Headlines

संभाजीनगरसह 5 जिल्ह्यांमधील सिंचनासाठी 6,477 कोटी मंजूर:पंढरपूर तीर्थक्षेत्रासाठी 4150 कोटींच्या आराखड्यास मान्यता, मंत्रिमंडळ निर्णय

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठवाडा तसेच अहिल्यानगरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या जायकवाडी प्रकल्प टप्पा-२ साठी ६ हजार ४७७ कोटी रुपयांची सुधारित तरतूद मंजूर करण्यात आली. यात माजलगाव धरण, कालव्याची कामे होतील. ही कामे दर्जेदार आणि निर्धारित वेळेत झाली तर पुढील तीन ते चार वर्षांत पाच जिल्ह्यातील सुमारे सव्वा लाख हेक्टर…

Read More

जामखेड शहरातील पंचमीचा सण म्हणजे सर्व जाती-धर्मांना जोडणारा उत्सव:जत्रेतील पाळण्यांपासून ‘सकृबा’च्या नृत्यापर्यंत उत्सवाची रंगत‎

मुंबईची दिवाळी, पुण्याचा गणेशोत्सव, अहिल्यानगरचा मोहरम आणि जामखेडची नागपंचमी… महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैविध्यात जामखेडच्या पंचमीचे स्थान वेगळेच आहे. पंचमी म्हटले की जामखेडकरांच्या कानावर घुंगरांचा निनाद पडतो आणि शहरात उत्सवाचे वातावरण निर्माण हो . राक्षसी पाळणे, मौत का कुआँ, गाढवाचा पन्नालाल शो, फिरती चक्री, लहान मुलांचे पाळणे, खेळण्यांची दुकाने आणि महिलांसाठी विविध वस्तूंची दुकाने यामुळे शहर गजबजून…

Read More

विकासकामे नागरिकांसाठी; दर्जाशी तडजोड कदापि नाही:रस्ता कामाची नगरसेविका बंग यांनी केली पाहणी‎

शहरातील नगरपरिषद हद्दीतील प्रभागातील विकासकामांना गती देतानाच कामांचा दर्जा कायम राखण्यासाठी नगरसेविका दिपाली रामनाथ बंग यांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी उपस्थित राहून पाहणी केली. त्यांच्या मागणीनुसार महाराष्ट्र सुवर्ण जयंती मलनिस्सारण योजनेतर्गत सुरू असलेल्या खालचा गणपती ते मौलाना आझाद चौक रस्त्याच्या पहिल्या लेयरच्या कामाची त्यांनी पाहणी करून संबंधित अधिकारी व ठेकेदाराच्या प्रतिनिधींना आवश्यक सूचना दिल्या. यावेळी नगरपरिषदेचे…

Read More

Mumbai Mayor Social Media Publicity Budget Controversy; Ritu Tawade

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या सोशल मीडिया व्यवस्थापन आणि प्रसिद्धीसाठी मुंबई महानगरपालिकेकडून सुमारे 25 लाख रुपयांचा खर्च करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. 19 ऑगस्ट रोजी हा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात येणार आहे. 1 ऑगस्ट 2026 ते 31 जुल . सोशल मीडिया व्यवस्थापनासाठी स्वतंत्र एजन्सी प्रस्तावानुसार, महापौरांच्या दैनंदिन कार्यक्रमांसह बैठका, पाहणी दौरे आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती…

Read More

तालुका निर्मितीसाठी उपनगराध्यक्षांसह वैरागच्या 15 नगरसेवकांचा सेनेत प्रवेश:अप्परसह विविध मागण्या घेऊन निरंजन भूमकर शिंदेसेनेत; मुंबईत पक्षप्रवेश

बार्शी तालुक्यातील वैराग तालुका निर्मिती, अप्पर तहसील, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण, नगरपंचायत नवीन कार्यालयाची मागणी आणि वैराग भागाच्या विकासाला गती देण्याच्या निर्धाराने वैराग नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष निरंजन भूमकर यांनी मंगळवारी . निरंजन भूमकर यांनी आजोबा धन्यकुमार भूमकर यांचा काँग्रेस विचारधारेचा वारसा पुढे नेत राजकारणात सक्रिय प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीची वैराग भागातील धुरा सांभाळत सरपंच,…

Read More

पावसाची दडी; तिवस्यात शेतकऱ्यांची चिंता वाढली:कापूस, सोयाबीन, तूर पिकांवर कीडीचा प्रादुर्भाव वाढला‎

