Headlines

अमृता फडणवीसांची सायकलस्वारी!:पर्यावरण संवर्धनासाठी मोठे पाऊल, दैनंदिन कामांसाठी सायकल वापरण्याचा निर्धार; VIDEO

आपल्या गाण्यांनी आणि विविध सामाजिक उपक्रमांमुळे कायम चर्चेत असणाऱ्या अमृता फडणवीस यांनी आता पर्यावरण संरक्षण आणि आरोग्याच्या दृष्टीने एक अत्यंत कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. भारत सरकारच्या इंधन बचत मोहिमेतून प्रेरणा घेत त्यांनी आपल्या जीवनशैलीत एक महत्त्वपूर्ण सकारात्मक बदल केला असून, आता घरापासून 5 ते 7 किलोमीटरच्या परिसरातील दैनंदिन कामांसाठी त्यांनी थेट सायकलचा वापर करण्यास सुरुवात…

Read More

गुंदवली-डीएन नगर मेट्रो सेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी:बोरीवलीतील समस्यांवर आमदार संजय उपाध्याय यांची BMC आयुक्तांशी भेट

बोरीवली विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार संजय उपाध्याय यांनी बुधवारी बीएमसी आयुक्त अश्विनी भिडे यांची भेट घेऊन बोरीवली परिसरातील नागरिकांच्या समस्या, सार्वजनिक सुविधा आणि रखडलेल्या विकासकामांबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी त्यांनी मेट्रो सेवा, अतिक्रमण, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे शोषण आणि अवैध गतिविधींसह अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले. बीएमसी आयुक्तांनी विविध मागण्यांवर सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन दिले आहे. गुंदवली-डीएन नगर…

Read More

परभणी-हिंगोली विधान परिषदेसाठी शिंदेसेनेचा दावा कायम:विप्लव बाजोरिया यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता

परभणी-हिंगोली विधान परिषदेसाठी महायुतीकडून शिंदेसेनेने आपला दावा कायम ठेवला असून महायुतीकडून पुन्हा एकदा माजी आमदार विप्लव बाजोरीया यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे विश्‍वसनीय सुत्रांनी सांगितले. तर खासदार श्रीकांत शिंदे गुरुवारी ता. ३० हिंगोलीत येणार असून यावेळी ते काही पदाधिकाऱ्यांशी चर्चाही करणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. परभणी- हिंगोली विधान परिषदेची जागा महायुतीकडून शिंदेसेनेकडे आहे. या विधान परिषदेसाठी…

Read More

राज्यात लाळखुरकत लसीकरण मोहिम-9 ची जय्यत तयारी:1.19 कोटी लस मात्रा उपलब्ध होणार, 20 नवीन कोल्ड-रूम उभारल्या

राज्यात लाळखुरकत रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत लसीकरण फेरी-९ साठी पशुसंवर्धन विभागाने तयारी सुरू केली आहे. मे अखेरपर्यंत राज्याला १ कोटी १९ लाख लस मात्रा उपलब्ध होणार आहेत. लसींच्या सुरक्षित साठवणुकीसाठी आणि वितरणासाठी नियोजन सुरू असल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी दिली आहे. या लसींचा साठा सुरक्षित ठेवण्यासाठी नव्याने २० ‘वॉक-इन कोल्ड-रूम’ उभारण्यात आल्या आहेत….

Read More

अजितदादांनी 'देवराई'साठी शब्द दिला होता:पण आताचे आमदार फोनही उचलत नाहीत, अभिनेते सयाजी शिंदेंनी व्यक्त केली खंत

रस्ते रुंदीकरणाच्या नावाखाली होणाऱ्या बेसुमार वृक्षतोडीवर आणि प्रशासकीय अनास्थेवर तीव्र संताप व्यक्त करताना, मला कोणाच्या भ्रष्टाचारात किंवा प्रोटोकॉलमध्ये रस नसून केवळ झाडे जगवण्यात रस आहे, अशी रोखठोक भूमिका अभिनेते व सह्याद्री देवराईचे प्रणेते सयाजी शिंदे यांनी एका विशेष मुलाखतीत मांडली. या समस्येवर केवळ नाराजी न दर्शवता त्यांनी साताऱ्यात ‘झाडांच्या अनाथ आश्रमा’ची स्थापना केली असून, याच…

