Headlines

लोकशाही म्हणजे कायद्याचे राज्य, बहुमताचे नव्हे:सुरेश द्वादशीवार यांचे संविधानासमोरील प्रश्नांवर व्याख्यान

संविधान केवळ सामान्य नागरिकांसाठी नियम नसून सरकारला चौकटीत बांधून ठेवणारी व्यवस्था आहे. जनता आणि सरकार या दोघांचेही अधिकार व मर्यादा संविधानाने स्पष्ट केल्या आहेत. मात्र, नागरिकांना आपल्या घटनात्मक अधिकारांची पुरेशी जाणीव नसल्याने सरकारकडून मर्यादा ओलांडण्याची शक्यता निर्माण होते. लोकशाही म्हणजे बहुमताचे राज्य नव्हे, तर कायद्याचे राज्य होय. जनतेला जो न्याय लागू होतो, तोच सरकारलाही लागू…

Read More

भारत-ब्राझीलने दूरसंचार-आयसीटी सहकार्यासाठी करार केला:माहिती, अनुभव आणि सर्वोत्तम कार्यपद्धतींची देवाणघेवाण करण्यास मदत

पुणे येथे झालेल्या ‘ब्रिक्स आयसीटी ट्रॅक’ बैठकीदरम्यान भारत आणि ब्राझीलने दूरसंचार तसेच माहिती-संचार तंत्रज्ञान (आयसीटी) क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्य मजबूत करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य माधवराव सिंदिया आणि ब्राझीलचे दूरसंचार मंत्री फ्रेडरिको डी सिपेरा फिलो यांनी या करारावर स्वाक्षरी केली. या करारामुळे दोन्ही देशांमधील दूरसंचार आणि आयसीटी क्षेत्रातील माहिती, अनुभव आणि सर्वोत्तम…

Read More

नागपुरात कुख्यात गुंडाची प्रेम प्रकरणातून हत्या:जुन्या वादातून झालेल्या हत्येप्रकरणी दोघांना अटक

नागपुरात प्रेमसंबंध आणि जुन्या वादातून एका कुख्यात गुंडाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नरेंद्रनगर पूल आणि सुंदरबन परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी अजनी आणि बेलतरोडी पोलिसांनी तत्परता दाखवत दोन मुख्य आरोपींना अटक केली आहे. मयत गुंडाचे नाव गौरव पंकज रगडे (वय २५) असून, तो ‘गमछू’ हत्याकांडासह अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी होता आणि नुकताच…

Read More

मातीच्या गणपतीसाठी 'माझा बाप्पा मातीचा' पोर्टल:नागपूरसह विदर्भातील भक्तांना एका क्लिकवर मूर्ती खरेदीची सुविधा

नागपूरसह विदर्भातील गणेशभक्तांसाठी ‘माझा बाप्पा मातीचा’ हे विशेष डिजिटल पोर्टल सुरू करण्यात आले आहे. पारंपरिक मूर्तीकार व हस्तकला कारागीर संघातर्फे हे पोर्टल सुरू करण्यात आले असून, यामुळे गणेशोत्सवाच्या काळात मातीच्या मूर्ती शोधण्याची कसरत संपणार आहे. नागपूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षा शिवानी दाणी यांच्या हस्ते मनपा कार्यालयात या उपक्रमाचे लोकार्पण करण्यात आले. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नैसर्गिक…

Read More

साखरेचे दर का वाढले?:साखरेच्या उत्पादनात घट झाल्याने दरवाढ, माजी साखर आयुक्तांनी दिली महत्त्वाची माहिती

राज्यात साखरेच्या दरात मोठी वाढ झाली असून, किरकोळ बाजारात साखरेचा दर 80 रुपये प्रति किलो, तर घाऊक बाजारात सुमारे 7500 रुपये प्रति क्विंटलवर पोहोचला आहे. देशात दरवर्षी 285 लाख टन साखरेची आवश्यकता असते, मात्र साखरेच्या उत्पादनात घट झाल्याने ही दरवाढ झाली आहे. याविषयी माहिती देताना माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी स्पष्ट केले की, गेल्या…

Read More

जंतरमंतर वरील आंदोलनानेच युवकांनी क्रांतीची मशाल पेटवली:कॉ. वैभव चोपकर यांचे प्रतिपादन, कॉ. शेख काका व डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना साताऱ्यात अभिवादन

आजची तरुण पिढी वाया गेलेली आहे. रिल्स पाहणारी पिढी, तासनतास मोबाईलच्या आहारी गेलेली अशी टीका करणारे सूर समाजात सर्रास पाहायला मिळतात. परंतु त्याच मोबाईलच्या व्यसनाने रस्त्यावरच्या लढाईला बळ दिलं आणि जंतर मंतरवरील आंदोलनाने या देशात पुन्हा एकदा युवकांनी क्रांतीची मशाल पेटवली व ही तरुण पिढी आगामी काळात मनुवादी, जातीवादी व भांडवलदारी शक्तीला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय…

Read More

पुणे शिक्षण मंडळाकडून विशेष नैपुण्य प्राप्त शिक्षक, विद्यार्थ्यांचा गौरव:ज्ञानासोबत प्रामाणिकपणा, शिस्त अंगीकारावी- उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने आयोजित विशेष नैपुण्य प्राप्त शिक्षक आणि गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव सोहळ्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिक्षण म्हणजे केवळ पदवी मिळविण्याची प्रक्रिया नसून व्यक्तिमत्त्वाला आकार देऊन अस्तित्वाला अर्थ देणारी प्रक्रिया आहे, असे त्या म्हणाल्या. विद्यार्थ्यांनी ज्ञानासोबत संवेदनशीलता, प्रामाणिकपणा, शिस्त आणि कृतज्ञता हे गुण अंगीकारावे, असे आवाहन त्यांनी केले. बालगंधर्व…

Read More

साखरेच्या बाजारात 20-22 हजार कोटींच्या काळ्या बाजाराची शक्यता:राजू शेट्टींचा आरोप, म्हणाले- मुठभर व्यापारी-कारखानदारांसाठी जनतेला वेठीस धरले

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी देशातील साखरेच्या दरात झालेल्या मोठ्या वाढीवर चिंता व्यक्त केली आहे. कृत्रिम तुटवडा निर्माण करून काही मोजक्या साखर कारखानदार आणि व्यापाऱ्यांना फायदा मिळवून दिला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. साखरेच्या दरातील ही तेजी पुढील तीन महिने कायम राहिल्यास सुमारे 20 ते 22 हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त नफा काही…

Read More

मराठी न येणाऱ्या 1,268 रिक्षा-टॅक्सी चालकांना नोटीस:परिवहन विभागाची मोठी कारवाई; भाषा शिकण्यासाठी पुरेसा वेळ, मात्र नियमभंगाची मुभा नाही

राज्यभरात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्यात आल्यानंतर परिवहन विभागाने विशेष तपासणी मोहीम सुरू केली आहे. मोहिमेच्या पहिल्याच टप्प्यात मराठीचे पुरेसे ज्ञान नसलेल्या 1,268 चालकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. मुंबईत 604 चालकांना पहील्याच दिवशी नोटीस मुंबई महानगर प्रदेशात वाहनचालकांना मराठी भाषेचे व्यवहार्य ज्ञान आहे की नाही, याची तपासणी करण्यात आली. परिवहन मंत्री…

Read More

रस्त्याची क्वालिटी नाही, शिक्षणाची गॅरंटी नाही, गुन्हेगारीत पुणे एक नंबर:खासदार सुप्रिया सुळेंचा सरकारवर घणाघात; राहुल गांधींच्या दौऱ्यावरही सवाल

राज्यात सध्या रस्त्यांची क्वालिटी, शिक्षण, आश्रमशाळा किंवा अंगणवाड्या कशाचीही ‘गॅरंटी’ उरलेली नाही. दुसरीकडे पुण्यात कोयता गँग, खून आणि विनयभंगाच्या घटना वाढल्या असून, गुन्हेगारीत पुणे राज्यात एक नंबरवर असल्याची सडकून टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पुणे दौऱ्याला घालण्यात आलेल्या अटी-शर्तींवरून आणि बीडमधील हत्या प्रकरणावरून त्यांनी…

Read More