Headlines

वाहनचालकांना परवाना देताना, नूतनीकरणाच्या वेळी मराठी भाषा अनिवार्य:प्रताप सरनाईक यांनी प्रस्ताव गृह विभागाकडे पाठवला

राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मोठा बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वाहनचालकांना परवाना देताना तसेच त्याच्या नूतनीकरणाच्या वेळी मराठी भाषेचे ज्ञान तपासले जावे, यासाठी परिवहन विभागाने हालचाली सुरू केल्या आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भातील प्रस्ताव गृह विभागाकडे पाठवला असून, संबंधित नियमांमध्ये बदल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रस्तावानुसार, सार्वजनिक सेवा वाहन…

Read More

बीड जिल्हा कारागृहातील नवी ऑडिओ क्लिप व्हायरल:जेलमध्ये कराडचा दबदबा? मारहाण, दबाव आणि व्हीआयपी ट्रीटमेंट?

बीड जिल्हा कारागृहातील घडामोडींनी पुन्हा एकदा खळबळ उडवली आहे. गेल्या काही दिवसांपासून तुरुंगातील कैद्यांच्या संभाषणाच्या ऑडिओ क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. संतोष देशमुख हत्याप्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मिक कराड आणि त्याच्या गँगकडून इतर कैद्यांवर दबाव टाकला जात असल्याचे आरोप यामध्ये करण्यात आले आहेत. आधी अझहर पठाण या कैद्याच्या दोन वेगवेगळ्या क्लिप्स समोर आल्या होत्या, आणि…

Read More

नोकरीच्या आमिषाने ५ लाखांची फसवणूक:पोलिस असल्याची बतावणी करणाऱ्या आरोपीविरोधात गुन्हा दाखल

पुणे महापालिकेत नोकरी लावण्याच्या आमिषाने एका महिलेची ५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीने स्वतःला पोलिस असल्याचे भासवून ही फसवणूक केली असून, याप्रकरणी खराडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. लता अरुण साळुंके (वय ६०, रा. चाकण) यांनी याबाबत खराडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, केतन दादासाहेब साळुंके (वय ४०, रा….

Read More

पुण्यात 2 अपघातात 2 ठार:बाणेरमध्ये 19 व्या मजल्यावरून पडून बांधकाम मजुराचा, तर डंपरच्या धडकेत बारामतीच्या तरुणाचा मृत्यू

पुणे शहरातील बाणेरमध्ये एका नियोजित गृहप्रकल्पाच्या 19 व्या मजल्यावरून पडून एका बांधकाम मजुराचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेप्रकरणी बांधकाम व्यावसायिक आणि ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रागीब एहसान राकीब (वय 19, रा. पॅनकार्ड क्लब रस्ता, बाणेर) असे मृत मजुराचे नाव आहे. त्याचा भाऊ मोहमद एहसान राकीब (वय 21, रा. पॅनकार्ड क्लब रस्ता, बाणेर) यांनी…

Read More

राऊतांना स्वतःची जागा वाचवण्यासाठी ठाकरेंचा पत्ता कट करायचा आहे:विधान परिषद ठाकरेंना, तर राज्यसभा काँग्रेसला असे सपकाळांनी ठणकावले- नवनाथ बन

मविआमध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी रस्सीखेच सुरू आहे. काल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मातोश्रीवर जात सांगितले की आता विधान परिषद तुम्हाला हवी असेल तर येणाऱ्या राज्यसभेचा निर्णय आताच घ्यावा लागेल. विधान परिषद जर तुम्हाला हवी असेल तर येणारी राज्यसभा काँग्रेसला द्यावी लागेल असे त्यांनी ठणकावत सांगितले आहे, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे….

