Headlines

कोपरगाव आगारासाठी नवीन बस देण्याची मागणी:आमदार आशुतोष काळे यांचे परिवहन मंत्र्यांना निवेदन‎

प्रतिनिधी | कोपरगाव कोपरगाव बस आगारात बसेसची संख्या कमी असल्यामुळे व काही बस अतिशय जुन्या झाल्यामुळे त्याचा परिणाम प्रवासी वाहतुकीवर होत आहे. त्यामुळे कोपरगाव आगाराला नवीन बस मिळाव्यात अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. आ. काळे यांनी मंत्री सरनाईक यांची भेट घेवून कमी असलेल्या बसच्या…

Read More

विहिरीत साबडे कोसळले, मजूर ठार; दुसरा गंभीर जखमी:वैजापूर तालुक्यातील खंडाळा शिवारातील घटना‎

प्रतिनिधी | खंडाळा खंडाळा शिवारात विहिरीतील मलबा काढणारी साबडे अंगावर पडून एक मजूर ठार झाला, तर दुसरा मजूर गंभीर जखमी झाला. ही घटना २७ एप्रिल रोजी सकाळी ११च्या सुमारास घडली. वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथे रायगड हॉटेलच्या पाठीमागे गट नंबर १० मध्ये शरद भोपळे यांच्या शेतात विहिरीचे काम सुरू होते. राजपूत ठेकेदारामार्फत काम चालू होते. विहीर…

Read More

धर्म व संस्कृतीचे पालन करणे गरजेचे;‎ संघटन, धार्मिक जागृतीची आवश्यकता‎:संमेलन डॉ. साध्वी धर्मासिहनी गायत्री यांचे नाचनवेल येथे हिंदू संमेलनात प्रतिपादन‎

प्रतिनिधी | नाचनवेल धर्माचे व भारतीय संस्कृतीचे पालन करणे गरजेचे आहे, हिंदू संस्कृती टिकवणे संघटन आणि धार्मिक जागृती गरजेची आहे, असे प्रतिपादन डॉ. साध्वी धर्मासिहनी गायत्री यांनी केले. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हिंदू संमेलने आणि विराट हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने कन्नड तालुक्यातील नाचनवेल येथे मंगळवार, २८ एप्रिल रोजी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समोर…

Read More

गोशाळेच्या आगीत चारा व गुरांचे साहित्य जळून खाक:गुरे बाहेर चरत असल्याने जीवितहानी टळली

प्रतिनिधी | सोयगाव आमखेडा येथील क्रांती जनहित बहुउद्देशीय विकास संस्था संचालित अंजनाई गोशाळेत मंगळवारी (दी.२८) दुपारी अचानक लागलेल्या आगीत सुमारे ३० क्विंटल चारा व गुरांचे साहित्य जळून खाक झाले. या घटनेत सुमारे सव्वा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सुदैवाने आग लागली तेव्हा गुरे बाहेर चरत असल्याने जीवितहानी टळली. दुपारी तीनच्या सुमारास…

Read More

संतांच्या विचारांनी जीवनातील दुःख दूर होऊन स्थैर्य मिळते- राधेश्याम महाराज:आन्वा येथे वैशाख शुद्ध मोहिनी एकादशीनिमित्त वैष्णवांचा मेळा‎

प्रतिनिधी | आनवा कलियुगात मनुष्याला शांती आणि समाधान मिळवायचे असेल, तर संतांचा आश्रय घेणे अत्यावश्यक आहे. संतांच्या विचारांनी जीवनातील दुःख, ताणतणाव आणि अहंकार दूर होऊन मनाला स्थैर्य लाभते, असे राधेश्याम महाराज चातुर्मास्ये यांनी सांगितले. भोकरदन तालुक्यातील ‘प्रती पंढरपूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र आन्वा येथे वैशाख शुद्ध मोहिनी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त भक्तिमय वातावरणात कीर्तनसेवा संपन्न झाली….

