Headlines

50 हजार रोपे पडून:11 हजार हेक्टर वनक्षेत्र संकटामध्ये; 3 वर्षांपासून वृक्षलागवड निधी नाही, कन्नडला वन विभागाच्या 850 हेक्टरवर अतिक्रमण‎

तालुक्यातील ११ हजार हेक्टर विस्तीर्ण वनक्षेत्राची प्रादेशिक वन विभागाकडे आहे. मात्र, तीन वर्षांपासून शासनाकडून वृक्षलागवडीसाठी निधीच उपलब्ध झालेला नसल्याने जंगलांचे संवर्धन करणे जिकरीचे झाले आहे. तसेच दोन वाटिकांमध्ये ५० हजार रोपे तयार असून, त्याला मागणी नसल्याने ही झाडे तशीच पडून आहे. त्यात विभागाच्या ८५० हेक्टरवर अतिक्रमण असून, अपुऱ्या मनुष्यबळामुळे या विभागाला गैरसोयीचा सामना करावा लागत…

Read More

दहशतवादी कारवायांच्या संशयावरून परभणीत एटीएसचे 15 ठिकाणी छापे:12 जण ताब्यात, पथकात संभाजीनगर व नांदेड एटीएसही

ऑनलाइन माध्यमातून होत असलेल्या दहशतवादी कारवाया आणि संशयास्पद हालचालींच्या गुप्त माहितीवरून महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) शनिवारी पहाटे परभणी शहरात मोठी कारवाई केली. छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड येथील एटीएसच्या पथकाने पहाटे तीन वाजता शहरातील १५ वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले. या कारवाईत दहशतवादी कारवायांमध्ये सहभागाच्या संशयावरून १२ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. या कारवाईसाठी २६…

Read More

विधिमंडळ:पावसाळी अधिवेशन उद्यापासून; युती आक्रमक, विरोधक बॅकफूटवर, दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षनेताच नाही

महाराष्ट्र विधिमंडळाचे सोमवारपासून सुरू होणारे पावसाळी अधिवेशन सत्ताधारी महायुतीची आक्रमक खेळी आणि विरोधकांचा बचावात्मक पवित्र्यामुळे वादळी ठरण्याची शक्यता आहे. महायुती सरकार सत्तेवर आल्यापासून दोन्ही सभागृहांना अद्याप हक्काचा ‘विरोधी पक्षनेता’ मिळालेला नाही. त्यातच लोकसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटाच्या ६ खासदारांच्या कथित फुटीच्या चर्चेमुळे विरोधी गोटात कमालीची अस्वस्थता आहे. जनतेचे ज्वलंत प्रश्न सभागृहात ताकदीने मांडण्याऐवजी विरोधक सध्या स्वतःचे…

Read More

21 जून वर्षातील सर्वात मोठा दिवस:दिनमान 13 तास 13 मिनिटे, उत्तर गोलार्धात 'समर सॉलस्टाईस'चा अनुभव घ्या

खगोलप्रेमी आणि जिज्ञासूंसाठी आजचा रविवार (२१ जून) हा दिवस महत्त्वाचा आहे. उत्तर गोलार्धात रविवारी वर्षातील सर्वात मोठा दिवस अनुभवता येणार असून, दिनमान १३ तास १३ मिनिटांचे असेल. मराठी विज्ञान परिषदेच्या स्थानिक शाखेचे पदाधिकारी विजय गिरुळकर आणि प्रा. प्रवीण गुल्हाने यांनी नागरिकांना या खगोलीय घटनेचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याचे आवाहन केले आहे. भारतात, म्हणजेच उत्तर गोलार्धात, २१…

Read More

मोरगडमध्ये पाणीटंचाई:आदिवासी झिऱ्यातून काढताहेत पाणी, माखल्याची विहीर निकामी; नागरिकांची 2 किमी पायपीट

मेळघाटात पावसाळा सुरू होऊनही पाणीटंचाई कायम आहे. चिखलदरा तालुक्यातील मोरगड येथील आदिवासींना गावाशेजारील नदीपात्रात झिरा (छोटा खड्डा) खोदून पाणी मिळवावे लागत आहे. दुसरीकडे, प्रशासनाने तयार केलेली माखल्याची विहीर बंद पडल्याने नागरिकांना दोन किलोमीटरची पायपीट करून पाणी आणावे लागत आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीपासूनच ही समस्या भेडसावत आहे. मोरगड गावात गेल्या आठ दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण…

