Headlines

मुंबई पळवण्याचा डाव कसा फसला?:'महाराष्ट्र' नावालाही विरोध का झाला; संयुक्त महाराष्ट्र कसा मिळाला, वाचा 108 हुतात्म्यांचा अभूतपूर्व लढा!

आज 1 मे. महाराष्ट्र दिन. याच दिवशी 1960 मध्ये मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आला. मात्र, त्यासाठी 108 हुतात्म्यांचे बलिदान गेले. तेव्हाच्या सरकारने साम, दाम, दंड, भेद या साऱ्याचा वापर करून संयुक्त महाराष्ट्राला विरोध केला. महाराष्ट्रापासून मुंबईचा लचका तोडण्याचा प्रयत्न झाला. या विरोधात लढा उभारला. तेव्हा आपल्याच सरकारने आपल्याच माणसांवर अक्षरशः गोळ्या झाडल्या. विशेष म्हणजे देशाला…

Read More

हिंगोली जिल्हा परिषदेत अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर:सोईओ विवेक गायकवाड यांचा पुढाकार, 248 जणांची तपासणी

शासकीय कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या पार पाडताना अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आरोग्याकडे अनेकदा दुर्लक्ष होते. हीच बाब लक्षात घेऊन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या संकल्पनेतून शुक्रवारी ता २९ येथील नक्षत्र सभागृहात जिल्हा परिषदेच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. ​जिल्हा परिषदेमध्ये आयोजित शिबिराच्या अध्यक्षस्थानी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड होते….

Read More

पोदार स्कूलच्या शरण्या मोरेला रौप्य पदक:डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत पटकावले यश

अमरावती, बडनेरा रोड येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या सातवीतील विद्यार्थिनी शरण्या एस. मोरे हिने प्रतिष्ठित डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत रौप्य पदक पटकावले आहे. तिच्या या यशाने शाळेचे आणि पालकांचे नाव उज्वल झाले आहे. मुंबई सायन्स टीचर्स असोसिएशनतर्फे (MSTA) आयोजित या स्पर्धेत विद्यार्थ्यांना तीन टप्प्यांतून जावे लागते. यात सैद्धांतिक लेखी परीक्षा, प्रायोगिक कौशल्य चाचणी आणि प्रकल्प…

Read More

गायीला राष्ट्रमातेचा दर्जा द्या, गोहत्येवर बंदी करा:महाकाली माता शक्तिपीठ प्रतिष्ठानची केंद्राकडे मागणी

अमरावती येथील श्री महाकाली माता शक्तिपीठ प्रतिष्ठानने गायीला राष्ट्रमातेचा दर्जा देण्याची आणि गोहत्येवर पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. राष्ट्र आणि भारतीय संस्कृतीच्या हितासाठी गायीला राष्ट्रीय सन्मान मिळावा, यासाठी केंद्र व राज्य सरकारांनी पुढाकार घ्यावा, असे प्रतिष्ठानचे पीठाधीश्वर शक्तीजी महाराज यांनी म्हटले आहे. या मागणीसाठी प्रतिष्ठानने ‘गौमाता सन्मान यात्रा’ काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर…

Read More

उमेदवारी नाकारताना पक्षाने साधे विचारलेही नाही:अजितदादांच्या अपघातासंदर्भात प्रश्न विचारल्याचे हे फळ, अमोल मिटकरींनी व्यक्त केली खंत

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आगामी विधानपरिषद निवडणुकीसाठी माजी आमदार झिशान सिद्दीकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करत त्यांना अधिकृत उमेदवारी दिली असून, त्यांनी आपला उमेदवारी अर्जही दाखल केला आहे. बाबा सिद्दीकी यांचे दुःखद निधन आणि विधानसभा निवडणुकीतील पराभवाच्या पार्श्वभूमीवर, वांद्रे पूर्व परिसरात पक्षाची ताकद पुन्हा वाढवण्यासाठी झिशान यांच्यावर हा मोठा विश्वास टाकण्यात आला आहे. या जागेसाठी…