Read More

विद्यार्थी पटसंख्या वाढवण्यासाठी घाटनांद्रा परिसरात जि.प. शाळेच्या गुरुजींची धडपड:विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत वाढीचा ध्यास; जिल्हापरिषदेचा शिक्षक आपल्या दारी उपक्रम‎

प्रतिनिधी | घाटनांद्रा सध्याच्या काळात ग्रामीण भागात विद्यार्थ्यांची शाळेतील घटती पटसंख्या ही शिक्षण क्षेत्रासमोरील एक गंभीर समस्या बनली आहे. यावर मात करण्यासाठी घाटनांद्रा येथील जिल्हा परिषदेच्या शाळांतील शिक्षकांनी एक अनोखा पुढाकार हाती घेत ‘शिक्षक आपल्या दारी’ उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत शिक्षक उन्हाची तिव्रता असतानाही गावोगावी, वाड्या-वस्त्यांवर जाऊन पालकांशी थेट संवाद साधत विद्यार्थ्यांना शाळेत…

Read More

नातीच्या लग्नाच्या दिवशीच आजोबांचा‎मृत्यू, दुःख बाजूला ठेवून वधूची पाठवणी‎:सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथील हृदयद्रावक घटना‎

प्रतिनिधी | घाटनांद्रा आनंद आणि उत्साहाने भरलेल्या लग्नसोहळ्याला अचानक दु:खाची किनार लागल्याची हृदयद्रावक घटना घाटनांद्रा येथे मंगळवारी घडली. येथील माधवराव रामदास तायडे यांची कन्या गायत्री हिचा विवाह मंगळवारी (२८ एप्रिल) ठरलेल्या मुहूर्तावर सायंकाळी पार पडला. मात्र याच दिवशी तिचे आजोबा रामदास तायडे (७७ ) यांचे निधन झाल्याने संपूर्ण तायडे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. रामदास श्रीपत…

Read More

वाळूजमधील कारखान्याला आग; 50 कामगार बचावले:अडीच तासांनंतर आगीवर नियंत्रण

वाळूज एमआयडीसीतील रांजणगाव (शेणपुंजी) येथील श्री वरद इंडस्ट्रीज या कारखान्याला २९ एप्रिलच्या रात्री भीषण आग लागली. सुदैवाने आगीच्या वेळी ड्यूटीवर असलेल्या ५० कामगारांनी प्रसंगावधान राखून सुरक्षित स्थळी धाव घेतल्याने जीवितहानी टळली. मात्र, या दुर्घटनेत कारखान्याचे मोठे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाने व्यक्त केला आहे. गट क्रमांक १२६ मधील प्लॉट क्रमांक ८ वर असलेली ही…

Read More

10 वर्षांच्या नियमामुळे जिल्हा बँकेच्या रिंगणातून दिग्गज बाहेर‎:खासदार भुमरे, माजी मंत्री सत्तार, नितीन पाटील यांना संधी नाही, मुले-पत्नी मैदानात‎

छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी ‎बँकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. केंद्र‎सरकारच्या नवीन बँकिंग सुधारणा अधिनियम‎२०२५ मुळे जिल्ह्यातील प्रस्थापित राजकारण्यांना‎मोठा धक्का बसला आहे. सलग १० वर्षे संचालक‎पदावर राहिलेल्या नेत्यांना आता निवडणूक‎लढवता येणार नसल्याने या दिग्गजांनी आपल्या‎कुटुंबातील वारसदारांना रिंगणात उतरवण्याची‎तयारी पूर्ण केली आहे.‎ ‎ बँकिंग क्षेत्रात पारदर्शकता आणण्यासाठी केंद्राने‎सलग २ कार्यकाळ (१० वर्षे) संचालक‎राहिलेल्यांना निवडणूक लढवण्यास बंदी…

Read More

इंदोरा बायोमास बँकेला आग, 4 कोटींचे नुकसान:3 हजार टन तणस जळून खाक, इथेनॉल निर्मितीसाठी साठा

नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील इंदोरा येथील बायोमास बँकेला २७ एप्रिल रोजी दुपारी भीषण आग लागली. रामटेक-खात मुख्य मार्गावरील या घटनेत इथेनॉल निर्मितीसाठी साठवून ठेवलेले सुमारे ३ हजार टन तणस जळून खाक झाले. यामुळे कंपनीचे अंदाजे ३ ते ४ कोटी रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही बायोमास बँक शेतकऱ्यांकडून…

Read More