Headlines

एसीबीचा 1.75 कोटींचा गुप्त निधी मुख्यालयातच रोखला:कॅगचे गंभीर ताशेरे; 22 अधिकारी 5 वर्षांहून अधिक काळ ठाण मांडून

भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात (एसीबी) गंभीर आर्थिक आणि प्रशासकीय गैरप्रकार सुरू असल्याचे महालेखापाल (कॅग) यांच्या अहवालातून समोर आले आहे. गुप्त माहिती गोळा करण्यासाठी आलेला 1.75 कोटी रुपयांचा ‘गुप्त निधी’ विभागीय कार्यालयांपर्यंत पोहोचू न देता मुख्यालयातच रोखून धरण्यात आला आहे. तसेच, 22 वरिष्ठ अधिकारी नियमांचे उल्लंघन करत पाच वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच…

Read More

बाळापूर लैंगिक अत्याचार प्रकरण:उपचारादरम्यान पीडित अल्पवयीन मुलीचा मृत्यू, आरोपी महिनाभरापासून फरार

बाळापूर शहरात एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या कथित लैंगिक अत्याचार प्रकरणाला आता अत्यंत दुःखद वळण लागले आहे. अत्याचाराच्या मानसिक धक्क्यातून आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या पीडित मुलीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण बाळापूरमध्ये हळहळ आणि संतापाची लाट उसळली आहे. संतापजनक बाब म्हणजे, या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला पोलिस कर्मचारी पवन वडगावे हा गुन्हा दाखल होऊन…

Read More

पुण्यातील वाहतूक कोंडी फुटणार!:महापालिकेने हाती घेतले 12 'मिसिंग लिंक' रस्ते प्रकल्प, विकास आराखड्यातील प्रलंबित कामांना गती

पुण्यातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि रस्ते नेटवर्क अधिक सक्षम करण्यासाठी, पुणे महापालिकेने आगामी वर्षभरात 12 महत्त्वाचे ‘मिसिंग लिंक’ रस्ते प्रकल्प पूर्ण करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवले आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले हे प्रकल्प मार्गी लागल्यास, शहरातील विविध भागांमधील कनेक्टिव्हिटी वाढेल, नागरिकांचा प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या वाचेल आणि मुख्य वर्दळीच्या भागांमधील वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणावर कमी होईल, असा…

Read More

वांद्रे येथील 'रंगशारदा' हॉटेलवर EDची धाड!:तब्बल 332 कोटींची मालमत्ता जप्त, मनी लॉन्डरिंग प्रकरणात प्रभुदास लोटियांवर ठपका

वांद्रे येथील प्रसिद्ध ‘रंगशारदा’ हॉटेलवर ईडीने धडक कारवाई करत, कथित मनी लॉन्डरिंग प्रकरणात तब्बल 332 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. म्हाडाकडून सांस्कृतिक उपक्रमांसाठी सवलतीच्या दरात मिळालेल्या जमिनीचा व्यावसायिक वापर केल्याचा ठपका या प्रकरणात ठेवण्यात आला असून, याच आर्थिक फसवणुकीप्रकरणी प्रभुदास लोटिया यांच्यावर मुख्य आरोप करण्यात आले आहेत. ईडीच्या म्हणण्यानुसार, म्हाडाने मराठी नाट्य, साहित्य आणि…

Read More

मुंबईत ठाकरेंची जल्लोष सभा:उद्धव व राज ठाकरे संबोधित करणार; काय बोलणार याकडे असणार लक्ष

विद्यार्थ्यांच्या आंदोलनासमोर केंद्र सरकारलाही झुकावे लागले आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला. याच पार्श्वभूमीवर मुंबईत ठाकरे बंधूंची जल्लोष सभा आयोजित करण्यात आली आहे. ही सभा मुंबियाच्या सावरकर मार्गावर आयोजित करण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यासह दोन्ही पक्षातील नेते, पदाधिकारी व…

