Headlines

राष्ट्रीय विद्युत क्रीडा स्पर्धा:महावितरणची कबड्डी आणि खो-खोमध्ये विजयी घोडदौड, तर खो-खोमध्ये वाईकरच्या नेतृत्वात आगेकूच

एमएसईबी होल्डिंग कंपनीद्वारे आयोजित अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियंत्रण मंडळाच्या 45 व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत बुधवारी (दि.6) झालेल्या चुरशीच्या साखळी सामन्यांमध्ये महावितरणच्या पुरुष व महिला संघाने प्रतिस्पर्धी संघावर सहज विजय मिळवला. तर खो-खोमध्ये महावितरणच्या पुरुष संघासह राजस्थानच्या महिला व पुरूष संघाने आगेकूच केली आहे. बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात आज पहिल्या सत्रात कबड्डी, खो-खोचे…

Read More

गोकुळ निवडणुकीचा मार्ग मोकळा!:सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल; 90 दिवसांत निवडणुका घेण्याचे दिले आदेश

राज्याचे लक्ष लागलेल्या कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघ निवडणूक प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला असून, ही निवडणूक प्रक्रिया 90 दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. राज्य सरकारने प्रशासकाची नियुक्ती केल्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच हा नवा ट्विस्ट समोर आला आहे. यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने 1200 संस्थांच्या चौकशीनंतर निवडणूक घेण्याचे निर्देश दिले होते. मात्र…

Read More

धीरेंद्र शास्त्रींना शिवरायांवरील वादग्रस्त विधान भोवणार!:तात्काळ कायदेशीर कारवाई करा, शिवप्रेमींची पोलिस आयुक्तांकडे तक्रार

दिनांक 24 एप्रिल 2026 रोजी नागपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या ऐतिहासिक विपर्यास, मानहानीकारक व भावना दुखावणारे वक्तव्याबद्दल भारतीय न्याय संहिता (बीएनएस 2023) व इतर कायद्या अन्वये त्यांच्यावर आणि स्वामी स्वरूपानंद यांच्यावर कायदेशीर कारवाईबाबत पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांना सकल मराठा समाज आणि समस्त शिवप्रेमींच्या वतीने ही तक्रार दाखल करण्यात आली. प्रा.डॉ.शिवानंद भानुसे यांनी…

Read More

रितू तावडेंना डोक्याचा भाग आहे का?:पदमुक्त झाल्यावर माझ्याच बाजूला बसतील, तेव्हा बघून घेईन; किशोरी पेडणेकरांचा इशारा

महिला अत्याचारांच्या वाढत्या घटनांवर संताप व्यक्त करावा तितका कमी. राज्यातील कायदा-सुव्यवस्था आहे कुठे? लहान मुलींवरील अत्याचारांच्या घटनांवर सरकारच्या संवेदनशीलतेचा अभाव दिसून येतो, अशी टीका मुंबईच्या माजी महापौर व मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्ष नेत्या किशोरी पेडणेकर यांनी केली आहे. तसेच त्यांनी महापौर रितू तावडे यांच्यावरही हल्लाबोल केला आहे. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्यावर टीका करताना किशोरी…

Read More

भाजपची बंगालनंतर आता महाराष्ट्रावर नजर:SIR वर लक्ष केंद्रित; मराठी मुलूख जिंकण्यासाठी सर्व लहानथोर कार्यकर्त्यांना देणार प्रशिक्षण

पश्चिम बंगालमधील ऐतिहासिक विजयानंतर भाजपने आता आपला मोर्चा महाराष्ट्राकडे वळवला आहे. भाजपने बंगालमध्ये एसआयरच्या जोरावर विजय मिळवल्याचा दावा केला जात आहे. आता हीच रणनीती भाजप महाराष्ट्रात राबवण्याची शक्यता आहे. यासाठी मराठी मुलूखावरील आपली पकड अधिक मजबूत करण्यासाठी भाजपने आपल्या सर्वच स्तरांवरील कार्यकर्त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. भाजपचा मागील 15 वर्षांपासून पश्चिम बंगालचा गड…

