Headlines

राहुल गांधींच्या पुण्यातील ‘छात्रों की गूंज’ला अखेर पोलिसांची परवानगी:30 कठोर अटी, ड्रोनपासून ‘डी-झोन’ बॅरिकेडिंगपर्यंत नियम

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या 22 ऑगस्ट रोजी पुण्यात होणाऱ्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाला अखेर पुणे पोलिसांनी परवानगी दिली आहे. मात्र, ही परवानगी तब्बल 30 अटी आणि शर्तींसह देण्यात आली आहे. पुण्यातील एस.एस.पी.एम. मैदानावर होणाऱ्या या कार्यक्रमासाठी सुरक्षा, गर्दी नियंत्रण, वाहतूक, अग्निसुरक्षा, ध्वनीप्रदूषण आणि महिला सुरक्षेबाबत पोलिसांनी आयोजकांना स्पष्ट निर्देश दिले आहेत. विशेष म्हणजे,…

Read More

मराठी न येणाऱ्या रिक्षा-टॅक्सी चालकांवर उद्यापासून कारवाई:परिवहन मंत्री म्हणाले- आधी नोटीस देणार, 3 महिन्यांत शिकले नाहीत तर परवाना निलंबित

मराठी भाषा न जाणणारे चालक आता महाराष्ट्रात ऑटो-टॅक्सी चालवू शकणार नाहीत. ही घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली. ते म्हणाले – 20 ऑगस्टपासून मोहीम सुरू होईल. मंत्री सरनाईक म्हणाले – आधी नोटीस देऊन चालकांना 3 महिन्यांत मराठी शिकण्याची संधी दिली जाईल. त्यानंतरही मराठी न शिकल्यास त्यांचा परवाना निलंबित केला जाईल. ही मोहीम संपूर्ण राज्यात…

Read More

संजय राऊत हे कामशास्त्री, त्यांनी न्यायालयासंदर्भात बोलू नये:मनपाच्या खर्चावर बोलण्यापूर्वी पेडणेकरांनी स्वतःच्या काळातील हिशेब द्यावा- नवनाथ बन

संजय राऊत हे कामशास्त्री आहेत, त्यांनी न्यायालय आणि संविधानाबद्दल बोलू नये. एकनाथ शिंदे यांच्या वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद केल्यावर ठाकरे गटाची पळता भुई थोडी होईल, असा हल्लाबोल भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे. रामशास्त्री कोण आहे हे शोधण्यापेक्षा राऊतांनी आपण कामशास्त्री कसे झालो याकडे लक्ष द्यावे, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला. नवनाथ बन पुढे म्हणाले…

Read More

घाटकोपर स्थानकाचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ:लोकलच्या छतावर चढून ओव्हरहेड वायरला स्पर्श, 30 वर्षीय तरुण 45 टक्के भाजला; डोक्यालाही गंभीर दुखापत

घाटकोपर रेल्वे स्थानकावर मंगळवारी सायंकाळी गर्दीच्या वेळी धक्कादायक घटना घडली. एका 30 वर्षीय तरुणाने लोकलच्या छतावर चढून ओव्हरहेड विद्युत तारेला स्पर्श केल्याने त्याला विजेचा तीव्र धक्का बसला. या दुर्घटनेत तो सुमारे 45 टक्के भाजला असून त्याच्या डोक्यालाही गंभीर दुखापत झाली आहे. सध्या त्याच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली…

Read More

नागपूरच्या मारबत उत्सवाला आता जागतिक स्वरूप:मनपाची 2 कोटींची तरतूद; 145 वर्षांच्या परंपरेला महोत्सवाचे स्वरूप

नागपूरचा 145 वर्षांचा मारबत-बडग्याचा उत्सव आता आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याची तयारी नागपूर महानगरपालिकेने (मनपा) सुरू केली आहे. यंदा प्रथमच मनपाने या उत्सवासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पारंपरिक मिरवणुकीला महोत्सवाचे स्वरूप देऊन देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्याचे मनपाचे नियोजन आहे. मारबत उत्सव ही केवळ धार्मिक परंपरा नसून, नागपूरच्या लोकसंस्कृती आणि सामाजिक अभिव्यक्तीचे एक वैशिष्ट्यपूर्ण माध्यम आहे….

Read More

पालकमंत्री गिरीश महाजनांचा नाशिकसाठी मोठा दावा:म्हणाले- 4 महिने नाशिककरांना थोडा त्रास होईल, पण नंतर शहर पाहून आश्चर्य वाटेल!

नाशिकचे नवे पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर गिरीश महाजन पहिल्यांदाच नाशिकमध्ये दाखल झाले. मुंबई नाका परिसरात भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात, फुलांची उधळण आणि भव्य हार घालून महाजन यांचे जोरदार स्वागत केले. पालकमंत्रिपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर महाजन यांनी नाशिकच्या विकासाचा मोठा आराखडा मांडत पुढील काही महिने नागरिकांना काही प्रमाणात गैरसोय सहन करावी लागेल, असे स्पष्ट केले….

Read More

Ashwini Bhide Accuses SRA Mumbai Of Violating Rules

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्याच्या कारभारावर आता थेट मुंबई महापालिकेकडूनच आक्षेप नोंदवण्यात आले आहेत. मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी नगरविकास विभागाला थेट पत्र पाठवून झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या कारभार . नगरविकास खात्यांतर्गत येणाऱ्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून आपल्या अधिकारांचा मोठा गैरवापर केला जात असल्याचा आरोप अश्विनी भिडे यांनी पत्रात केला आहे. झोपडपट्टी नसलेल्या मोकळ्या…

Read More

नाशिक जिल्ह्यात भूकंपाचे सत्र सुरूच:पेठ तालुक्यात पुन्हा सौम्य हादरे, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

नाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बुधवारी सकाळी सुमारे 9 वाजता पेठ तालुक्यातील काही भागात जमीन हादरल्याचे जाणवले. अचानक धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये काही काळ गोंधळ आणि घबराट निर्माण झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. गोंदे ते एकदरेपर्यंत परिसराला हादरे मिळालेल्या माहितीनुसार, गोंदे, करंजाळी, भायगाव,…

Read More

नागपूरच्या हॉटेलमध्ये थरार:तरुणीची निर्घृण हत्या, तर तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न; नेमके काय घडले?

नागपूरमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून, काल रात्री मनीष नगर परिसरात घडलेल्या एका भयंकर घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. मनीष नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका हॉटेलच्या खोलीत २८ वर्षीय तरुणीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. तर, तिच्यासोबत असलेला तरुणही अत्यंत गंभीर आणि जखमी अवस्थेत सापडला आहे. नेमके काय घडले? पोलिसांनी आणि हॉटेल व्यवस्थापनाने…

Read More

लोकशाहीत प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार:पण बोलताना तोल जाऊ नये; छगन भुजबळांचा मनोज जरांगेंना टोला

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील वारंवार आंदोलनाची हाक देत आहेत आणि राज्य सरकारवर अत्यंत आक्रमक शब्दांत टीका करत आहेत. जरांगे यांच्या या भूमिकेवर राज्याचे मंत्री आणि ज्येष्ठ ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी सडेतोड शब्दांत आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. “लोकशाहीत प्रत्येकाला बोलण्याचा आणि आंदोलन करण्याचा अधिकार आहे, पण काय बोलावं याचं भान ठेवायला हवं, बोलताना…

Read More