Read More

सिद्धेश्वर एक्स्प्रेसवरील दरोड्याचा कट उघड:धाराशिवच्या 9 महिला अटकेत, कुर्डुवाडी पोलिसांची धडाकेबाज कारवाई

सिद्धेश्वर एक्स्प्रेसमध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या धाराशिवच्या नऊ महिलांना रेल्वे सुरक्षा बलाने बुधवारी पहाटे सापळा रचून ताब्यात घेतले. जेऊर ते कुर्डुवाडी दरम्यान बोगीत संशयितपणे वावरणाऱ्या महिलांच्या टोळीचा कुर्डुवाडी लोहमार्ग पोलिसांनी पर्दाफाश केला. चौकशीअंती सर्वांवर गुन्हा दाखल करून अटक केली. महिलांच्या हालचाली संशयास्पद बुधवार, २२ एप्रिल रोजी पहाटे ५ ते ५.३० च्या सुमारास मुंबईहून सोलापूरकडे येत…

Read More

बंगालमध्ये ममता दीदींची 'मुघलशाही' संपणार! त्या घरी जाणार- चंद्रेशखर बावनकुळे:देवस्थान इनामी जमिनींचा प्रश्न सुटणार, सरकार नवा कायदा आणण्याच्या तयारीत

पश्चिम बंगालमध्ये यंदा विक्रमी मतदान झाले असून हे मतदान ममता बॅनर्जी यांच्या विरोधातील जनक्षोभ दर्शवते. मुघलशाही पद्धतीने काम करणाऱ्या ममता बॅनर्जी आता घरी जाणार हे निश्चित आहे, अशा शब्दांत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पश्चिम बंगालच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. नागपूर येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्यातील पाणीटंचाई आणि देवस्थान जमिनींच्या कायद्याबाबतही महत्त्वपूर्ण माहिती दिली….

Read More

आमदार संजय गायकवाड यांची गुंडगिरी खपवून घेणार नाही:त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांनी ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाचे प्रकाशक प्रकाश आंबी यांना दिलेली जीवे मारण्याची धमकी अत्यंत निंदनीय असून, हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर झालेले थेट आक्रमण आहे. याप्रकरणी आमदार गायकवाड यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करून त्यांच्यावर तात्काळ गुन्हा करण्यात यावा, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. या संदर्भात वडेट्टीवार…

Read More

रक्तदानातून वाढली थॅलेसेमियाग्रस्त चिमुकल्यांची जीवनरेखा:उन्हाळ्यात रक्त टंचाईमुळे पालक चिंताग्रस्त, 28 जणांच्या रक्तदानातून दिलासा

थॅलेसेमियाग्रस्त चिमुकल्यांसाठी रक्त म्हणजे अक्षरशः जीवनरेखा असते. मात्र, उन्हाळ्याच्या दिवसांत वाढलेल्या रक्त टंचाईमुळे या निरागस जीवांच्या पालकांची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे. वेळेवर रक्त उपलब्ध न झाल्याने अनेक पालकांना डोनरच्या शोधात भटकंती करावी ल . शहरातील रक्तपेढ्यांमध्ये सध्या केवळ ५० टक्केच रक्तसाठा उपलब्ध आहे. दररोज अंदाजे १०० रक्तपिशव्यांची गरज असताना फक्त ४५ ते ५० पिशव्या मिळत…

Read More

मारहाण करणाऱ्यांची नावे पँटवर लिहून आत्महत्या:तर बारावीच्या विद्यार्थ्यांचा वादातून गळफास‎

विवाहाच्या पूर्व संध्येला डीजेच्या तालावर नाचताना झालेल्या वादातून आंबीलहोळ येथे शेतात तरुणाने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. तर जामनेर बस स्थानक परिसरात विद्यार्थ्यांशी वाद झाल्याच्या कारणावरून बारावीतील विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. बुधवारी रात्री जामनेर तालुक्यात या दोन्ही घटना घडल्या. वरखेडी येथील रहिवासी असलेला पवन मिस्त्री याच्या मामाचे गाव आंबीलहोळ आहे. आंबील होळ…

Read More