Read More

पक्षात कोणताही वाद नाही; राष्ट्रवादी एकसंघ असल्याचा दावा:देवगिरीवरील बैठकीनंतर अफवांना ऊत; बनसोडेंचं मोठं स्पष्टीकरण

मुंबईतील देवगिरी निवासस्थानी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीनंतर पक्षातील अंतर्गत मतभेदांच्या चर्चांना मोठं उधाण आलं होतं. मात्र या सर्व चर्चांवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय बनसोडे यांनी प्रतिक्रिया देत स्पष्ट शब्दांत पक्षात कोणताही वाद नसल्याचा दावा केला आहे. माध्यमांमध्ये सुरू असलेल्या वादाच्या बातम्या पूर्णपणे निराधार असून पक्ष सुनेत्रा पवार यांच्या…

Read More

हर्षवर्धन सपकाळ यांना राज्यात फिरू देणार नाही:चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी मोदी, फडणवीसांवर केली होती टीका

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात अत्यंत अश्लाघ्य शब्दांत टीका केली आहे. त्यातून त्यांची नीच प्रवृत्ती दिसून येते. त्यांनी आपली भाषा सुधारली नाही, तर भाजप कार्यकर्ते त्यांना महाराष्ट्रात कुठेही फिरू देणार नाहीत, असा इशारा भाजप नेते तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. यावेळी त्यांनी महायुतीच्या…

Read More

जनगणना करणारी महिला शिक्षिका अपघातात ठार:पुण्याच्या मावळ तालुक्यातील घटना; आतापर्यंत 4 शिक्षक ठार, शिक्षक संघटनांचा संताप

जनगणनेच्या शासकीय कामावर जाणाऱ्या एका महिला शिक्षिकेचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पुण्याच्या मावळ तालुक्यातील कान्हे फाटा येथे घडली आहे. या घटनेमुळे शिक्षक संघटनांनी जनगणनेच्या कामावरून सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. राज्यात सध्या SIR व जनगणनेचे काम सुरू आहे. ही दोन्ही कामे शिक्षकांनाच करावी लागत आहेत. या प्रकरणी शिक्षक संघटना संतप्त सूर आळवत असताना…

Read More

नागपुरात महिला केंद्रांमुळे वार्षिक ६९० टन कार्बन घट:कचरा व्यवस्थापन केंद्रांमुळे पर्यावरणाला मोठा फायदा, नवीन अहवालाचा निष्कर्ष

नागपूर शहरात महिला बचत गटांच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या स्थानिक पातळीवरील कचरा व्यवस्थापन केंद्रांमुळे पर्यावरणाला मोठा दिलासा मिळत आहे. सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट आणि असर सोशल इम्पॅक्ट ॲडव्हायजर्स यांच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका नवीन अहवालानुसार, शहरातील केवळ चार सुका कचरा संकलन केंद्रांमुळे दरवर्षी कार्बनडायऑक्साइडच्या उत्सर्जनात तब्बल ६९० टनांची घट होत असल्याचे समोर आले आहे….

Read More

आरक्षण उपवर्गीकरण- डॉ. चलवादींचे सुवर्णमध्य काढण्याचे आवाहन:दलित समाजात फूट नको, बौद्ध समाजावर अन्याय टाळावा

महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीतील आरक्षणाच्या उपवर्गीकरणाबाबत सध्या सामाजिक आणि राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. हुलगेश चलवादी यांनी या मुद्द्यावर सर्वसमावेशक आणि समतोल विचार करण्याचे आवाहन केले आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे सर्वेसर्वा तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पक्षाची भूमिका…

Read More