Headlines

ऑपरेशन टायगरनंतर दिल्लीत हालचालींना वेग:लोकसभा अध्यक्षांचे ठाकरेंच्या शिवसेनेला आमंत्रण; बाजू मांडण्यासाठी आजच बोलावले

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘ऑपरेशन टायगर’ने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लोकसभा स्तरावर मोठा धक्का दिला आहे. ९ पैकी ६ खासदारांनी थेट सत्ताधारी गटात प्रवेश केल्यामुळे संसदेत तांत्रिकदृष्ट्या कोंडी झालेल्या ठाकरे गटाला आता लोकसभा अध्यक्षांनी आपली बाजू मांडण्यासाठी पाचारण केले आहे. “तुमची काय बाजू आहे, ती आजच समोर येऊन स्पष्ट करा,” असा महत्वपूर्ण निरोप लोकसभा…

Read More

मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन, 3 दिवसांनी विलास घुलेंवर अंत्यसंस्कार:केजमध्ये सलग 53 तास मृतदेहासह आंदोलन, खासदारपुत्रावर गुन्ह्याची मागणी

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील कदमवाडी येथील ‘गावकरी’ हॉटेलचे मालक विलास घुले यांच्या हत्या प्रकरणामुळे सलग तीन दिवस केज शहरात प्रचंड तणावाचे वातावरण होते. खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरव सोनवणे याच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थांनी विलास घुले यांचा मृतदेह तब्बल नऊ तास थेट केज पोलीस ठाण्याच्या आवारात ठेवून ठिय्या मांडला. अखेर…

Read More

Ketan Agrawal Murder Mystery Solved at Lohgad Fort; Pune Police Crack Case

पुणे येथील केतन अग्रवाल खून प्रकरणाच्या तपासात अनेक नवीन खुलासे झाले आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, जून महिन्याच्या उकाड्यात हुडी घालून लोहगड किल्ल्यावर फिरणारा एक तरुण खुनाच्या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा धागा ठरला. . तो तरुण किल्ल्यावर केतन अग्रवाल (26) आणि त्याची होणारी पत्नी सिया गोयल (20) यांचा पाठलाग करत होता. नंतर त्याची ओळख चेतन चौधरी…

Read More

अखेर श्रीरामपूरची ‘बिनवेशीचे गाव’ ही नकारात्मक ओळख पुसणार:19 मार्च 2026 रोजी कामाचा शुभारंभ श्रीरामपूर-बेलापूर हद्दीवरील ऐतिहासिक वेशीचे काम पूर्णत्वाकडे‎

. श्रीरामपूर म्हणजे बिनवेशीचे गाव…” शहराबद्दल नेहमीच व्यक्त केले जाणारे हे नकारात्मक मत आता कायमचे इतिहासजमा होणार आहे. तत्कालीन आमदार दिवंगत जयंत ससाणे यांनी श्रीरामपूरची ही ओळख पुसण्यासाठी बेलापूर-श्रीरामपूर हद्दीवर वेस उभारण्याचा पुढाकार घेतला होता. मात्र, त्यांच्या निधनानंतर अनेक वर्षे हे काम रखडल्याने नागरिकांमधून खंत व्यक्त होत होती. आता अखेर हे काम पूर्णत्वाकडे जात असून,…

Read More

निरोगी वृद्धत्वासाठी आंतरराष्ट्रीय योग दिवस:सारडा महाविद्यालयात शारीरिक शिक्षण विभाग, रासेयो, एनसीसीचा उपक्रम‎

आपल्या संस्कृती आणि परंपरांमध्ये योगसाधनेस विशेष महत्त्व आहे. भारतीय धर्मसंस्कृतीमध्ये “योग” संकल्पनेची मांडणी केलेली आहे. भगवान पतंजली मुनी यांनी आपल्या योगसूत्राद्वारे मानवाच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकासाची महती वर्णन केली आहे. म्हणूनच दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून विविध संकल्पनांतून साजरा करण्यात येतो. दरवर्षीप्रमाणे देशात यंदाही बारावा आंतरराष्ट्रीय योग दिन “निरोगी वृद्धत्वासाठी योग”…

