Headlines

संत गुलाबराव महाराज संस्थान विकासासाठी मुख्यमंत्र्यांची भेट:लोणी येथील आराखड्याची मागणी, 6 जुलैला फडणवीस येणार

संत गुलाबराव महाराजांच्या लोणी (टाकळी) येथील संस्थानच्या विकासासाठी विशेष आराखडा तयार करण्याची मागणी जोर धरत आहे. या संदर्भात संस्थानच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली. लोणी येथील संत गुलाबराव महाराज संस्थानला शासनाने ‘ब’ दर्जा दिला असला तरी, अपेक्षित विकास न झाल्याने भाविक आणि ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. संत गुलाबराव महाराजांचे विचार आणि…

Read More

रुक्मिणीनगरमध्ये दीड महिन्यांपासून मलबा साचला:महापालिकेने दुसऱ्यांदा ट्रक पाठवण्याचे आश्वासन दिले, पण दुर्लक्ष

अमरावती प्रतिनिधी: शहरातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या रुक्मिणीनगर-जोगळेकर प्लॉट भागातील सर्व्हिस गल्लीत गेल्या दीड महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात मलबा साचलेला आहे. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी एकदा ट्रकने मलबा उचलल्यानंतर, उर्वरित मलबा नेण्यासाठी दुसऱ्यांदा ट्रक पाठवण्याचे आश्वासन दिले होते, मात्र दीड महिना उलटूनही तो अद्याप आलेला नाही. यापूर्वी, जेसीबीच्या सहाय्याने मलबा गोळा करून एका ट्रकमध्ये भरण्यात आला होता. परंतु, सर्व…

Read More

पारडा शिवारातील दुहेरी खून प्रकरण:बासंबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, तीन संशयीतांची चौकशी; गुन्हे शाखेकडून समांतर तपास

हिंगोली तालुक्यातील पारडा शिवारातील दुहेरी खून प्रकरणात बासंबा पोलिस ठाण्यात रविवारी ता. २१ अज्ञात आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात बासंबा पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे पथक समांतर तपास करीत आहेत. याप्रकरणात पोलिसांनी तीन संशयीतांची चौकशी सुरु केली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोली तालु्क्यातील पारडा शिवारातील शेतात बळीराम देवबा वाघमारे (65) व कलावतीबाई…

Read More

तरुणाच्या खून प्रकरणी एकाला अटक:काळेपडळ पोलिसांनी केली कारवाई; खुनाचे कारण अस्पष्ट

हांडेवाडी परिसरात झालेल्या एका तरुणाच्या खून प्रकरणाचा छडा काळेपडळ पोलिसांनी लावला आहे. या प्रकरणी खून करून पसार झालेल्या एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. आकाश मारुती झांबरे (वय ३१, रा. झांबरे तालीम चौक, होळकरवाडी, ता. हवेली) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी आकाश उर्फ आत्या अशोक भरेकर (वय ३१, रा. झांबरे तालीम चौक,…

Read More

पुण्यात रिक्षाचालकाने प्रवाशाला लुटले, 1.15 लाखांचा मुद्देमाल लंपास:वाकडेवाडीत मध्यरात्री घडली घटना; रिक्षाचालकासह साथीदारावर गुन्हा

पुण्यात रिक्षा प्रवाशांना लुटण्याच्या दोन वेगवेगळ्या घटना समोर आल्या आहेत. वाकडेवाडी परिसरात एका रिक्षाचालकाने प्रवाशाला धमकावून १ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटला, तर पुणे स्टेशन परिसरात एका ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील १ लाख २० हजार रुपयांची सोनसाखळी चोरीला गेली. पहिल्या घटनेत, २० जून रोजी मध्यरात्री अडीचच्या सुमारास ही घटना घडली. ओदिशा येथील मूळ रहिवासी असलेला…

