उत्साहात प्रकाशन‎

“कवी हा संस्कृतीला प्रश्न विचारतो. त्यामुळेच भारतीय तत्त्वज्ञानाचा जो संघर्ष आहे, तो समजून घेतला पाहिजे,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. अनिल सकपाळ यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर रायटर्स असोसिएशनच्यावतीने साहित्यिक बाबुराव बागुल यांच्या जयंतीनिमित्त दादर येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या सुरेंद्र गावस्कर सभागृहात प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मूळ अमरावतीकर असलेले ज्येष्ठ…

Read More

विद्यार्थ्यांवरील गुन्हे तातडीने मागे घ्या; तरूणाईचे भविष्य उद्ध्वस्त करू नका:कारवाई करून तरुणांचे भवितव्य खराब करण्याचे सरकारचे प्रयत्न‎

एमपीएससी, युपीएससी, नीट, एसएससी, शिक्षक भरती, विविध स्पर्धा परीक्षा व भरती प्रक्रियेत सातत्याने होत असलेल्या गैरव्यवहारांबाबत, परीक्षेच्या व्यवस्थेविरोधात करण्यात आलेल्या आंदोलनात विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे तातडीने मागे घेण्याची मागणी . विद्यार्थ्यांवर आंदोलनादरम्यान दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे (एफआयआर) तत्काळ मागे घेण्याची मागणी करणारे सविस्तर निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले आहे. दरम्यान, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी…

Read More

महिलांनी बचत गटांमार्फत व्यवसायाला प्राधान्य द्यावे‎:60 टक्के मिळणार अनुदान, प्रकल्प अधिकारी डॉ. स्वाती संत यांचे मेळाव्यात प्रतिपादन

अडगाव बु. अकोट उपविभागांतर्गत येणाऱ्या अडगाव बु. येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत (पोकरा) विविध कामांचा आढावा घेण्यासाठी क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले होते. या क्षेत्रभेटीदरम्यान आयोजित चर्चासत्रात बोलताना मुंबई येथील प्रकल्प अधिकारी डॉ. स्वाती संत यांनी अडगाव बु. गावातील महिला बचत गटांनी विविध व्यवसायांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले. तसेच या प्रकल्पाच्या माध्यमातून महिलांना व्यवसायासाठी…

Read More