Read More

ढगाळ वातावरण पण पाऊस गायब; खरिप हंगाम लांबणार:अल्प-मुदतीच्या तूर, उडीद, मूग पिकाला बसणार फटका‎

जून महिन्याचा अर्धा कालावधी संपत आला तरी, अकोट तालुक्यासह संपूर्ण अकोला जिल्ह्यात अद्याप समाधा नकारक पावसाने हजेरी लावलेली नाही. दरवर्षी या काळात शेतात पेरण्यांची लगबग पाहायला मिळते; मात्र यंदा पावसाने दडी मारल्यामुळे खरीप हंगाम चांगलाच लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पावसाच्या या मोठ्या विलंबाने कोरडवाहू शेतकरी तर चिंतेत आहेतच, पण भूगर्भातील जलपातळी कमालीची घटण्याच्या…

Read More

अधिवास:हरिसालच्या जंगलात पुन्हा घुमतेय डरकाळी, आता मेळघाटच्या जंगलाला मिळाली नवसंजीवनी‎

मागील काही दिवसांपासून सातत्याने आदिवासी तसेच पर्यटकांना हरिसालच्या जंगलात वाघाचे दर्शन होत असून नियमितपणे त्यांच्या डरकाळ्या ऐकू येत आहेत. त्यामुळे येथे पर्यटकांची संख्या हळूहळू वाढू लागली आहे. पावसाळा सुरू झाला की, येथील पर्यटन बहरते. कारण सृष्टी नव्या नवरीप्रमाणे नटते. अशातच जर वाघ दिसत असतील, तर पर्यटकांच्या दृष्टीने ही जमेची बाजू आहे. स्थानिकांनाही यामुळे निश्चितच लाभ…

Read More

पावसाविना 21 दिवस कोरडे, मोहोळ तालुक्यातील खरीप हंगाम धोक्यात:भूजल पातळी खालावल्याने डाळिंब, ऊस अन् फुलपिके लागली करपू

मोहोळ तालुक्यात मान्सूनच्या संथ गतीमुळे बळीराजाच्या चिंतेत कमालीची भर पडली आहे. चालू जून महिन्याचे पहिले २१ दिवस पूर्णपणे पावसाविना कोरडे गेले असून, संपूर्ण खरीप हंगामच धोक्यात येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. दरवर्षी जूनच्या मध्यापर्यंत शेतांमध्ये . पापरी परिसरातील शेतकऱ्यांनी उन्हाळ्यामध्येच जमिनीची कुळवणी, नांगरणी, सपाटीकरण यांसह शेतीच्या मशागतीची सर्व पूर्वतयारी पूर्ण करून ठेवली होती. मात्र मृग…

Read More

आवक मंदावल्याने भाजीपाला दरात वाढ:वांगी, टोमॅटोसह पालक, मेथी, कोथिंबीर आदी पालेभाज्या झाल्या महाग‎

पापरी जून महिना उजाडून २० दिवस उलटले तरी पावसाने काही हजेरी लावली नाही. शेतातील उभ्या फळबागा पिकांसह भाजीपाला व इतर तरकारी माळव्यालाही याचा फटका बसत आहे. ठोक बाजारात शेपू, मेथी, कोथिंबीर, पालक, चुका यासह अन्य पालेभाज्या तसेच वांगी, कोबी, टोमॅटो यांची . यंदा मात्र पावसाने दडी दिली. त्यामुळे कूपनलिका, विहिरी यांची पाणी पातळी खालावली असल्याने…

Read More

जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक बोरसे यांचा सत्कार:आमदार सुहास शिरसाठ, राजेंद्र पाथ्रीकर यांनी घेतला उमेदवारी अर्ज मागे‎

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत एक मोठी आणि अनपेक्षित राजकीय घडामोड समोर आली आहे. फुलंब्री तालुका मतदारसंघातून विधान परिषदेचे आमदार सुहास शिरसाठ यांनी मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते अनिल बोरसे यांची जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पाथ्रीकर यांनी अर्ज मागे घेतला आहे. या निवडणुकीसाठी…

Read More