Read More

राज्यात मान्सूनची दमदार एन्ट्री!:पुणे, सातारा ते कोकणापर्यंत पावसाची हजेरी; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

उन्हाळा आणि शाळेच्या सुट्ट्या संपून जून महिन्याचा शेवटचा आठवडा जवळ आला, तरीही पावसाने ओढ दिल्याने शेतकरी, सर्वसामान्य नागरिक आणि पशू-पक्षीही चिंतेत होते. हवामान खात्याचे अंदाज सतत पुढे ढकलले जात असले तरी, आता 25 जूननंतर राज्यात मान्सूनचे जोरदार आगमन होईल असा नवा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे, मुंबई, भिवंडी, सातारा आणि कोकणातील काही भागांत…

Read More

शाहरुख खानचा गालगुच्छा घेताना आम्ही दुष्काळ विसरलो:ते इंडियातल्या लोकांचे लग्न, आम्ही भारतातले कष्टकरी; लक्ष्मण हाकेंची सुप्रिया सुळेंवर टीका

“राज्यात सध्या भीषण दुष्काळसदृश परिस्थिती असताना आणि शेतकरी हवालदिल झाला असताना, लोकप्रतिनिधींना त्याचे गांभीर्य राहिलेले नाही. शाहरुख खानचा गालगुच्छा घेताना आमचे खासदार राज्यातील दुष्काळ विसरले आहेत,” अशा अत्यंत तिखट शब्दांत ओबीसी आंदोलनाचे नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे. “हे ‘इंडिया’ मधल्या…

Read More

सरकारची कर्जमाफी फसवी, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करा:महाविकास आघाडीची मागणी; विरोधकांचा चहापानावर बहिष्कार

राज्य सरकारच्या अपयशी कारभाराविरोधात आणि जनतेच्या प्रश्नांबाबत सरकारच्या असंवेदनशील भूमिकेचा निषेध म्हणून महाविकास आघाडीने विधानमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या सरकारच्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार टाकल्याची घोषणा आज पत्रकार परिषदेत करण्यात आली. महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी राज्यातील गंभीर प्रश्नांकडे सरकारचे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला. राज्यात दुष्काळ,शेतकरी प्रश्न, महिलांवरील वाढते अत्याचार, ढासळलेली कायदा-सुव्यवस्था, वाढते अमली…

Read More

मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर उद्रेक होईल:सरकारच्या बुडाखाली आग लावणारे आंदोलन असेल, रविकांत तुपकरांचा सरकारला इशारा

“माझे पाच दिवसांचे अन्नत्याग आंदोलन कोणत्याही आमदारकी किंवा खासदारकीच्या स्वार्थासाठी नव्हते, तर राज्यातील पिचलेल्या बळीराजाला न्याय मिळवून देण्यासाठी होते. मंत्री गिरीश महाजन यांच्या शब्दाला मान देऊन आणि मुख्यमंत्र्यांच्या सकारात्मक बैठकीच्या आश्वासनानंतर मी उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे. मात्र, सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचा किंवा आम्हाला गृहित धरण्याचा प्रयत्न केला, तर गावागावांतील शेतकरी हातात गोफण घेऊन रस्त्यावर…

Read More

उद्धव साहेबांवर नाराज नाही:पण सत्तेशिवाय कामे होत नाहीत, जनतेच्या कामांसाठी सत्तेत जाणे कर्मप्राप्त – नागेश पाटील आष्टीकर

शिवसेना ठाकरे गटातील ६ खासदारांच्या बंडखोरीच्या नाट्यानंतर, अखेर बंडखोर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची पहिली अधिकृत प्रतिक्रिया समोर आली आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय चर्चांवर पडदा टाकताना त्यांनी सोशल मीडियाद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली. “मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर मुळीच नाराज नाही,” असे सांगत, त्यांनी बंडखोरी करण्यामागचे मुख्य कारण मतदारसंघाचा विकास आणि निधीची…

Read More