Headlines

गाणगापूर-अक्कलकोट मार्गावर भीषण अपघात:अक्कलकोटकडे येणाऱ्या बसला टिप्परची जोरदार धडक; 3 ठार, अनेक जखमी

गाणगापूर ते अक्कलकोट मार्गावर भीषण अपघात घडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गाणगापूरहून अक्कलकोटकडे येणाऱ्या बसला समोरून येणाऱ्या टिप्परने जोरदार धडक दिली. हा अपघात रुद्देवाडी बस स्टॉपजवळ झाला असून, धडकेचा जोर इतका प्रचंड होता की बसमधील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. या अपघातात आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. या दुर्घटनेत सुमारे 25 ते…

Read More

क्यूआर कोडद्वारे आता पाेलिसात करा तक्रार‎:‘मुलींची सुरक्षा'' प्रणाली मूर्तिजापूर येथून प्रारंभ; ओळख राहणार गोपनीय‎

प्रतिनिधी | मूर्तिजापूर महिला, युवती व मुली यांना अन्याय, अत्याचार, त्रास देणे, पाठलाग करणे अशा अनेक अप्रिय घटनांना तोंड द्यावे लागते. परंतु त्या भीतीपोटी किंवा पालक शिक्षण अपूर्ण राहू देतात अथवा नसती कटकट नको म्हणून याबाबत तक्रार देण्याचे टाळतात. त्यामुळे अनेक असामाजिक समाजकंटक आणि नराधम यांची हिंमत वाढते व नको त्या घटना घडत असतात. या…

Read More

राहुरी विधानसभा पोटनिवडणूक निकाल:जनतेने कर्डिले साहेबांप्रतीची भावना मतातून व्यक्त केली, अक्षय कर्डिले यांची प्रतिक्रिया

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीत भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी १२ व्या फेरीअखेर ५०,२७३ मतांची दणदणीत आघाडी घेऊन विजयाकडे भक्कम पाऊल टाकले आहे. या यशाचे कल स्पष्ट होताच कर्डिले यांनी आपली पहिली भावनिक प्रतिक्रिया दिली असून, हा विजय म्हणजे सर्वसामान्य जनतेने त्यांच्या वडिलांप्रती, म्हणजेच ‘कर्डिले साहेबां’प्रती व्यक्त केलेली कृतज्ञता असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आमदार शिवाजीराव कर्डिले…

Read More

चोरट्यांनी पोलिस बनून पाच लाखांचे दागिने लुटले:पुण्यात दोन घटना, ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करत गुन्हे दाखल

पुण्यात पोलिस असल्याची बतावणी करून चोरट्यांनी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये ज्येष्ठ नागरिकांकडून सुमारे पाच लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लुटले. कोथरूड आणि पाषाण परिसरात रविवारी हे प्रकार घडले असून, याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिला प्रकार कोथरूडमधील पौड रस्त्यावर घडला. जनवाडी परिसरात राहणारे एक ज्येष्ठ नागरिक रविवारी सकाळी नऊ वाजता पत्नीसह दुचाकीवरून भूगावला जात…

Read More

ग्राहकांच्या समाधानासाठी काम करा- मुख्य अभियंता अशोक साळुंके:महावितरणच्या ५० तांत्रिक कर्मचाऱ्यांना ‘गुणवंत कामगार’ पुरस्काराने केले सन्मानित‎

प्रतिनिधी । अमरावती महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनांनिमित्त महावितरणच्या अमरावती परिमंडळातील ८ यंत्रचालक आणि ४२ तंत्रज्ञ अश्या ५० कर्मचाऱ्यांना ” गुणवंत कामगार ” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विद्युत भवन येथे झेंडा वंदन झाल्यानंतर मुख्य अभियंता अशोक साळुंके यांच्याहस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. पुरस्कार समारंभादरम्यान बोलताना मुख्य अभियंता अशोक साळुंके यांनी कर्मचाऱ्यांना आवाहन केले कि,…

Read More

"शिवाजी काेण हाेता'' पुस्तकावर‎बंदीसाठीही करणार आंदोलन‎:हिंदुराष्ट्र जागृती सभा; छत्रपतींच्या भूमीत हिंदूंचा अपमान सहन करणार नाही : घनवट‎

प्रतिनिधी | अकोला हिंदूंच्या भूमीत हिंदूंच्याच सभांना विरोध होणे हे दुर्दैवी आहे. ही भूमी हिंदूंची आहे; हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा आहे, त्यामुळे येथे सभा होणारच. जर हिंदूंच्या भूमीत सभा घ्यायची नाही, तर काय पाकिस्तानात जाऊन घ्यायची, असा रोखठोक सवाल हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट यांनी सभेत केला. महापालिकेच्या स्थायी समिती…

Read More

संशोधन, आधुनिक तंत्रज्ञानावर भर देणे आवश्यक:व्यवस्थापकीय संचालक दिलीप स्वामी यांचे शेतकऱ्यांना आवाहन‎

प्रतिनिधी | अकोला महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज) या संस्थेचा ५० वा सुवर्णमहोत्सवी वर्धापन दिन महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील डॉ. के. आर. ठाकरे सभागृहात उत्साहात साजरा करण्यात आला. महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप स्वामी यांनी संस्थेच्या सुवर्णप्रवासाचा आढावा सादर केला. वाढती स्पर्धा, बाजारातील आव्हाने लक्षात घेता संशोधन, संकरित वाण, जैविक उत्पादने…

Read More

निवडणूक आयोग हा भाजपचाच मित्रपक्ष:पश्चिम बंगालमध्ये जिंकण्यासाठी भाजपने विविध हातकंडे वापरले, संजय राऊतांचा आरोप

पश्चिम बंगालमधील मतमोजणीचे सुरुवातीचे कल समोर येत असून, या कलांनुसार भाजप बहुमताच्या दिशेने जाताना दिसत आहे. तर तृणमूल काँग्रेस पिछाडीवर पडताना दिसत आहे. या निवडणुकीच्या निकालावरून खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर बोचरी टीका केली आहे. “ममता बॅनर्जी यांना शह देण्यासाठी निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पक्ष, मोदी आणि शहा यांनी एसआयआरच्या नावाखाली…

Read More

विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूंपासून बनवली सुंदर घरटी‎:भीषण उन्हाळ्यात मुक्या पक्ष्यांना मायेचा आधार, सिताराम सारडा शाळेतील विद्यार्थ्यांचा उपक्रम‎

प्रतिनिधी|अहिल्यानगर हिंद सेवा मंडळाच्या सीताराम सारडा विद्यालयात एक अनोखा निसर्ग उपयुक्त उपक्रम घेण्यात आला. पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी शंभराहून अधिक पक्षांसाठी सुंदर घरटी तयार केली. सध्या ऊन, उष्णता भयंकर आहे. मनुष्याला या अति उष्णतेचा त्रास होतो आहे. आज प्राणी, पक्षी यांची अवस्था देखील खूप बिकट आहे. पक्षी हा निसर्गाचा एक प्रमुख घटक असून मनुष्यासाठी तो…

Read More

शिक्षणाला महत्व जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाने यश मिळेल:स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा केला सन्मान

प्रतिनिधी|अहिल्यानगर आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले असून स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रम यांच्या जोरावर यश संपादन करता येते, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. राजमुद्रा करिअर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केल्याबद्दल आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते….

Read More