Read More

एडीसीसी बँकेच्या विशेष सभेला न्यायालयाचा ब्रेक:शेअर मूल्यवाढीच्या निर्णयावर चर्चा करण्यास मनाई, पुढील सुनावणी 1 जुलैला

अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची (एडीसीसी) २१ जून रोजी होणारी विशेष सभा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशामुळे रद्द करण्यात आली आहे. बँकेचे संचालक रवींद्र गायगोले यांनी दाखल केलेल्या याचिकेवर हा निर्णय आला. या सभेत शेअरचे मूल्य वाढवण्यावर चर्चा होणार होती, ज्याला न्यायालयाने मनाई केली आहे. न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती राज वाकोडे यांच्या खंडपीठाने…

Read More

दिलासादायक; कोकणात मान्सूनसाठी पोषक वातावरण:25 जूनला मुंबईत धडकणार; विदर्भ, मराठवाडा अन् पुण्यात कधी?

चालू वर्षी जून महिना अर्धा अधिक संपला तरी पावसाने दडी मारल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी आणि नागरिक चिंतेत आहेत. मात्र, आता मान्सूनबाबत एक अत्यंत दिलासादायक आणि मोठी बातमी समोर आली आहे. येत्या २३ जूनपासून मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर पावसासाठी अत्यंत अनुकूल वातावरण तयार होणार असून, मुंबईत मान्सूनच्या आगमनाचे संकेत मिळाले आहेत, अशी माहिती ज्येष्ठ हवामान अभ्यासक…

Read More

'आप' देणार मंत्री चंद्रकांत पाटलांना पंजाबचे विमानाचे तिकीट:पुणे मनपा शाळा खाजगीकरण वादात 'आप'ची अनोखी मागणी

पुणे महानगरपालिकेच्या शाळांच्या खाजगीकरणाच्या मुद्द्यावरून सध्या वाद पेटला आहे. या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीने (आप) एक अनोखे आंदोलन जाहीर केले आहे. ‘आप’ने महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांना पंजाबचे विमानाचे तिकीट भेट देण्याचे ठरवले आहे. येत्या सोमवारी, २२ जून २०२६ रोजी ‘आप’चे पदाधिकारी चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड येथील कार्यालयात…

Read More

नसरापूर चिमुकली अत्याचार-खून: 25 जूनला निकाल:महाराष्ट्रातील सर्वात वेगवान खटला ठरण्याची शक्यता

नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार आणि निर्घृण खून प्रकरणाचा अंतिम निकाल येत्या २५ जून २०२६ रोजी जाहीर होणार आहे. हा खटला महाराष्ट्राच्या न्यायालयीन इतिहासातील सर्वात जलदगतीने चालविलेला खटला ठरण्याची दाट शक्यता आहे, कारण अवघ्या एका महिन्याच्या आतच या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी पूर्ण होऊन निकाल समोर येत आहे. केवळ एका महिन्यात निकाल; जलदगतीचा नवा विक्रम या संवेदनशील…

Read More

ओबीसी जनगणना झालीच पाहिजे:जनगणनेत ओबीसीसाठी स्वतंत्र कॉलम द्या, विजय वडेट्टीवार यांची मागणी; आंदोलनाचा दिला इशारा

ओबीसी समाजाची अचूक लोकसंख्या देशासमोर यावी यासाठी होणाऱ्या जनगणनेत स्वतंत्र ओबीसी कॉलमचा समावेश करणे अत्यावश्यक आहे. केंद्र सरकारने ओबीसी जनगणनेची घोषणा केली असली तरी प्रत्यक्ष जनगणना प्रक्रियेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमच नसल्याने सरकारच्या भूमिकेबाबत गंभीर शंका निर्माण होत आहेत. ओबीसी समाजाची खरी संख्या दडविण्याचा हा प्रयत्न असून तो हाणून पाडण्यासाठी राज्यभर व्यापक जनआंदोलन उभारण्यात येईल, अशी…

Read More