Headlines

"निधी मिळत नव्हता" म्हणत ठाकरेंना रामराम:पण ओमराजेंचे 16 कोटी, तर संजय दिना पाटलांचे 14 कोटी पडूनच! खासदार निधीच्या आकडेवारीवरून बंडखोरांच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला रामराम ठोकत 6 खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी झाल्याची घोषणा सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आली. पक्ष सोडताना या सर्व बंडखोर खासदारांनी एकमुखाने एकच कारण पुढे केले होते: “आम्ही विरोधी पक्षात असल्याने विकासकामांसाठी निधी मिळत नव्हता, त्यामुळे मतदारसंघातील कामे करता येत नव्हती.” मात्र, आता ‘खासदार स्थानिक…

Read More

व्यावसायिक केतन अग्रवालचा अपघाती मृत्यू नव्हे, खून:होणाऱ्या पत्नीने मित्रांच्या मदतीने केली हत्या, पुणे पोलिसांचा खुलासा

पुणे ग्रामीण पोलिसांनी लोहगड किल्ल्यावरील व्यावसायिक केतन अग्रवाल (वय 26) याच्या मृत्यूचे गूढ उकलले आहे. सुरुवातीला अपघाती मृत्यू वाटलेली ही घटना पूर्वनियोजित हत्या असल्याचे तपासात समोर आले आहे. केतनची होणारी पत्नी सिया गोयल हिनेच मित्रांच्या मदतीने त्याचा खून केल्याचा धक्कादायक खुलासा पोलिसांनी केला आहे. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. मृत केतन…

Read More

हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी:स्फोटावर स्फोट होतच राहतील; खासदार श्रीकांत शिंदेंचं सूचक विधान, आणखी मोठ्या राजकीय घडामोडींचे संकेत

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या घडामोडींची धूळ अजून खाली बसलेली नसतानाच शिवसेना नेते आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या एका सूचक वक्तव्याने नव्या राजकीय चर्चांना तोंड फुटले आहे. “हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे,” असे…

Read More

खासदारांचा मान-सन्मान म्हणजे 50 ते 75 कोटी रुपये:मतदारसंघाचा निधी पडून, मग विकास करायला तिकडे गेलात की कंत्राटं घ्यायला?- संजय राऊत

संजय दिना पाटील यांनी काही बोलण्यापूर्वी खासदारकीचा राजीनामा द्यावा. उद्धव ठाकरेंशी भांडण नव्हते तर त्यांनी पक्ष सोडायला नको होता. ज्यांच्याशी त्यांचे भांडण आहे त्यांच्यासंदर्भात मातोश्रीवर येत चर्चा करायला हवी होती. या सर्व गोष्टीचा आणि पक्ष सोडण्याचा काही संबंध नाही. ते हे का सांगत नाहीत की 13 तारखेला त्यांच्याकडे 15 कोटी रुपयांचे खोके आले, त्यानंतर 14…

Read More

दांडीबहाद्दर मंत्र्यांना फडणवीसांची कडक तंबी!:'सभागृह थांबलं तर खपवून घेणार नाही'; बेताल वक्तव्यांवरही नाराजी

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मंत्रिमंडळातील सदस्यांना स्पष्ट शब्दांत इशारा देत शिस्तीचा डोस दिला आहे. मंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे सभागृहाचे कामकाज ठप्प होणार असेल, तर ते कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर काही मंत्र्यांच्या सार्वजनिक वक्तव्यांमुळे सरकारची प्रतिमा मलिन होत असल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. मंत्र्यांच्या…

Read More

अमित शाहांनी सांगितलं तेच होणार:99.99% लोक शिवसेनेत येतील, तिथे फक्त 'हम दो हमारे दो'च उरतील- आशिष जैस्वाल

6 बंडखोर खासदारांच्या पक्षप्रवेशाने आधीच बॅकफूटवर गेलेल्या ठाकरे गटाची कोंडी करण्यासाठी शिंदे गटाच्या आमदारांनी आता मानसिक दबाव वाढवण्यास सुरुवात केली आहे. “उद्या ९९.९९ टक्के लोक एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत दाखल होतील. ठाकरे गटात शेवटी फक्त ‘हम दो हमारे दो’ एवढेच लोक उरतील असा खळबळजनक दावा शिंदे गटाचे आमदार आशिष जैस्वाल यांनी केला आहे. “अमित शाहांनी सांगितल्याप्रमाणे…

Read More

“बॅडमिंटन’ छंद म्हणून जोपासला तर अनेक खेळाडू तयार होतील:जिल्हा क्रीडा अधिकारी खुरंगे; विधी सैनी व राजवीर कुक्कडवाल यांना विजेतेपद‎

बॅडमिंटन खेळत असताना राज्यस्तरीय व राष्ट्रीय प्रमाणपत्रे मिळविणे हा हेतू न ठेवता खेळाडूंनी बॅडमिंटन खेळ हा छंद म्हणून जोपासावा. राष्ट्रीय प्रमाणपत्र मिळाल्यानंतर अनेक खेळाडू हा खेळ सोडून जातात. त्यामुळे महाराष्ट्राला व देशाला आंतरराष्ट्रीय खेळाडू मिळ . वाडिया पार्क क्रीडा संकुल येथे बॅडमिंटन हॉलमध्ये नगर डिस्टिक्ट बॅडमिंटन असोसिएशनच्यावतीने जी एच रायसोनी मेमोरियल जिल्हा अजिंक्यपद व जिल्हा…

Read More

‘तुझ्यासमोरच हात पकडतो, काय करशील? पतीदेखत महिलेचा विनयभंग:जाब विचारताच मायलेकाकडून चाकूहल्ला, छत्रपती संभाजीनगरची घटना

रस्त्यावरून जाणाऱ्या एका विवाहितेची छेड काढल्याचा जाब विचारल्याने, एका गुंडाने पतीसमोरच महिलेचा हात पकडून विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. एवढेच नव्हे, तर ‘तुझ्या मुलाला हेच शिकवले का?’ असा जाब विचारणाऱ्या पीडितेवर आरोपीच्या आईने थेट चाकूने वार केले. हा प्रकार 20 जून रोजी दुपारी शहरातील टाऊन हॉल परिसरातील लाल मशिदीसमोर घडला. फिर्यादी महिला आणि तिचे…

Read More

पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस:दुष्काळ, पाणीटंचाई आणि ‘ऑपरेशन टायगर’वरून सभागृहात खडाजंगीची शक्यता

महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी, विविध अध्यादेशांचे सादरीकरण आणि मान्यवरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. आजच्या कामकाजात राज्यातील दुष्काळ, पाणीटंचाई, शेतकऱ्यांचे प्रश्न, वीजटंचाई तसेच विविध प्रलंबित मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे. दरम्यान, शिवसेना (ठाकरे गट) आणि शिंदे गटातील राजकीय घडामोडी, सहा खासदारांच्या पक्षांतराचा मुद्दा आणि ‘ऑपरेशन…

Read More

Good health is wealth – Commissioner Nayana Gunde, Ministry of AYUSH, in collaboration with District Administration, celebrated Yoga Day at Sports Complex with enthusiasm

Marathi News Local Maharashtra Amravati Good Health Is Wealth Commissioner Nayana Gunde, Ministry Of AYUSH, In Collaboration With District Administration, Celebrated Yoga Day At Sports Complex With Enthusiasm अमरावती56 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अमरावती उत्तम आरोग्य हे संपत्तीपेक्षा कमी नाही आणि ते मिळवण्याचा योग हा सर्वात सोपा मार्ग आहे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी…

Read More