Read More

ज्येष्ठ कवी माधव पवार यांचे प्रदीर्घ आजाराने निधन:वयाच्या 71 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, वेदनांशी मैत्री करणारा कवी म्हणून ओळख

सोलापुरातील प्रख्यात कवी, गीतकार आणि ज्येष्ठ साहित्यिक माधव रामचंद्र पवार (वय ७१) यांचे आज पहाटे दीर्घ आजाराने निधन झाले. गेल्या १२-१३ वर्षांपासून ते किडनीच्या व्याधीने त्रस्त होते. या काळात तब्बल १ हजार ६५० डायलिसिस सोसून त्यांनी मृत्यूशी कडवी झुंज दिली, मात्र अखेर त्यांची ही झुंज अपयशी ठरली. ते ज्येष्ठ कवी आणि गीतकार रा. ना. पवार…

Read More

अजित पवारांचा विमान अपघात की घातपात?:अमोल मिटकरींनी 'अघोरी पूजे'वर बोट; पोलिस महासंचालक आणि SIT प्रमुखांची घेतली भेट

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या घटनेने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. मात्र, आता या अपघाताला ‘अघोरी’ विद्येची आणि ‘भोंदूगिरी’ची किनार असल्याचा खळबळजनक संशय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी मिटकरी यांनी मुंबईत राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते आणि ‘एसआयटी’ (SIT) प्रमुख…

Read More

काँग्रेस म्हणजे मित्रपक्षांना गिळणारा अजगर!:ठाकरेंनी ममतांच्या घरात बसून आंदोलन करावं, सल्लागारांनी जरांगेंना चुकीची माहिती देऊ नये- नवनाथ बन

उद्धव ठाकरेंनी मातोश्रीतून बाहेर पडत कोलकत्यामध्ये जात ममता बॅनर्जी यांच्या घरात बसून एक वर्षभराचे आंदोलन करावे, कारण त्यांना घराबाहेर पडावे वाटत नाही, असा टोला भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी लगावला आहे. सत्ताधारी पक्षाचे सोडा संजय राऊत यांनी आपल्या पक्षाचे आमदार-खासदार यांच्याकडे लक्ष दिले पाहिजे. तुमच्या लोकांना काय त्रास आहे हे तुम्हाला माहिती नाही, एकनाथ शिंदे…

Read More

कुर्डुवाडीत उन्हाचा तडाखा, बाजारात शुकशुकाट‎:पोटासाठी घामाच्या धारा गाळत छोटे विक्रेते रस्त्यावरच; ‘गरीबांच्या फ्रिज’ला श्रीमंतांचीही पसंती

​कुर्डुवाडी4 तासांपूर्वी कॉपी लिंक ​कुर्डुवाडी वैशाख वणव्याचा तडाखा आता कुर्डुवाडी शहराला बसू लागला असून तापमानाचा पारा ४२ अंशांवर पोहोचला आहे. रणरणत्या उन्हामुळे शहराचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून दुपारी १२ ते ५ या वेळेत मुख्य रस्ते आणि बाजारपेठेत अक्षरशः ‘कर्फ्यू’ लागल्यासारख Source link

Read More

मराठी सक्तीची भाषा असताना हिंदीची परीक्षा कशासाठी?:दिल्लीतल्या भैय्यांना खूश करण्यासाठी घाट? महाराष्ट्रात हिंदीचं आक्रमण खपवून घेणार नाही- संदीप देशपांडे

महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांनी हिंदी भाषा का शिकावी याचे सरकारने उत्तर दिले पाहिजे. त्यांना मराठी भाषा येणं अपेक्षित आहे.पडद्याआडून हिंदी भाषेची सक्ती करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे, त्याचा आम्ही निषेध करतो, असे मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे. सरकारने ही परीक्षा रद्द करावी अन्यथा परीक्षा केंद्राबाहेर जो राडा होईल त्यासाठी सरकार जबाबदार असेल, असा इशारा…

Read More