पावसाच्या दांडीमुळे यंदा पेरण्या खोळंबल्या:नजरा आभाळाकडे, कृषीतज्ज्ञांनी धीर घरण्याचे केले आवाहन
खरीप हंगामाची लगबग सुरू झाली असली तरी जिल्ह्यातील शेतकरी अजुनही मान्सुनच्या मुसळधार पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. जुन महिन्याची २० तारीख उलटली तरी अद्याप पावसाने हजेरी लावली नसल्यामुळे आधीच आर्थिक विवंचनेत असलेला बळीराजा चिंतातूर झाला आहे. जिल्ह्यात पावसाअभावी मोठ्या प्रमाणात पेरण्या खोळंबल्या आहेत. कृषीतज्ज्ञांनी शेतकऱ्यांना आताच पेरणी न करण्याचे आवाहन केले आहे. मृग नक्षत्राच्या आगमनानंतरही अपेक्षित पाऊस…