मान्सूनच्या पावसात पिके उभी तर झाली मात्र गेल्या १५ दिवसाच्या खंडामुळे पिकांवर विविध संकटे येऊ लागली आहे. कापूस, सोयाबीन, तूर, मूगावर किडींचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढू लागली आहे. सुरुवातीस एल निनोच्या संकटामुळे खरीप हंगामातील पेरणी ही जूनअखेर ते जुलै महिन्यात सुरू झाली. दरम्यान पेरणी केल्यानंतर पावासाचा प्रदीर्घ खंड झाल्यामुळे उगवण क्षमता कमी झाली, त्यामुळे…

Read More

प्लास्टिकविरोधी कारवाईत 87 किलो प्लास्टिक जप्त:महानगरपालिकेची सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई, 10 हजारांचा दंड वसूल‎

महानगरपालिकेच्या वतीने प्रतिबंधित प्लास्टिकविरोधात विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली. मंगळवारी १८ रोजी इतवारा बाजार रोड पेट्रोल पंप रोड परिसरात करण्यात आलेल्या कारवाईत ८७ किलो प्रतिबंधित प्लास्टिक साहित्य जप्त करण्यात आले असून, संबंधित आस्थापनांकडून एकूण १० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. महानगरपालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक आणि उपायुक्त (१) भाग्यश्री बोरेकर…

Read More

शिवतांडव विनाशाचे नव्हे, तर नवनिर्मितीचे प्रतीक- डॉ. देव:श्रीनाथ दत्त मंदिरात ‘शिवमहिम्न स्तोत्र'' विषयावर मार्गदर्शन‎

कोणतेही ध्येय साध्य करण्यासाठी जीवनात साधनेची नितांत गरज असते. निरंतर साधनेने कोणत्याही विषयावर प्रभुत्व मिळवता येते आणि भक्तीच्या साधनेने ईश्वराचा कृपाप्रसाद कायमस्वरूपी प्राप्त होतो. भगवान शंकरासारखी कामदेवाला भस्म करण्याची शक्तीही साधनेतूनच मिळते, असे प्रतिपादन प्रसिद्ध प्रवचनकार डॉ. वसुधा देव यांनी केले. रामदास पेठेतील श्रीनाथ दत्त मंदिर संस्थानच्या वतीने श्रावण मासानिमित्त आयोजित ‘शिवमहिम्न स्तोत्र’ प्रवचनमालेच्या तिसऱ्या…

Read More

‘मॉडेल यूएन’मध्ये संजीवनीच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय भरारी..!:ग्वाल्हेरच्या राष्ट्रीय परिषदेत 18 विद्यार्थ्यांचा सहभाग‎

ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) येथील ॲमिटी युनिव्हर्सिटीमध्ये आयोजित ‘मॉडेल युनायटेड नेशन्स (एमयूएन) राष्ट्रीय परिषद २०२६’मध्ये संजीवनी अकॅडमीच्या १८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत उल्लेखनीय कामगिरी केली. प्रभावी वक्तृत्व, आंतरराष्ट्रीय प्रश्नांचे आकलन, चिकित्सक विचार आणि राजनैतिक कौशल्याच्या जोरावर विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर संजीवनी अकॅडमीचे नाव उज्ज्वल केले. दोन दिवसीय या राष्ट्रीय परिषदेत देशभरातील नामांकित शाळा व महाविद्यालयांमधील सुमारे ४०० विद्यार्थ्यांनी…

Read More

लासूर स्टेशनच्या युवकाने बनवली ‘मिनी थार’:लियाकत सय्यद यांनी ऑनलाइन पार्ट‌्स बोलावून केली घरीच जुळवणी‎

लासूर स्टेशन येथील लियाकत सय्यद या इलेक्ट्रॉनिक कारागिराने आपल्या कौशल्यातून अनेक भन्नाट प्रयोग साकारले आहेत. केवळ नववीपर्यंत शिक्षण घेतलेल्या सय्यद यांनी गेल्या २५ वर्षांत इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात विविध उपकरणांवर काम करत आता हुबेहूब थारसारखी दिसणारी तीन दरवाजांची मिनी चारचाकी तयार केली आहे. त्यांच्या या अनोख्या प्रयोगाचे जिल्ह्यात कौतुक होत आहे. वैजापूर तालुक्यातील करंजगाव येथील सय्यद यांनी…

Read More