Read More

ना देशात गृहमंत्री, ना महाराष्ट्रात:आंदोलक मुलींवरील लाठीचार्जप्रकरणी अमित शहांनी राजीनामा द्यावा- उद्धव ठाकरे

नीट पेपरफुटीसाठी प्रधान यांचा राजीनामा मागितला तर दिल्ली आंदोलनादरम्यान मुलींवर विचित्र पद्धतीने लाठीचार्ज करण्यात आला त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा राजीनामा घेतला पाहिजे. या आंदोलनावेळी गृहमंत्री कुठे दिसले का? महाराष्ट्रात आणि देशात गृहमंत्रीच नाहीत, असे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, सरकार चालवता येत नाही अशा लोकांकडे सध्या सत्ता…

Read More

आषाढी वारी हा समतेचा सोहळा, जगाला दिशा दाखवणारा:पांडुरंगाच्या कृपेने अलनिनो टळला अन् धरणे भरली, माजी मंत्री थोरात यांचे प्रतिपादन‎

पंढरपूरचा पांडुरंग हे महाराष्ट्राचे आणि सर्व भक्तांचे आराध्य दैवत आहे. विठूरायाच्या कृपेने यावर्षी अलनिनोचा धोका टळून चांगला पाऊस झाला आहे. ही अत्यंत समाधानाची बाब असून आषाढी वारी हा अध्यात्माचा, समतेचा आणि एकतेचा सोहळा जगासाठी मार्गदर्शक आहे, असे प् . संगमनेर मधील चैतन्य नगर येथे विठ्ठल मंदिरात काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या…

Read More

अकोट-अकोला-शेगाव मार्गावर वर्दळ; पादचाऱ्यांचा जीव टांगणीला:देवरी फाट्यावर स्पीड ब्रेकर उभारा; नागरिकांचे साकडे‎

अकोट-अकोला राज्य मार्गावरील देवरी फाटा हा परिसरातील अत्यंत वर्दळीचा आणि महत्त्वाचा चौक मानला जातो. या चौकातून शेगावकडे जाणारा मुख्य मार्ग जात असल्याने दिवस-रात्र मोठ्या प्रमाणावर वाहनांची ये-जा सुरू असते. मात्र, या मार्गावरून भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी देवरी फाटा येथे तातडीने स्पीड ब्रेकर उभारण्यात यावेत, अशी आग्रही मागणी परिसरातील…

Read More

तेल्हाऱ्यात पाऊस तर अकोला तहानलेलाच:आतापर्यंत 316 मिमीची अपेक्षा; प्रत्यक्षात 230 मिमी पाऊस‎

जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या पावसाची आकडेवारीनुसार, जिल्ह्यात आतापर्यंत अपेक्षित सरासरीच्या ७२.९ टक्के पावसाची नोंद झाली आहे. २५ जुलैपर्यंत जिल्ह्यात ३१६.९ मिमी पावसाची अपेक्षा असताना प्रत्यक्ष २३०.९ मिमी पाऊस झाला आहे. अहवालाच्या दिवशी (२५ जुलै) जिल्ह्यात सरासरी ३.५ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील सातही तालुक्यांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास तेल्हारा आणि अकोला या दोन तालुक्यांमध्ये मोठा…

Read More

श्रीक्षेत्र लोणी टाकळी येथे जन्मोत्सवाचा समारोप:धार्मिक पालखी सोहळा, भाविकांना केले महाप्रसादाचे वितरण‎

लोणी टाकळी येथील ज्ञानेशकन्या श्री संत गुलाबराव महाराज संस्थान (जन्मस्थान), येथे जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. विविध धार्मिक कार्यक्रमांसह या जन्मोत्सवाचा समारोप आज, शनिवारी आषाढी शुद्ध एकादशीच्या निमित्ताने करण्यात आला. सप्ताहादरम्यान दररोज सकाळी नित्य स्थापना, दुपारी गुलाब गौरव पारायण, सायंकाळी हरिपाठ आणि भजन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. चार दिवस चाललेल्या या धार्मिक सोहळ्यात परिसरासह…

Read More