Headlines

गंगापूर बाजार समितीमध्ये कांद्याला प्रति क्विंटल 4500 रुपयांचा भाव:दररोज 500 वाहनांची गर्दी; शेजारी नेवासा, येवला तालुक्यातून येतोय कांदा‎

मागील काही दिवसांपासून गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये कांद्याला कमाल ४५०० ते सरासरी ३४५१ रुपयांचा भाव मिळत असल्यामुळे तालुक्यासह परिसरातील शेतकरी दररोज ४०० ते ५०० वाहनांच्या माध्यमातून कांदा विक्रीसाठी आणत आहे. यासंदर्भात माहिती देताना सभापती अर्चना कृष्णा सुकासे यांनी सांगितले की, गंगापूर मार्केटमध्ये शेतकऱ्यांना मिळत असलेल्या समाधानकारक भावामुळे शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात कांदा…

Read More

गंभीर गुन्ह्यांच्या संख्येनुसार आता मिळणार नवीन पोलिस ठाणे:मात्र पोलिस ठाण्याच्या मंजुरीसाठी कोणतीही डेडलाइन निश्चित नाही

राज्याच्या पोलिस दलात तब्बल ६६ वर्षांनंतर महाबदल झाला आहे. राज्य शासनाने मंगळवारी (१८ ऑगस्ट) नवीन पोलिस ठाणे मंजुरीचे जुना निकष कायमचा रद्द केला आहे. यापुढे केवळ लोकसंख्येच्या आधारावर किंवा राजकीय वजनावर नवीन ठाणे मंजूर होणार नाही. तर त्या भागातील दंगल, खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण, मानवी तस्करी, बलात्कार, दरोडा, जबरी चोरी, मोठी घरफोडी आणि मोठ्या प्रमाणात…

Read More

गेल्या पाच वर्षांत पुण्याच्या रस्त्यांवरसरासरी दर 28 तासांत एकाचा बळी:2021 पासून 6,500 अपघातांत झाला तब्बल 1,776 जणांचा मृत्यू

मेट्रो, उड्डाणपूल आणि रुंद रस्त्यांमुळे पुण्याचा चेहरा बदलत असला तरी सुरक्षित प्रवासाचे चित्र मात्र धूसर आहे. जानेवारी २०२१ ते १८ ऑगस्ट २०२६ पर्यंत वाहतूक उपलब्ध आकडेवारीनुसार शहरात ६ हजार ५०० अपघात झाले असून १ हजार ७७६ जणांचा मृत्यू झाला आहे. म्हणजे पुण्याच्या रस्त्यांवर सरासरी प्रत्येक २८ तासांत एका व्यक्तीचा बळी जात आहे. २०२१ मध्ये शहरात…

Read More

जोरदार शिव्यांच्या भडिमारात बोरीचा बार:बोरी व सुखेड गावांमधील महिलांनी जपली शेकडो वर्षांची परंपरा

शिव्याशाप देण्याची अनोखी परंपरा असलेला राज्यातील एकमेव बोरीचा बार यंदाही परंपरागत पद्धतीने मंगळवारी दुपारी १२.१५ ते १ या वेळेत खंडाळा तालुक्यातील सुखेड व बोरी दरम्यान वाहणार्‍या ओढ्याच्या तीरांवर उत्साहात झाला. दोन्ही गावांमधील महिलांनी सनई, हलगीच्या तालावर ओढ्यावर येऊन, एकमेकींवर शिव्यांचा भडिमार करत, ही अनोखी परंपरा कायम ठेवली. नागपंचमीच्या दुसर्‍या दिवशी होणारा सुखेड व बोरी या…

Read More

सिंदखेडमधील जिजाऊ स्मारकाला ५० कोटींचा निधी:कामाला गती देण्याचे एकनाथ शिंदेंचे निर्देश, पर्यटन विकास महामंडळाद्वारे काम सुरू करणार

बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील राजमाता जिजाऊ यांच्या स्मारकासाठी नगरविकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून ५० कोटी देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. जिजाऊंच्या स्मारकाच्या कामाला गती देण्याचे निर्देशही त्यांनी दिले. सिंदखेड राजामधील या स्मारक आणि जिजाऊसृष्टीच्या कामासाठी २०२४ साली ५० कोटी जाहीर करण्यात आले होते. या निधीमधून सिंदखेडराजा जवळील जिजाऊसृष्टीचे काम सुरू करण्यात आले होते. आजवर…

Read More

पुण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीत दोन शहराध्यक्ष:विशाल तांबे पश्चिमचे, श्रीकांत पाटील पूर्व विभागाचे प्रमुख

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पुणे शहरातील संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी शहराध्यक्षपदाची विभागणी केली आहे. पुणे पश्चिम विभागाच्या शहराध्यक्षपदी विशाल तांबे यांची, तर पुणे पूर्व विभागाच्या शहराध्यक्षपदी श्रीकांत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी १७ ऑगस्ट २०२६ रोजी यासंदर्भातील स्वतंत्र नियुक्तीपत्रे जारी केली. पक्षासाठी आजवर दिलेल्या योगदानाची आणि…

Read More

दूध-बर्फ पुरवठादारांची तब्बल 3.68 कोटींची फसवणूक:सात संचालकांविरोधात साताऱ्यात गुन्हा दाखल

दूध आणि बर्फाचा पुरवठा करणाऱ्या 16 व्यावसायिकांची तब्बल 3 कोटी 68 लाख 52 हजार 859 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सात जणांविरोधात बोरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोरगाव येथील ममता मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट प्रायव्हेट लिमिटेड या डेअरीशी संबंधित संचालकांनी पुरवठादारांची बिले न देता त्यांचा विश्वासघात केल्याचा आरोप आहे. तसेच पैसे मागितल्यानंतर धमकी दिल्याचाही…

Read More

देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीत जाणार?:'त्यांना तिकडे का पाठवताय…'; मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीवारीच्या चर्चांवर अमृता फडणवीसांचे मिश्किल उत्तर

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळणार असून ते दिल्लीत जाणार असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही याबाबत उघडपणे भाष्य केले असून, नुकतेच भाजपाच्या केंद्रीय कार्यकारिणीत झालेले संघटनात्मक बदल आणि त्यानंतर फडणवीसांचा पार पडलेला दिल्ली दौरा यामुळे या चर्चांना अधिकच उधाण आले आहे. देवेंद्र फडणवीस…

Read More

'एआय युगाचा वेध' पुस्तकाचे प्रकाशन:डॉ. दीपक शिकारपूर यांचे पुस्तक संतुलित, परिपूर्ण – डॉ. अरविंद नातू

डॉ. दीपक शिकारपूर लिखित ‘एआय युगाचा वेध’ या पुस्तकाचे आणि ऑडिओ बुकचे मंगळवारी (दि. १८) प्रकाशन झाले. आयसरचे अध्यक्ष डॉ. अरविंद नातू यांनी या पुस्तकाचे कौतुक करत ते कृत्रिम बुद्धिमत्तेविषयी समग्र वेध घेणारे, संतुलित आणि परिपूर्ण असल्याचे म्हटले. अमलताश बुक्सतर्फे प्रकाशित झालेल्या या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन बी. एम. सी. सी. आवारातील डॉ. सायरस पूनावाला…

Read More

पुणे शहरात सार्वजनिक वाहतूक वापर फक्त 11 टक्के:केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ: कोंडी सोडवण्यासाठी तर्कशुद्ध आराखडा हवा

पुणे शहराची वाढती लोकसंख्या आणि वाहतूक कोंडीच्या समस्येवर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी चिंता व्यक्त केली आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर केवळ ११ टक्के असल्याने, तर्कशुद्ध वाहतूक सुधारणा आराखड्याची अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी मांडले. यामुळेच पुणेकरांना वाहतूक कोंडीतून सुटका मिळू शकेल, असे ते म्हणाले. पुणे शहराची लोकसंख्या ६० ते ६५ लाखांपर्यंत पोहोचली असून,…

Read More