Read More

इच्छामरणाचा सल्ला नाकारला:पुण्यातील डॉक्टरांनी 85 टक्के किडनी निकामी 'शेल्बी'ला दिले जीवदान

८५ टक्के किडनी निकामी झाल्याने इच्छामरणाचा सल्ला दिलेल्या ‘शेल्बी’ नावाच्या ५ वर्षांच्या जर्मन शेफर्डला पुण्यातील डॉक्टरांनी डायलिसिसच्या मदतीने नवे आयुष्य दिले आहे. वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीमुळे अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतात, याचा प्रत्यय या घटनेतून आला आहे. बेळगावी येथील डोड्डनवर कुटुंबाचा सदस्य असलेला शेल्बी काही दिवसांपासून अशक्त आणि शांत दिसत होता. त्याला उलट्या होणे, खाणे-पिणे बंद…

Read More

महाराष्ट्र पोलिस दलात बदल्यांचा धडाका:अनेक जिल्ह्यांना मिळाले नवीन पोलिस अधीक्षक, 1 मेच्या पूर्वसंध्येला गृह विभागाचा निर्णय

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या पूर्वसंध्येला राज्याच्या गृह विभागाने पोलिस दलात मोठे फेरबदल केले असून, अनेक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. या शासन निर्णयानुसार जालना, अमरावती ग्रामीण, नाशिक ग्रामीण, अहिल्यानगर, परभणी, नंदूरबार, चंद्रपूर, ठाणे ग्रामीण आणि वाशिम या जिल्ह्यांच्या पोलिस अधीक्षकांची बदली करण्यात आली आहे. तसेच ‘फोर्स वन’चे पोलिस अधीक्षक गजानन…

Read More

महाराष्ट्राचा माणूस कोणालाही वाईट नजरेने पाहत नाही:वसंत व्याख्यानमालेच्या व्यासपीठावरून राज ठाकरेंनी मांडले परखड विचार

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात बोलताना म्हटले की, महाराष्ट्रातील सुरक्षित वातावरणामुळे अनेकजण येथे स्थायिक झाले आहेत. देशाच्या राजधानी दिल्लीत महिलांना बसमध्ये प्रवास करतानाही भीती वाटते, तर मुंबई आणि पुण्यात सुरक्षिततेमुळे अनेक लोक स्थायिक झाले आहेत. ठाकरे यांनी नमूद केले की, महाराष्ट्रातील माणूस कोणालाही वाईट नजरेने पाहत नाही किंवा छेडछाड करत नाही. मोकळेपणा…

Read More

पुणे महापालिकेत 34 लाखांच्या कामाला 1.51 कोटींची मंजुरी:निविदा प्रक्रियेत मोठा घोटाळा झाल्याचा युवक काँग्रेसचा आरोप, चौकशीची मागणी

पुणे महानगरपालिकेच्या बालभारती ते पौड फाटा ३० मीटर डी.पी. रस्ता विकास कामाच्या पर्यावरणीय परवानगी प्रक्रियेतील निविदेत मोठ्या आर्थिक अनियमिततेचा आरोप करण्यात आला आहे. या कामासाठी ‘आदित्य एन्व्हायर्नमेंटल सर्व्हिसेस प्रा. लि.’ या कंपनीने ३४.६५ लाख रुपयांची सर्वात कमी निविदा सादर केली होती. मात्र, स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात आलेल्या प्रस्तावात हीच रक्कम १.५१ कोटी रुपये (१.२८ कोटी…

Read More

मला सुद्धा शिवसेनेकडून उमेदवारीची ऑफर होती:रवी राणा यांचा गौप्यस्फोट; बच्चू कडूंच्या उमेदवारीवर भाष्य करत दिल्या शुभेच्छा

महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या एकूण 10 जागांसाठी आज राजकीय पक्षांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले असून, ही निवडणूक आता बिनविरोध होण्याचे निश्चित झाले आहे. या संपूर्ण प्रक्रियेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने ऐनवेळी माजी आमदार बच्चू कडू यांना उमेदवारी जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, बच्चू कडू यांचे कट्टर प्रतिस्पर्धी मानले जाणारे आमदार…

Read More