आंबेडकर जयंती मिरवणुकीसाठी महापौरांचे महत्त्वाचे निर्देश:पिण्याचे पाणी, मोबाईल टॉयलेट्ससह सर्व सुविधा पुरवण्याचे आदेश
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त १४ एप्रिल रोजी निघणाऱ्या मिरवणुकीदरम्यान भाविकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे निर्देश महापौर समीर राजूरकर यांनी दिले आहेत. मिरवणूक मार्गावर पिण्याच्या पाण्याची आणि मोबाईल टॉयलेट्सची व्यवस्था करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. महानगरपालिकेतर्फे आंबेडकर जयंती मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पुरविण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत…