Headlines

आजपासून पावसाळी अधिवेशन:विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून शिवरायांना अभिवादन

पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. सुरुवातीला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून शिवरायांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. दुसरीकडे, विरोधकांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलनाला सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे अशा घोषणा दिल्या जात आहेत. तत्पूर्वी, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडीने पत्रकार परिषद घेत महायुती…

Read More

सोयगाव येथील पाझर तलाव धोक्यात:खोलीकरणाच्या नावाखाली मुरूम उपसा

तालुक्यातील बहुतांश पाझर तलाव, साठवण तलाव आणि लघु सिंचन प्रकल्प कोरडे पडले असून सोयगाव तालुक्यात पाणीटंचाईची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, याच भीषण टंचाईचा गैरफायदा घेत काही ठिकाणी पाझर तलाव खोलीकरणाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर अवैध मुरूम उत्खनन सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तलाव कोरडे पडल्याची संधी साधत मुरुमाचा अवैध उपसा सुरू आहे. धक्कादायक…

Read More

घरमालक रुग्णालयात, 1461 ग्रॅम सोन्या-चांदीचे दागिने लंपास:36,500 ची रोकडही पळवली, हरिद्वारनगरातील घटना‎

चिखलदरा तालुक्यातील मूळ रहिवासी एका व्यक्तीच्या परतवाडा येथील हरिद्वारनगरातील घरात घरफोडी करून चोरट्याने सोन्या-चांदीचे १,४६१ ग्रॅमचे दागिने व रोकड असा ऐवज लंपास केला. ही घटना शनिवारी २० जूनला उघडकीस आली. मधुकर धांडेकर यांच्या घरी ही चोरी झाली. धांडेकर यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना परतवाड्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मुख्य दरवाज्याचे कुलूप तोडून घरात प्रवेश…

Read More

थुंकण्यास विरोध केल्याच्या कारणावरुन वाद:सख्ख्या भावांवर हल्ला करणाऱ्या आरोपींची बाजारसावंगी गावात धिंड

तालुक्यातील बाजार सावंगी येथे थुंकण्यास विरोध केल्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन सख्ख्या भावांवर सहा जणांच्या टोळक्याने जीवघेणा हल्ला केला होता. या घटनेनंतर खुलताबाद पोलिसांनी कारवाई करत मुख्य आरोपींची शनिवारी बाजारसावंगी बाजारपेठेतून धिंड काढून कायद्याचा धाक दाखवला. बाजार सावंगी येथील एका चहाच्या हॉटेलमध्ये गुरुवारी थुंकण्यास विरोध केल्याने काही युवकांनी राग मनात धरला. त्यानंतर त्यांनी संबंधित दोन सख्ख्या…

Read More

शेतकऱ्यांना विनाअट सरसकट‎कर्जमाफी द्या; अन्यथा आंदोलन‎:अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना; शेतकरी विकास मंचचे धरणे‎

शेतकऱ्यांना कोणत्याही अटी व‎शर्तींशिवाय सरसकट कर्जमाफी देण्यात‎यावी. या प्रमुख मागणीसाठी शेतकरी‎विकास मंचातर्फे रविवारी जिल्हाधिकारी ‎‎कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात ‎‎आले. ही मागणी मान्य न झाल्यास ‎‎सामूहिकपणे आंदोलन छेडण्यात येईल.‎असा इशाराही देण्यात आला.‎ शेतकरी कर्जमाफीसाठी आंदोलन ‎‎केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस‎यांनी जून २०२६ मध्ये शेतकरी कर्जमाफी ‎‎करण्याचे आश्वासन दिले होते. यासाठी ‎‎उपाययोजना सुचवण्यासाठी राज्य‎सरकारने //”मित्र” संस्थेचे मुख्य कार्यकारी…

Read More

‘मांगी’चे पाणी जामखेडला देण्यास शेतकऱ्यांचा विरोध:आज रास्ता रोको, अन्यथा मांगी तलावातच सर्व शेतकरी जलसमाधी घेऊ..

करमाळा तालुक्यातील दुष्काळी भागासाठी जीवनदायी ठरलेल्या मांगी मध्यम प्रकल्पातील पाणी जामखेड तालुक्यातील हळगाव येथील कृषी विद्यालयाला देण्याचा प्रस्ताव समोर आल्यानंतर मांगीसह संपूर्ण तलाव लाभक्षेत्रातील शेतकरी, ग्रामस्थ आणि शेतकरी व प्रकल्पग्रस्तांत नाराजी पसरली आहे. या निर्णयाविरोधात सोमवारी (दि. २२)अहिल्यानगर-सोलापू र या महामार्गावरील मांगी येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली. मांगी तलावाच्या पाण्याबाबत…

Read More

होरनाडू कन्नड संघाचा 10 वा मेळावा: भाषा मन जिंकते:कन्नड भाषेला इतिहास आणि महत्त्व आहे, मेळाव्यात मान्यवरांचे उमटले सूर‎

कन्नड भाषेला इतिहास व महत्त्व आहे. आजही कन्नड संस्कृती दिसून येतो. मराठी राज्यात कन्नड शाळा आहेत. त्यामुळे ही भाषा समृध्द आहे, असे मत किरटेश्वर मठाचे स्वामीनाथ महास्वामी यांनी व्यक्त केले. भाषा हे मन जिंकण्याचे साधन आहे. कन्नड बोलल्याने आपलेसे वाटते. त्यामुळे घरात कन्नड बोलले पाहिजे, असे मत माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांनी व्यक्त केले. कर्नाटक…

Read More

ताणतणाव घालवण्यासाठी विद्यार्थ्यांनी मेडिटेशन करावे:बबनराव धावणे यांचे आवाहन, इयत्ता 5 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांनी केला आसनांचा सराव

भारताने योग अभ्यासाच्या रूपाने जगाला एक अनमोल देणगी दिली आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात ताणतणाव सहन करण्याची शक्ती कमी झाल्यामुळे आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. अशा वेळी मनाला शांत करण्यासाठी योगासने करणे अत्यंत गरजेचे आहे. विशेषतः इयत्ता १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांनी मानसिक स्थैर्यासाठी नियमित मेडिटेशन (ध्यान) करावे, असे आवाहन माजी क्रीडाशिक्षक बबनराव धावणे यांनी केले….

Read More

मुळा धरणावरील विद्युत मोटारी दिवसाआड दोन तास सुरू राहणार:पिण्याचे पाणी व जनावरांच्या गरजा भागवण्यासाठी प्रशासनाची परवानगी‎

राहुरी तालुक्यातील मुळा धरणातील पाणीसाठा खालावल्याने आणि पाणलोट क्षेत्रात अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने धरण प्रशासनाने धरणावरील शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी बंद करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ आणि पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, आमदार अक्षय कर्डिले यांनी या प्रश्नात तातडीने लक्ष घालून केलेल्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांना मोठा…

Read More

प्रवाशांच्या जिवाशी खेळ : नगर-मनमाड मार्गावर महिन्याभरातच पुलाला भगदाड:ठेकेदाराच्या निकृष्ट कामाची चौकशी करण्याची मागणी

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरी फॅक्टरी ते राहुरी दरम्यान असलेल्या एमआयडीसी परिसरातील नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाला महिनाभरातच मोठे भगदाड पडल्याची घटना समोर आली. या प्रकारामुळे महामार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. संबंधित ठेकेदाराच्या कामाच्या दर्जाबाबत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या महामार्गावर दिवस-रात्र मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. अवजड वाहतुकीचा भार सहन…

Read More